शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

ग्रामपंचायतमध्ये ६० टक्के महिलाच कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. यापैकी ८ ग्रामपंचायती व ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. ...

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. यापैकी ८ ग्रामपंचायती व ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्षात १६९३ जागांपैकी प्रत्यक्षात १३८२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात १३७० महिला तर उर्वरित पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर यात ९३० महिला उमेदवार निवडून आल्या आहे. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत निवडून आलेल्यांमध्ये महिला सदस्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये ६० टक्के महिला कारभारी राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसून, यानंतरसुद्धा बऱ्याच ग्रामपंचायतींच्या कारभारी महिलाच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

.......

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक महिला सदस्य

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ४४० महिला उमेदवार या गोंदिया तालुक्यातूनच रिंगणात होत्या. यापैकी १६७ वर महिला उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यात महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. तर सालेकसा ग्रामपंचायतमध्ये एकूण ८१ सदस्यांमध्ये ५० महिला सदस्य तर ३१ पुरुष सदस्य निवडून आले आहे. त्यामुळे या तालुक्यातसुद्धा गावकारभाराची सूत्रे महिलांच्याच हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

.......

महिला सदस्यांच्या प्रतिक्रिया

गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने गावाचा विकास करण्याची संधी मला दिली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून गाव विकासासाठी असलेल्या शासनाच्या योजना गावात राबवून गावाचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, यासाठीच प्रयत्न असणार आहे.

-लिना रहांगडाले, सदस्य.

........

१४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून गाव विकासासाठी बऱ्याच प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे गावकऱ्यांनी मला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करून गावच्या विकासाला हातभार लावणार.

- वच्छला बावणे, सदस्य.

.......

गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला गावाचा विकास करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव विकासाला गती देणे, पायाभूत सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम राबविणे आणि अतिक्रमणाची समस्या दूर करण्याचे काम मी करणार आहे.

-भारती गावंडे, सदस्य.

......

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या : १८९

निवडून आलेले एकूण उमेदवार : १६९३

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी महिला उमेदवार : ९३०

...................