शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

फक्त पाच योजनांचे डिमांड भरले

By admin | Updated: July 1, 2015 02:11 IST

राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९० योजना हाती घेतल्या होत्या.

८४ योजनांचे काम पूर्ण : वीज पुरवठ्याअभावी योजना बंदचगोंदिया : राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने ९० योजना हाती घेतल्या होत्या. यातील ८४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. मात्र तरिही या योजना निकामी पडून आहेत. वीज नसल्याने या योजना विनकामाच्या ठरत असून यातील फक्त पाच योजनांचे डिमांड भरण्यात आली असल्याची माहिती आहे. त्यामुळे या योजनांना कधी वीज कनेक्शन मिळणार हे सांगणे आतातरी कठिण आहे. दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत सन २०१४-१५ मध्ये ९० योजना हाती घेतल्या होत्या. विशेष म्हणजे आतापर्यंत यातील ८४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. यात गोंदिया तालुक्यातील १५ योजना असून सर्व योजनांचे काम पूर्ण झाले आहे. असे असतानाही मात्र या योजना अद्याप वीज कनेक्शनपासून वंचीत आहेत. योजना असलेल्या ग्राम पंचायतींकडून वीज वितरण कंपनीकडे ए-१ फॉर्म भरून दिला जात आहे. मात्र यात विभागाची दिरंगाई म्हणा की ग्राम पंचायतींकडून होत असलेला उशीर की फक्त पाच योजनांचे डिमांड भरण्यात आल्याची माहिती आहे. एकीकडे मुख्यमंत्री कृषी पंपांसाठी पाहिजे तेव्हा वीज कनेक्शन देण्याची गोष्ट करीत आहेत. त्यांचे हे आश्वासन पूर्ण होत नसल्याचे जिल्ह्यात दिसून येते. त्यात पाणी पुरवठा योजनांच्या बाबतीतही होत असलेली दिरंगाई चिंतनीय आहे. जलयुक्त शिवार अभियानावर कोट्यवधी रूपये खर्च करीत आहेत. मात्र तयार करण्यात आलेल्या योजना मात्र फक्त वीज कनेक्शनअभावी उभ्या आहेत. (शहर प्रतिनिधी)