शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायतमध्ये ६० टक्के महिलाच कारभारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2021 04:29 IST

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. यापैकी ८ ग्रामपंचायती व ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. ...

जिल्ह्यातील १८९ ग्रामपंचायतीच्या निवडणुका राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्या होत्या. यापैकी ८ ग्रामपंचायती व ३११ सदस्य बिनविरोध निवडून आले. त्यामुळे प्रत्यक्षात १६९३ जागांपैकी प्रत्यक्षात १३८२ जागांसाठी निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत एकूण ३१५१ उमेदवार निवडणूक रिंगणात होते. यात १३७० महिला तर उर्वरित पुरुष उमेदवार निवडणूक रिंगणात होते. सोमवारी निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर यात ९३० महिला उमेदवार निवडून आल्या आहे. पुरुष उमेदवारांच्या तुलनेत निवडून आलेल्यांमध्ये महिला सदस्यांचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे ग्रामपंचायतमध्ये ६० टक्के महिला कारभारी राहणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले. विशेष म्हणजे सरपंच पदाचे आरक्षण अद्याप जाहीर झाले नसून, यानंतरसुद्धा बऱ्याच ग्रामपंचायतींच्या कारभारी महिलाच पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

.......

गोंदिया तालुक्यात सर्वाधिक महिला सदस्य

ग्रामपंचायत निवडणुकीत सर्वाधिक ४४० महिला उमेदवार या गोंदिया तालुक्यातूनच रिंगणात होत्या. यापैकी १६७ वर महिला उमेदवार निवडून आले आहेत. त्यामुळे या तालुक्यात महिला सदस्यांची संख्या अधिक आहे. तर सालेकसा ग्रामपंचायतमध्ये एकूण ८१ सदस्यांमध्ये ५० महिला सदस्य तर ३१ पुरुष सदस्य निवडून आले आहे. त्यामुळे या तालुक्यातसुद्धा गावकारभाराची सूत्रे महिलांच्याच हाती राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

.......

महिला सदस्यांच्या प्रतिक्रिया

गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने गावाचा विकास करण्याची संधी मला दिली आहे. मिळालेल्या संधीचे सोने करून गाव विकासासाठी असलेल्या शासनाच्या योजना गावात राबवून गावाचा सर्वांगिण विकास कसा करता येईल, यासाठीच प्रयत्न असणार आहे.

-लिना रहांगडाले, सदस्य.

........

१४ व्या आणि १५ व्या वित्त आयोगामुळे ग्रामपंचायतींना मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. या माध्यमातून गाव विकासासाठी बऱ्याच प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. त्यामुळे गावकऱ्यांनी मला दिलेल्या संधीचा योग्य उपयोग करून गावच्या विकासाला हातभार लावणार.

- वच्छला बावणे, सदस्य.

.......

गावकऱ्यांनी मोठ्या विश्वासाने आपल्याला गावाचा विकास करण्याची संधी दिली आहे. त्यांच्या विश्वासाला कधीच तडा जावू देणार नाही. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गाव विकासाला गती देणे, पायाभूत सुविधा, आरोग्यविषयक उपक्रम राबविणे आणि अतिक्रमणाची समस्या दूर करण्याचे काम मी करणार आहे.

-भारती गावंडे, सदस्य.

......

निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींची संख्या : १८९

निवडून आलेले एकूण उमेदवार : १६९३

ग्रामपंचायत निवडणुकीत विजयी महिला उमेदवार : ९३०

...................