शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbra Train Accident: लोकल ट्रेनमधून पडले, किडे-मुंग्यांसारखा गेला जीव, मृत्यू झालेले कोण? नावे आली समोर
2
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
3
पती, पत्नी आणि हत्याकांड! राजा रघुवंशीप्रमाणेचे 'या' तरुणांचाही पत्नीने काढला काटा
4
मुंब्र्याच्या 'त्या' धोकादायक वळणाबाबत मनसे कार्यकर्त्याने दिलं होतं पत्र; अपघातात त्यानेच गमावले पाय
5
मुंब्रा अपघात: "प्रवाशांवरच त्यांच्या मृत्यूचे खापर फोडून चालणार नाही"; शरद पवारांचे रोखठोक मत
6
NCP अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्याचा मृतदेह स्वत:च्या कारमध्येच आढळला; नेमकं काय घडलं?
7
Mumbai Train Accident: "घटना दुर्दैवी, 'रेल्वे'कडून अपघाताची चौकशी सुरू"; मुख्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती
8
Raja Raghuvanshi :'सोनम माझ्यासोबत बोलत नाही, मला लग्न करायचं नाही'; लग्नाआधीच राजा रघुवंशीने आईला सांगितलं होतं
9
"दुआ लिपासोबत मुलं जन्माला घालायचीत", वादग्रस्त वक्तव्यावर बादशाहचं स्पष्टीकरण, म्हणाला...
10
IND vs ENG: 'तो बुमराहपेक्षाही भारी...' माजी क्रिकेटपटूनं घेतलं 'या' गोलंदाजाचं नाव!
11
Madhavi Latha : कष्टाचं फळ! १७ वर्षांच्या कठोर परिश्रमानंतर चिनाब पुलाचं स्वप्न साकार; कोण आहेत माधवी लता?
12
Swami Samartha: राशीनुसार करा स्वामींची उपासना मिळेल सुख-शांती आणि मिटेल वासना!
13
अचानक मुलगा बनला ८० कोटींचा मालक; १९९५ साली वडिलांनी खरेदी केले होते 'या' कंपनीचे शेअर्स
14
Raja Raghuvanshi : कोणी केला होता राजा रघुवंशीवर पहिला वार? खुनाच्या रात्री नेमकं काय घडलं? 
15
लग्नानंतर घरी कोणालाच बोलवलं नाही, कारण...; उषा नाडकर्णी म्हणाल्या - "घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला गेले आणि"
16
"प्रवाश्यांनी शिस्त पाळावी एवढीच विनंती"; किरीट सोमय्यांची मुंब्रा रेल्वे अपघातावर प्रतिक्रिया
17
'बेवफा सोनम'नंतर राज कुशवाहला अटक, पण खरा मारेकरी कोण? इंदूर पोलीस म्हणाले...
18
Mumbai Train Accident: ठाण्याजवळ रेल्वे दुर्घटना! धावत्या ट्रेनमधून ट्रॅकवर पडले प्रवासी, चार जणांचा मृत्यू; जखमींवर उपचार सुरु
19
ठाकरे बंधूंच्या युतीची चर्चा अन् थोड्याच वेळात मनसेचा एकनिष्ठ नेता करणार शिंदेसेनेत प्रवेश
20
UIDAI नं विद्यार्थ्यांसाठी आणली इंटर्नशिप ऑफर, महिन्याला मिळणार २० ते ५० हजार रुपये; कधी अर्ज करता येणार

चिकाटीनेच शिखर गाठता येते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2018 22:02 IST

नोकरी छोटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्त्वाची असते. त्यासाठी केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणकिता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.

