शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

एकमेव ‘स्टेडियम’ची दुरवस्था

By admin | Updated: August 31, 2015 01:34 IST

शहरात विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. शहरात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमात्र इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे.

खेळाडूंपुढे सरावाचा प्रश्न : नगर परिषद व लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष गोंदिया : शहरात विविध मैदानी खेळ खेळणाऱ्या खेळाडूंची संख्या मोठी आहे. शहरात नगरपालिकेच्या मालकीचे असलेले एकमात्र इंदिरा गांधी क्रीडा संकुल आहे. परंतु संकुलातील स्टेडियम व मैदानाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने स्टेडियमची दुरवस्था झाली आहे. यामुळे शहरातील खेळाडूंसमोर ‘सराव’ करावा कुठे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. शहरातील खेळाडूंसाठी सुविधायुक्त व सुसज्ज असे क्रीडा संकुल व्हावे, यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात नगर पालिकेने इंदिरा गांधी स्टेडियमची निर्मिती काही वर्षापूर्वी केली. या स्टेडियममध्ये आजवर विविध क्रीडा प्रकारातील जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धा पार पडल्या आहेत. शहरातील खेळाडूंनाही या स्पर्धांपासून प्रोत्साहन मिळाले. शहरातील अनेक खेळाडूंनी विविध क्रीडा प्रकारात राज्य व देशपातळीवर शहराचे नाव नेले. एकंदरित शहरात खेळांना प्रोत्साहन व खेळाडू निर्माण करण्याचे काम इंदिरा गांधी स्टेडियमने केले आहे. परंतु गेल्या काही वर्षात या स्टेडियमच्या वैभवाला उतरती कळा लागल्याचे दिसते. स्टेडियमच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याने पावसाळ्यातील चार महिन्यात स्टेडियममध्ये चिखल साचतो, या चार महिन्यात खेळाडूंसमोर सरावाचा मोठा प्रश्न निर्माण होतो. स्टेडियममध्ये जमलेले पावसाचे पाणी बाहेर जाण्यासाठी कोणतीही उपाययोजना नसल्याने हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून आहे. क्रीडा संघटनेच्या सततच्या पाठपुराव्यानंतर पावसाचे पाणी जाण्यासाठी गेल्या काही महिन्यांपासून नाली बांधकाम सुरू आहे. परंतु या बांधकामाच्या नावावर केवळ खोदकाम झाले असून पक्के बांधकाम थंडबस्त्यात पडले आहे. परिणामी यंदाच्या पावसाळ्यातही खेळाडूंना स्टेडियममध्ये सराव करता येत नाही. तसेच स्टेडियमच्या पायऱ्या तुटलेल्या असून कचऱ्याच्या ढिगाऱ्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे काही महिन्यापूर्वी शासनाच्या ‘स्वच्छ भारत, स्वच्छ गोंदिया’ अभियानांतर्गत स्टेडियमध्ये स्वच्छता अभियान राबविण्यात आले. परंतु त्यानंतर सर्वांचे दुर्लक्ष झाले. विशेष म्हणजे याच स्टेडियमवर सराव करुन अनेक खेळाडू, सैन्य, पोलीस विभाग व विविध शासकीय विभागात कार्यरत आहेत. परंतु गेल्या काही वर्षात या स्टेडियमची दुरवस्था झाल्याने आता खेळाडूंना शहराबाहेर दुरवरील तिरोडा, बालाघाट, आमगाव व तिरोडा राज्य मार्गावरील खुल्या जागेत सराव करावा लागत आहे. स्टेडियमच्या दुरवस्थेबद्दल नेहमीच बातम्या प्रकाशित केल्या तर क्रीडा संघटना स्टेडियमची दुरवस्था दूर करण्याचा सातत्याने पाठपुरावा केला जातो. परंतु ढिम्म प्रशासन व लोकप्रतिनिधींना या समस्यांशी काहीही देणेघेणे नाही. मैदानाची पावसाळ्यात दुरावस्था झाली आहे. या ठिकाणी हिरवळ कधी लागणार असे खेळाडूंना वाटत आहे. या मैदानावर चिखलाचे साम्राज्य आहे. परिणामी सराव करण्यात अडचण येत आहे. नाल्यांचे बांधकाम कधी होणार याकडे त्यांचे लक्ष लागले आहे. (तालुका प्रतिनिधी)