शहरं
Join us  
Trending Stories
1
हगवणे कुटुंबियांचे जेसीबी मशीन जप्त; महाळुंगे एमआयडीसी पोलिसांची कारवाई
2
युक्रेनचं 'ऑपरेशन स्पायडरवेब'! ४ एअरबेस, ४० एअरक्राफ्ट उद्ध्वस्त; रशियाला २०० कोटी डॉलरचा फटका
3
PBSK vs MI : रोहितचा कॅच सुटल्यावर अय्यरचा मास्टर स्ट्रोक! स्टॉयनिसनं तर छाती बडवत केलं सेलिब्रेशन
4
भारताच्या मित्राने चीन सीमेवर उभी केली F-35 लढाऊ विमाने; जिनपिंग यांचं टेन्शन वाढलं
5
आता पिनकोड नाही तर 'Digipin' शेअर करा; भारतीय डाक विभागानं आणली पत्ता शोधणारी नवी प्रणाली
6
MI ला फायनल खेळायची हौस; पण Qualifier 2 मॅच आधी पाऊस! आकाश अंबानी यांची रिअ‍ॅक्शन व्हायरल
7
हनीमूनसाठी शिलांगला गेलेले जोडपे गायब, रहस्य उलगडेना; ९ दिवसांपासून काहीच सुगावा नाही
8
रशियाच्या एअरबेसवर युक्रेनचा मोठा हल्ला, बॉम्ब वर्षाव करणारी 40 विमानं उद्ध्वस्त केल्याचा दावा!
9
अन्नपदार्थांवर बुरशी, अस्वच्छता..; धारावीत Zepto चा परवाना निलंबित, महाराष्ट्र FDA ची कारवाई
10
Shreyas Iyer: मुंबईविरुद्ध श्रेयस अय्यरकडे इतिहास रचण्याची संधी, आतापर्यंत कोणालाही जमलं नाही असं!
11
IPL 2025 Qualifier 2 : MI ला धक्का; सावरण्यासाठी ६ फूट ७ इंच उंचीच्या तगड्या गड्यावर खेळला डाव
12
आसाम ते सिक्किमपर्यंत 'जल'प्रलय; पूर अन् भूस्खलनामुळे आतापर्यंत ३० मृत्यू, दिल्लीलाही इशारा
13
मे महिन्यात विक्रमी GST संकलन; सरकारच्या तिजोरीत आले ₹2.01 लाख कोटी
14
...ती माहिती संरक्षण मंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठकीत दिली पाहिजे होती, CDS च्या विधानानंतर काँग्रेस आक्रमक  
15
पाकिस्तानने युद्धविरामासाठी विनवणी केली; भारतीय शिष्टमंडळाने सांगितला 'त्या' दिवसाचा घटनाक्रम
16
अजित पवार सामाजिक न्याय योजनांसाठी निधी देत नाहीत; लक्ष्मण हाकेंचा थेट आरोप
17
कोण आहे २२ वर्षीय शर्मिष्ठा पनोली?; जिच्या अटकेमुळे भारतात सुरू झाला नवा वाद
18
VIDEO : "ए मंत्रीजी जोर से ताली बजा दो...!"; व्यासपीठावर जेपी नड्डा यांच्यासमोर वेगळ्याच अंदाजात दिसल्या वसुंधरा राजे 
19
शेतीच्या वादातून जन्मदात्या आईचा खून; मुलासह सून, व्याही पोलिसांच्या जाळ्यात अडकले
20
पाण्याच्या टाकीवर चढून बैलाने घातला शोलेस्टाईल धिंगाणा, सहा तासांनंतर झाली सुटका

जिल्ह्यात केवळ पाच हेक्टरमध्येच रोवणी

By admin | Updated: July 7, 2014 23:38 IST

आतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात १५ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिका टाकण्यात आल्या. मात्र हवा तसा दमदार पाऊस अद्यापही पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील २५ ते ३० टक्के रोपवाटिका करपल्या आहेत.

