शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शाळांना वाटपासाठी फक्त ७२ लाख

By admin | Updated: June 29, 2015 01:13 IST

आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय करून देण्यासाठी शासनाने शिक्षणहक्क कायदा (आरटीई) अंमलात आणला आहे.

गोंदिया : आर्थिकदृष्ट्या कमकुवत कुटुंबातील विद्यार्थ्याला शिक्षणाची सोय करून देण्यासाठी शासनाने शिक्षणहक्क कायदा (आरटीई) अंमलात आणला आहे. यातंर्गत विना अनुदानित शाळांना अशा गटासाठी वर्ग १ ते ८ पर्यंत २५ टक्के जागा राखीव ठेवण्याचा नियम आहे. या विद्यार्थ्यांचा खर्च शासन वहन करणार आहे. मात्र सन २०१२-१३ पासून शासनाकडून एकही रूपया मिळालेला नव्हता त्यामुळे शिक्षण विभागाकडून शाळांना पैसा देण्यात आलेला नाही. तर आता शाळांना देण्यासाठी फक्त ७२ लाख रूपयेच शासनाकडून प्राप्त झाले आहेत. यातून किती शाळांना पैसे वाटप करावेत असा प्रश्न शिक्षण विभागाला पडत आहे. बदलत्या काळानुसार शिक्षण पद्धती बदलत चालली आहे. त्यात शिक्षणाचे बाजारीकरण झाल्याने विना अनुदानित शाळांकडून आपल्या मनमर्जीने फीस आकारली जात आहे. यामुळे वाढत्या महागाईसह शिक्षणाचा खर्चही अवाढव्य वाढत चालला आहे. अशात उच्च शिक्षण तर सोडाच मात्र नर्सरीपासूनचे शिक्षणही सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर झाले आहे. परिणामी मुलात गुण असले तरीही त्याच्या गुणांना दाबून मराठी शाळेत शिकविण्याची वेळ पालकांवर आली आहे. मात्र विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा व पैशांमुळे मुलांच्या शिक्षणावर परिणाम पडू नये या उद्देशातून शासनाने सर्व शिक्षा अभियानांतर्गत शिक्षणहक्क कायदा अंमलात आणला आहे. ८ जानेवारी २००९ रोजी पारित झालेल्या या कायद्यांतर्गत विना अनुदानीत इंग्रजी शाळांना कमकुवत गटातील विद्यार्थ्यांसाठी वर्ग १ ते ८ पर्यंत २५ टक्के जागा राखीव ठेवणे बंधनकारक आहे. तर सन २०१२-१३ पासून अशा शाळांना शासनाकडून प्रत्येक विद्यार्थ्यासाठी १२ हजार ३१५ दिले जाणार आहेत. शासनाने उदात्त हेतू नजरे पूढे ठेऊन हा कायदा अंमलात आणला आहे. मात्र शाळांना निधी देण्याचा नियम लागू झाल्यानंतर अद्याप पर्यंत शिक्षण विभागाकडे एक रूपयांचा निधी शासनाकडून आलेला नव्हता. अशात मागील तीन सत्रांपासून विभागाकडून शाळांना एक रूपयाही देण्यात आलेला नाही हे विशेष. (शहर प्रतिनिधी)मिळाले फक्त ७२ लाख सन २०१२-१३ पासून शाळांना निधी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र आता पर्यंत शिक्षण विभागाकडे यासाठी निधी देण्यात आलेला नव्हता. त्यामुळे मागील तीन सत्रांपासून शिक्षण विभागाकडून शाळांना निधी देण्यात आलेला नाही. तर एक महिनापूर्वी विभागाला शासनाकडून ७२ लाख रूपयांचा निधी देण्यात आला असल्याचे कळले. आता जिल्ह्यातील शाळांना द्यावयाचा तीन वर्षांचा निधी सहाजीकच कोट्यवधींच्या घरात असताना हे ७२ लाख रूपये कुणाला द्यायचे असा प्रश्न विभागापुढे निर्माण झाला आहे. वस्तुस्थिती काही औरच शासन जरी विना अनुदानित शाळांना २५ टक्के जागा राखीव ठेवण्यास सांगत आहे. मात्र वास्तवीक शाळांकडून या नियमाची काटेकोरपणे अंमलबजावणी होत काय हे सांगणे विभागासाठीच कठिण झाले आहे. त्यामुळे योजना शाळा व शासन दोघांसाठी डोकेदुखीची ठरत आहे. याची सखोल पाहणी केल्यास भलतेच चित्र डोळ््यापुढे येणार असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याचेही नागरिकांकडून बोलले जात आहे. एकंदर योजनेची वस्तूस्थिती काही औरच असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.