शहरं
Join us  
Trending Stories
1
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
2
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
3
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
4
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
5
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
6
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
7
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
8
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
9
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
10
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
11
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
12
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
13
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
14
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
15
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
16
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
17
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
18
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
19
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  

आव्हान समर्थपणे पेलण्याची किमया महिलांतच (महिला)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:26 IST

बोंडगावदेवी : नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे शक्य आहे. येणारे आव्हान समर्थपणे पेलण्याची ...

बोंडगावदेवी : नकारात्मक विचारांना तिलांजली देऊन सकारात्मक विचार अंगी बाळगल्यास यशोशिखर गाठणे शक्य आहे. येणारे आव्हान समर्थपणे पेलण्याची किमया महिलांमध्येच आहे, असे प्रतिपादन येथील सरपंच प्रतिमा बोरकर यांनी केले. ग्रामपंचायतच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून त्या बोलत होत्या.

ग्रामपंचायत सभागृहात आयोजीत कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून चान्ना प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. श्वेता कुळकर्णी, पोलीस पाटील मंगला रामटेके उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत सदस्य उषा पुस्तोळे, माया मेश्राम, निराशा मेश्राम, आंगणवाडी सेविका भामीना नेटीनकर, किरण खोब्रागडे, रीता मानकर, वर्षा राखडे, माजी ग्रा.पं.सदस्या दीपिका गजभिये, सुनंदा कोटरंगे, डॉ. नेवारे, ॲड. श्रीकांत बनपुरकर, अमरचंद ठवरे, ग्राविअ पी.एम.समरीत उपस्थित होते. सर्वप्रथम राजमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या छायाचित्रासमोर दीप प्रज्वलन व पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला. निराशा मेश्राम यांनी कविता सादर करून महिला शक्तीचा गुणगौरव केला. उषा पुस्तोळे, बनपूरकर, ठवरे यांनी सुध्दा विचार व्यक्त केले. संचालन करून आभार सदस्य माया मेश्राम यांनी मानले. कार्यक्रमासाठी कर्मचारी राष्ट्रपाल ठवरे, भोजराज मेश्राम, विश्वास लोणारे यांनी सहकार्य केले.