शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

म्युनिसिपल गोविंदपूर शाळेत कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी

By admin | Updated: December 6, 2014 01:51 IST

सन २०१४-१५ मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यातील ५० शाळांची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे.

गोंदिया : सन २०१४-१५ मध्ये विद्यार्थ्यांना व्यावसायिक व तंत्रशिक्षण देण्याच्या उद्देशाने शासनाने राज्यातील ५० शाळांची प्रायोगिक तत्वावर निवड केली आहे. यात गोंदिया जिल्ह्यातील पाच तर गोंदिया शहरातील नगर परिषदेच्या तीन शाळांचा समावेश आहे. या म्युनिसिपल शाळेतून आता विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण घेण्याची संधी मिळाली आहे.महाराष्ट्र शासन शिक्षण विभागाचे नवीन परिपत्रक नोव्हेंबर २०१४ नुसार, विद्यार्थ्यांना कौशल्यपूर्ण शिक्षण देण्याच्या हेतूने इयत्ता नववीच्या अभ्यासक्रमातील व्दितीय भाषेचे पाठ्यपुस्तक वगळून त्याऐवजी व्यावसायिक व तंत्रशिक्षण देण्याचे ठरविले आहे. सन २०१४-१५ करिता शासनाने प्रायोगिक तत्वावर महाराष्ट्रातील ५० शाळांची निवड केलेली आहे. यामधून गोंदिया जिल्ह्यातील पाच शाळा असून गोंदिया शहरातील मनोहर म्युनिसिपल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, मनोहर म्युनिसिपल हॉयर सेकंडरी स्कूल व म्युनिसिपल माताटोली हायस्कूल या तीन नगर परिषद शाळांची निवड शासनाने प्रायोगिक तत्त्वावर केली आहे. ही गोंदियासाठी गौरवास्पद बाब आहे. त्यामुळे म्युनिसिपल शाळेत शिक्षण घेणाऱ्या सर्वच विद्यार्थ्यांना इयत्ता नववीपासून कौशल्यपूर्ण तंत्रशिक्षण घेण्यची सुवर्ण संधी मिळणार आहे. हे नि:शुल्क व गुणवत्तापूर्ण शिक्षण घेण्यासाठी म्युनिसिपल शाळेत विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यावे, असे आवाहन शासनाच्या वतीने पालकांना करण्यात आले आहे. पालकांना माहती देण्याच्या उद्देशाने मनोहर म्युनिसिपल हायस्कूल गोविंदपूर येथे शुक्रवारी ५ डिसेंबरला पालक-शिक्षक संघ, माता-पालक संघ व शाळा व्यवस्थापन समिती यांची संयुक्त सभा पार पडली. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक व्ही.एम. शर्मा होते. तर पर्यवेक्षक ए.सी. तिवारी, एस.डी. फुंडे, ए.जी. ब्राह्मण यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच सर्व पालकांची उपस्थित लक्षणीय होती. सभेत मुख्याध्यापक व्ही.एम. शर्मा यांनी परिपत्रकानुसार इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या कौशल्यपूर्ण तंत्रज्ञान शिक्षणाची तोंडी ओळख दिली. ते म्हणाले की, मूलभूत तंत्रज्ञानाची ओळख या अभ्यासक्रमात प्रात्यक्षिकांवर आधारित प्रकल्पातून विद्यार्थ्यांना विविध कौशल्याची ओळख होेते. विद्यार्थ्यांमध्ये श्रमप्रतिष्ठा निर्माण व्हावी, आत्मनिर्भर व्हावे, विविध कौशल्य आत्मसात व्हावीत या दृष्टीने हे अभ्यासक्रम महत्त्वपूर्ण ठरेल. पर्यवेक्षक ए.सी. तिवारी म्हणाले की, ऐकलेले विसरले जाते, वाचलेले लक्षात राहते आणि केलेले समजते, हे तत्व सर्वमान्य आहे. या तत्त्वावरच सदर अभ्यासक्रम आधारित आहे. त्यामुळे विद्यार्थी स्वयंपूर्ण होऊन स्वत:चा लहान-मोठा उद्योग उभारू शकतील. शाळेतले शिक्षण हे फक्त चार भिंतीत मर्यादीत न राहता ते आजूबाजूच्या समाजाशी कसे जोडले जाऊ शकते, याचे हे अभ्यासक्रम उत्तम उदाहरण आहे. यावेळी काही पालकांनीसुद्धा आपले विचार व्यक्त केले.याप्रसंगी शिक्षकवृंद बी.एस. पटले, आर.एस. पटले, आर.ई. डिसुजा, के.के. पखाले, के.जे. शेख, वीना बिसेन, दुर्गा भदाडे, एम.एम. नेरलवार, ए.एन. भेंडारकर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार शिक्षक बी.एस. पटले यांनी केले. (प्रतिनिधी)