ठळक मुद्देअनिल सोले : रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबिरात केले विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नोकरी छोटी असो वा मोठी असो, आयुष्यातील पहिली नोकरी फार महत्त्वाची असते. त्यासाठी केलेली मेहनत ही व्यक्तीला खूप काही शिकवण देते. कोणत्याही क्षेत्रात असताना कामाप्रती प्रामाणकिता ही त्या व्यक्तीची ओळख निर्माण करीत असून जिद्द व चिकाटीनेच यशाचे शिखर गाठता येत असल्याचे प्रतिपादन आमदार प्रा. अनिल सोले यांनी केले.फॉर्च्युन फाऊंडेशनच्यावतीने येथे मंगळवारी (दि.११) आयोजित यूथ एम्पॉवरमेंट समिट या रोजगार मेळावा व मार्गदर्शन शिबीरात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी प्रामुख्याने भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले, आमदार डॉ. परिणय फूके, आ. विजय रहांगडाले, आ. संजय पुराम, कार्यक्र माचे संयोजक भाजपा प्रदेश कार्यकारीणी सदस्य विनोद अग्रवाल, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेतराम कटरे, सभापती शैलजा सोनवाने, विश्वजीत डोंगरे, सदस्य कमलेश्वरी लिल्हारे, छाया दसरे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नंदकुमार बिसेन, भाजपा शहर अध्यक्ष सुनील केलनका, जिल्हा महामंत्री भाऊराव उके, पंचायत समिती सदस्य रामराज खरे, नगर परिषद गटनेता घनश्याम पानतवने, नगरसेवक बंटी पंचबुद्धे, निरज कटकवार, गजेंद्र फूंडे आदी मान्यवर उपस्थित होते.पुढे बोलताना प्रा. सोले यांनी, यश व अपयशामध्ये फार कमी अंतर असते. मात्र, कुठल्याही कार्यात सातत्य राखल्यास अपयशाला यशात बदलता येते. आजचा हा मेळावा युवकांना प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरणार असून दरवर्षी जिल्ह्यात या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले. कार्यक्र माचे संयोजक अग्रवाल यांनी प्रास्तावीकातून, जिल्ह्यातील हजारो तरु णांच्या हाताला काम मिळावे, ते मोठे व्हावे, त्यांना योग्य दिशा सापडावी, त्यांचे भविष्य सुकर व्हावे हे या कार्यक्र माचे उद्देश असून जिल्ह्यातील युवक-युवती या मेळाव्याच्या माध्यमातून घडणार असल्याचे मत मांडले. याप्रसंगी आ. फुले, आ. रहांगडाले व आ. पुराम यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.सदर मेळावा दोन सत्रात घेण्यात आला. ज्यामध्ये पहिल्या सत्रात संपादक संजय तिवारी यांनी युवकांना यशस्वी होण्याचे मंत्र देऊन प्रेरणादायी मार्गदर्शन केले. तर दुसऱ्या सत्रात आदिवासी विभागाचे अप्पर आयुक्त ऋषीकेश मोडक यांनी उपस्थित युवक-युवतींना लक्ष्य प्राप्तीसाठी शून्यातून ते शिखर गाठण्याचे अनेक प्रेरक उदाहरणातून सांगितले. तसेच आत्मविश्वास व यशासाठी दररोज एक तास व्यायामासाठी देण्याचेही सांगितले. विशेष म्हणजे, मेळाव्यात बीपीओ, केपीओ, आॅटोमोबईल आदी संबंधीत ३४ कंपन्यांनी हजेरी लावली होती. ज्यामध्ये हजारोंच्या संख्येत आलेल्या जिल्हा व परिसरातील युवक-युवतींची या कपंनीच्या अधिकाºयांनी चाचणी घेवून योग्यतेनुसार मुलाखती घेतल्या. तसेच निवड झालेल्यांना नियूक्ती पत्र दिले. संचालन अशोक हरिणखेडे यांनी केले. मेळाव्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.१४०० वर युवक -युवतींना जॉब आॅफरमेळाव्याला सकाळी सुरु वात होताच जिल्ह्यातील हजारोंच्या संख्येत युवक -युवतींनी गर्दी करीत योग्यतेनुसार संबंधित कंपन्यांच्या मुलाखतीला सामोरे गेले. ज्यामध्ये सायंकाळी ५ वाजतापर्यंत सुमारे एक हजार ४०० युवक-युवतींना जॉब आॅफर पत्र देण्यात आल्याची व यात आणखी वाढ होणार असल्याची माहिती मेळाव्याचे संयोजक अग्रवाल यांनी दिली.मुलाखतीचे अनुभव आलेमेळाव्यात जिल्ह्यातील युवक-युवतींनी एकच गर्दी करत मोठ्या उत्सूकतेने कंपन्यांची मुलाखत दिली. तेव्हा मुलाखतीनंतर पहिल्यांदाच एक उत्साहपूर्ण अनुभव आल्याच्या प्रतिक्र ीया यावेळी त्यांनी व्यक्त करून असे मेळावे आमच्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार असून नोकरीची संधी मिळत असल्याचा विश्वास व्यक्त केला.

टॅग्स :Anil Soleअनिल सोलेVijay Rahangdaleविजय रहांगडाले