शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
‘लाडकी बहीण’ योजनेकडे महिलांची पाठ? ५ महिन्यांत एकही नवा अर्ज नाही! क्रेझ ओसरल्याची चर्चा
3
“स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विजय खेचून आणा, काँग्रेसला १ नंबर पक्ष बनवा”: सपकाळ
4
India restricts Bangladeshi Jute Products: बांगलादेशला जोरदार झटका, नव्या निर्बधांनी भारतानं दिलं 'जशास तसं' उत्तर; कशावर होणार परिणाम?
5
स्फोट अन् भूकबळींनंतर गाजामध्ये आजारांचे थैमान, लोकांचे जाताहेत बळी; लान्सेट रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासा
6
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्लामध्ये घुसखोरीचा प्रयत्न; भीषण चकमकीत एक जवान शहीद
7
भारताचा माजी क्रिकेटपटू सुरेश रैना याला 'ईडी'कडून समन्स; अडचणी वाढणार? प्रकरण काय...
8
पुतिन-ट्रम्प भेटीपूर्वी मोठा 'धमाका' करण्याच्या तयारीत रशिया; अमेरिकेलाही धडकी भरणार, संपूर्ण जग नुसतं बघतच बसणार!
9
WI vs PAK : कॅरेबियन बेटावर पाकचा करेक्ट कार्यक्रम! ५० वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
10
'या' कारणाने लक्षात राहिली 'राऊडी राठोड'ची ऑडिशन; भार्गवी चिरमुले म्हणाली, 'त्यांनी मला..."
11
“विरोधकांकडे काही मुद्दे नसल्याने EVM, मतदारयाद्यांचा विषय उकरून काढला”; अजित पवारांची टीका
12
DRDOचा गेस्ट हाऊस मॅनेजर करत होता आयएसआयसाठी हेरगिरी; राजस्थानच्या सीआयडीने केली अटक
13
HDFC बँकेचा ग्राहकांना झटका! आता बचत खात्यात 'इतके' पैसे ठेवावे लागणार, नाहीतर बसणार दंड!
14
ट्रम्प टॅरिफवर CM देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, “ज्या उद्योगांना फटका बसणार...”
15
बालपणीच्या मित्राची भार्या आवडली, त्याने रंगेहाथ पकडले तरी...; दोघांनाही पुन्हा एक संधी दिली, पण... 
16
जेठालालपेक्षाही साधा भोळा आहे दयाबेनचा रिअल लाइफ नवरा, काय करतो माहितीये का?
17
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
18
तानाजी गळगुंडेला 'सैराट'साठी मिळालेलं इतक्या हजार रुपयांचं मानधन, स्वतःवर खर्च न करता दिले मित्राला
19
पोस्ट ऑफिसची धमाकेदार योजना! पत्नीच्या नावावर FD करुन मिळवा बँक एफडीपेक्षा जास्त परतावा!
20
स्टार क्रिकेटपटू विनोद कांबळीचा भाऊ कोण आहे? तो काय करतो? जाणून घ्या त्याच्याबद्दल...

‘मुले वाचतील’ तरच ‘मुली वाचणार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 23:23 IST

मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही.

ठळक मुद्देसाधना भारती : ‘बेटा बचाव राष्टÑीय अभियानांतर्गत मोर्चा व धरणे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मुलगा व मुलगी किंवा पती व पत्नी हे दुचाकीच्या दोन चाकांसारखे आहेत. त्यापैकी एक चाक जरी ढासळले तर गाडी चालू शकत नाही. आज मुले व्यसनाच्या आहारी जाऊन आपले शरीर, मन व जीवनच उद्ध्वस्त करीत आहेत. त्यामुळे मुलींचे जीवन नष्ट होत असून मुलांना व्यसनापासून वाचविणे अत्यावश्यक झाले आहे. मुले वाचतील तरच मुली वाचणार, असे प्रतिपादन बेटा बचाव राष्टÑीय अभियानाच्या ब्रँड अ‍ॅम्बासिडर साधना भारती यांनी केले.येथील उपविभागीय कार्यालयासमोर आयोजीत धरणे आंदोलनात शुक्रवारी (दि.३) बेटा बचाव राष्टÑीय अभियानाची माहिती देताना त्या बोलत होत्या. याप्रसंगी प्रामुख्याने बेटा बचाव राष्ट्रीय अभियानाचे अध्यक्ष ईश्वर उमरे, प्रवक्ता शिव नागपुरे, मंजू बैरागी, सरिता वैद्य, सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर, महेंद्र बघेले व इतर उपस्थित होते.पुढे बोलताना भारती यांनी, आजच्या काळात लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच व्यसनाच्या आहारी गेले आहेत. व्यसनामुळे गुन्हेगारी प्रवृत्तींना बळ मिळते. मात्र शासन व्यसनबंदीकडे दुर्लक्ष करीत आहे. शासन कोणत्याही पक्षाचे असो, व्यसनाशेमुळे समाज व महिलांचा काहीही लाभ होत नाही. व्यसनांमुळे मुलांचा मृत्यू होत असतानाही शासन या विषयावर कठोर पाऊल उचलत नाही. देशात ९० टक्के गुन्हे व्यसनांमुळे होतात. मुली व महिलांवर अत्याचार, बलात्कार, घटस्फोट, विधवा आदी प्रकाराला जबाबदार असल्याचे त्यांनी सांगीतले.विशेष म्हणजे, या आंदोलनांतर्गत शहरात रॅली काढण्यात आली होती. शहरातील बाजारभागासह मुख्य मार्गाने निघालेल्या या रॅलीत महिलांसह मोठ्या संख्येत विद्यार्थिनीही सहभागी झाल्या होत्या.दिल्ली येथे आंदोलनाचा इशाराबेटा बचाव राष्टÑीय अभियानाची रूपरेखा व्यक्त करताना साधना भारती म्हणाल्या, अभियानाच्या सुरूवातीला आम्ही महाराष्टÑ, मध्य प्रदेश, छत्तीसगड व उत्तर प्रदेश या चार राज्यात सदर अभियान राबवित आहोत. त्यातही सुरूवातीला महाराष्टÑातील गोंदिया व नागपूर तर मध्य प्रदेशातील बालाघाट व शिवनी या चार जिल्ह्यांमध्ये बेटा बचाव राष्टÑीय अभियानांतर्गत विराट रॅली व धरणे आंदोलन करण्यात येत आहे. मुख्यमंत्री व प्रधानमंत्री यांना व्यसनमुक्ती करण्याबाबत निवेदन देण्यात येतील व सर्वदलीय बैठक संसदेत आमंत्रित करण्याची मागणी केली जात आहे. तसेच गावपातळीवर जनजागृती करण्यात येत आहे. जर शासनाने २६ जानेवारी २०१९ पर्यंत संपूर्ण व्यसनांवर बंदी लावली नाही तर दिल्ली येथे जंतर मंतर परिसरात नशाबंदीसाठी देशव्यापी आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा दिला.