शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

तीन वर्षात विम्याचे केवळ ४२ प्रस्ताव मंजूर

By admin | Updated: June 13, 2014 00:13 IST

शासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला.

शेतकरी अपघात विमा : २०१३-१४ चे १६ प्रस्ताव अजूनही गुलदस्त्यातदेवानंद शहारे- गोंदियाशासन शेतकऱ्यांच्या हितासाठी विविध योजना राबविते. त्यापैकीच एक योजना म्हणजे शेतकरी अपघात विमा योजना. या योजनेचा कोट्यवधी रुपयांचा विमा सरकारने विमा कंपनीकडे भरला. मात्र तीन वर्षात सदर कंपनीने अवघे ४२ प्रस्ताव शेतकऱ्यांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी पात्र ठरविले आहेत.

गेल्या महिना-दिड महिनाभरापूर्वीच सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील अपघाती मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांचे १६ प्रस्ताव कृषी विभागाने मंजुरीसाठी विमा कंपनीकडे सादर केले. मात्र अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष किंवा विमा कंपनीचा बेजबाबदारपणा यामुळे किती प्रस्ताव मंजूर झाले व किती नाकारले गेले, हे अद्याप गुलदस्तात आहे. 

जिल्हा कृषी विभाग शेतकरी जनता अपघात विम्याचे दावे जयका इन्सुरन्स कंपनीकडे काढते. शेतकऱ्याचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा कायमचे पूर्ण अपंगत्व आल्यास विमा कंपनीकडून एक लाख रूपयांपर्यंतची मदत मिळू शकते. परंतु त्यासाठी संबंधित शेतकऱ्याच्या वारसदाराने जिल्हा किंवा तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करणे गरजेचे असते. शेतकरी म्हणून महसूल कागदपत्रे सात-बारा, ६ क, ६ ड, (फेरफार) यात नोंदणीकृत असलेले १० ते ७५ वयोगटातील सर्व शेतकरी या योजनेचा लाभ घेवू शकतात.  

सन २०१३-१४ या आर्थिक वर्षात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे सदर अपघाती विम्याचे एकूण १६ प्रस्ताव जयका विमा कंपनीकडे सादर करण्यात आले. यात गोंदिया तालुक्यातील एक, तिरोडा तालुक्यातील पाच, गोरेगाव तालुक्यातील तीन, आमगाव तालुक्यातील दोन, सालेकसा तालुक्यातील दोन, देवरी तालुक्यातील दोन व सडक/अर्जुनी तालुक्यातील एका प्रस्तावाचा समावेश आहे. या सर्व प्रस्तावांचे काय झाले व प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचली याची अद्ययावत माहिती मात्र जिल्हा कृषी विभागाकडे उपलब्ध नाही.उल्लेखनिय म्हणजे मागील वर्षी सन २०१२-१३ मध्ये सदर योजनेंतर्गत एकूण ४७ शेतकऱ्यांचे प्रस्ताव कृषी विभागामार्फत विमा कंपनीकडे पाठविण्यात आले होते. मात्र १३ आॅक्टोबर २०१३ पर्यंत यापैकी ३९ प्रस्तावात त्रुट्या व आठ प्रस्ताव प्रलंबित ठेवण्यात आले होते. तोपर्यंत एकही प्रस्ताव मंजूर किंवा नाकारल्या गेले नव्हते. ५ आॅक्टोबर २०१३ नंतर या प्रस्तावांचे काय झाले? याची माहितीसुद्धा कृषी विभागाकडे नाही. त्यामुळे शेतकरी जनता अपघात विमा योजनेच्या यशस्वितेवरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.