देवानंद शहारे - गोंदियाआतापर्यंत संपूर्ण जिल्हाभरात १५ हजार ५०४ हेक्टर क्षेत्रामध्ये रोपवाटिका टाकण्यात आल्या. मात्र हवा तसा दमदार पाऊस अद्यापही पडला नाही. त्यामुळे जिल्हाभरातील २५ ते ३० टक्के रोपवाटिका करपल्या आहेत. या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. तसेच जिल्ह्यात आतापर्यंत केवळ पाच हेक्टरमध्येच रोवणी करण्यात आल्याची नोंद कृषी विभागाने घेतली आहे. आज येईल, उद्या येईल, परवा येईल अशा आशेने शेतकरी दररोज आपल्या शेतात जाऊन आकाशाकडे नजरा लावून बसत आहे. मात्र पाऊस पडण्याचे कसलेही संकेत दिसत नाही. त्यामुळे शेतकरी पुरता वैतागून गेला आहे. त्यामुळे काही शेतकऱ्यांनी आवत्या करण्यास सुरूवात केली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजार ८८४ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या टाकण्यात आल्या आहेत. यंदा आवत्यांच्या क्षेत्र देवरी तालुक्यात सर्वाधिक असून तेथे चार हजार ४५४ हेक्टर क्षेत्रात आवत्या घालण्यात आल्या आहेत. मागील वर्षी आजच्या तारखेपर्यंत सर्वाधिक आवत्यांचे क्षेत्र देवरी तालुक्याचेच होते. तेथे पाच हजार २१५ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या घालण्यात आल्या होत्या. सन २०१३ मध्ये आजच्या तारखेपर्यंत जिल्ह्यात नऊ हजार ९६५ हेक्टर क्षेत्रामध्ये आवत्या घ्\ाालण्यात आल्या होत्या. तर आता सन २०१४ च्या आजपर्यंत जिल्ह्यात केवळ पाच हजार ८८४ हेक्टर क्षेत्रात आवत्या घालण्यात आल्या आहेत. म्हणजे गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत यंदा तब्बल चार हजार ८१ हेक्टर क्षेत्रात आवत्या कमी घालण्यात आल्या आहेत. आवत्यांची संख्या वाढणार असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, साधारणत: पावसाच्या पाण्यावर भाताचे पऱ्हे किंवा रोपवाटिका टाकली जाते. तसेच नियोजनही शेतकरी करतात. मात्र जून महिन्यात सरासरी पेक्षा कमी पाऊस झाल्याने टाकलेल्या धानाचे पऱ्हे व रोपवाटिका वाळत आहेत. त्यामुळे दुबार पेरणीचे संकट निर्माण झाले आहे. जिल्ह्यात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध असून प्रतिकूल परिस्थितीत भात लागवड पद्धतीत बदल केल्यास उत्पादनातील घट टाळता येऊ शकते, असे कृषी अधीक्षकांनी सांगितले.ज्या शेतकऱ्यांनी पऱ्हे टाकलेले आहेत व त्यांची उगवण प्रमाणापेक्षा कमी असल्यास शेतकऱ्यांनी दोरीच्या सहाय्याने (जपानी पद्धतीने) चिखलनी झाल्यानंतर आलेल्या पऱ्ह्याची रोवणी करावी. यात दोन रोपातील अंतर किमान २० ते २५ सेमी ठेवावे. चुडातील रोपांची संख्या दोन ते तीन ठेवावे. रोपाचा कालावधी १२ ते १५ दिवस असावा. तसेच कमी कालावधीचे वाण वापल्याने उत्तम असते. दोन रोपातील अंतर वाढत असल्याने हवा व सूर्यप्रकाश पिकांमध्ये खेळत असते. दुबार पेरणी करावयाची असल्यास आवत्यांची तिफनीने पेरणी करावी. त्यामुळे प्रतिकूल परिस्थितीतही उत्तमप्रकारे धानाचे उत्पादन घेता येते, असे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कुरील यांनी सांगितले.