शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
3
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
4
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
5
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
8
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
9
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
10
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
11
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
12
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
13
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
14
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
15
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
16
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
17
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
18
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
19
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
20
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षात विम्याचे केवळ ४२ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: June 13, 2014 00:13 IST

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला.

शेतकरी अपघात विमा : २०१३-१४ चे १६ प्रस्ताव अजूनही गुलदस्त्यातदेवानंद शहारे- गोंदियाशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. मात्र तीन वर्षात सदर कंपनीने अवघे ४२ प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पात्र ठरविले आहेत.

गेल्या महिना-दिड महिनाभरापूर्वीच सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे १६ प्रस्ताव कृषी विभागाने मंजुरीसाठी विमा कंपनीकडे सादर केले. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा विमा कंपनीचा बेजबाबदारपणा यामुळे किती प्रस्ताव मंजूर झाले व किती नाकारले गेले, हे अद्याप गुलदस्तात आहे. 

जिल्हा कृषी विभाग शेतकरी जनता अपघात विम्याचे दावे जयका इन्सुरन्स कंपनीकडे काढते. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून एक लाख रूपयांपर्यंतची मदत मिळू शकते. परंतु त्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या वारसदाराने जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. शेतकरी म्हणून महसूल कागदपत्रे सात-बारा, ६ क, ६ ड, (फेरफार) यात नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.  

सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सदर अपघाती विम्याचे एकूण १६ प्रस्ताव जयका विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील एक, तिरोडा तालुक्यातील पाच, गोरेगाव तालुक्यातील तीन, आमगाव तालुक्यातील दोन, सालेकसा तालुक्यातील दोन, देवरी तालुक्यातील दोन व सडक/अर्जुनी तालुक्यातील एका प्रस्तावाचा समावेश आहे. या सर्व प्रस्तावांचे काय झाले व प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली याची अद्ययावत माहिती मात्र जिल्हा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी सन २०१२-१३ मध्ये सदर योजनेंतर्गत एकूण ४७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे पाठविण्यात आले होते. मात्र १३ आॅक्टोबर २०१३ पर्यंत यापैकी ३९ प्रस्तावात त्रुट्या व आठ प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले होते. तोपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर किंवा नाकारल्या गेले नव्हते. ५ आॅक्टोबर २०१३ नंतर या प्रस्तावांचे काय झाले? याची माहितीसुद्धा कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.