शहरं
Join us  
Trending Stories
1
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
2
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
3
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
4
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा
5
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
6
भारीच! महागडे प्रोडक्ट सोडा... गळणाऱ्या केसांवर रामबाण उपाय; एकदा करून बघाच
7
“मुंबईच्या गरब्यात सेलिब्रिटींवर लाखोंची उधळण, तेच पैसे शेतऱ्यांना दिले असते”: रोहित पाटील
8
Video: अमानवीय! आधी टक्कर मारली, मग गाडीखाली चिरडले; बैलाची अतिशय क्रुर हत्या...
9
इंट्राडे उच्चांकावरून थेट ११% घसरला हा शेअर, गुंतवणूकदारांना मोठा फटका; रेखा झुनझुनवालांचीही गुंतवणूक
10
Bhiwandi Crime: तोंडात कुरकुरे अन् निपचित पडलेला मृतदेह; कोर्टातून फरार झालेल्या आरोपीचा चिमुकलीवर अत्याचार
11
सचिन तेंडुलकरची गुंतवणूक असलेला शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% वधारला! दिला जातोय खरेदीचा सल्ला
12
Navi Mumbai Crime: इन्स्टाग्रावर ओळख, वाशीमध्ये भेटायला बोलावले; 16 वर्षाच्या मुलीवर कारमध्येच...
13
Kojagiri Purnima 2025:कोजागरी पौर्णिमेला चंद्र प्रकाश अंगावर घ्यावा असे म्हणतात; का ते माहितीय?
14
मुंबई-पुण्यात घरांच्या विक्रीत १७% घट; 'या' कारणांमुळे ग्राहकांनी फिरवली पाठ; किमती कमी होणार का?
15
‘आयुष्मान भारत’ योजना बंद पडली? नागपूरच्या रुग्णालयांमध्ये उघडकीस आले धक्कादायक वास्तव; रुग्णांना सेवा नाकारल्या
16
Video - "देवाने हे नियम बनवले नाहीत..."; शॉर्ट्स घालून महिलेने मंदिरात प्रवेश केल्याने मोठा गोंधळ
17
VIDEO: 'पॉवर हिटिंग'! ३ वर्षांच्या चिमुरड्याची बॅटिंग पाहून तुम्हीही म्हणाल- What a Shot!
18
मृत्यूचे कुंड : १०० हून अधिक लोकांना गायब करणारी रहस्यमयी विहीर! ४० मीटर लांब, शास्त्रज्ञांनाही उलगडेना...
19
आशिया चषकातील वादानंतर हवाई दल प्रमुखांचा मोठा दावा; भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली 
20
कोजागरी शरद पौर्णिमा २०२५: पंचकाची अशुभ छाया अन् अमंगल काळ, शुभ मुहूर्त कधी? लक्ष्मी लाभेल!

तीन वर्षात विम्याचे केवळ ४२ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: June 13, 2014 00:13 IST

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला.

शेतकरी अपघात विमा : २०१३-१४ चे १६ प्रस्ताव अजूनही गुलदस्त्यातदेवानंद शहारे- गोंदियाशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. मात्र तीन वर्षात सदर कंपनीने अवघे ४२ प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पात्र ठरविले आहेत.

गेल्या महिना-दिड महिनाभरापूर्वीच सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे १६ प्रस्ताव कृषी विभागाने मंजुरीसाठी विमा कंपनीकडे सादर केले. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा विमा कंपनीचा बेजबाबदारपणा यामुळे किती प्रस्ताव मंजूर झाले व किती नाकारले गेले, हे अद्याप गुलदस्तात आहे. 

जिल्हा कृषी विभाग शेतकरी जनता अपघात विम्याचे दावे जयका इन्सुरन्स कंपनीकडे काढते. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून एक लाख रूपयांपर्यंतची मदत मिळू शकते. परंतु त्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या वारसदाराने जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. शेतकरी म्हणून महसूल कागदपत्रे सात-बारा, ६ क, ६ ड, (फेरफार) यात नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.  

सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सदर अपघाती विम्याचे एकूण १६ प्रस्ताव जयका विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील एक, तिरोडा तालुक्यातील पाच, गोरेगाव तालुक्यातील तीन, आमगाव तालुक्यातील दोन, सालेकसा तालुक्यातील दोन, देवरी तालुक्यातील दोन व सडक/अर्जुनी तालुक्यातील एका प्रस्तावाचा समावेश आहे. या सर्व प्रस्तावांचे काय झाले व प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली याची अद्ययावत माहिती मात्र जिल्हा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी सन २०१२-१३ मध्ये सदर योजनेंतर्गत एकूण ४७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे पाठविण्यात आले होते. मात्र १३ आॅक्टोबर २०१३ पर्यंत यापैकी ३९ प्रस्तावात त्रुट्या व आठ प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले होते. तोपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर किंवा नाकारल्या गेले नव्हते. ५ आॅक्टोबर २०१३ नंतर या प्रस्तावांचे काय झाले? याची माहितीसुद्धा कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.