शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरदरम्यान काँग्रेस पाकिस्तानी सैन्याच्या बाजूने होती', पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
2
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...
3
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
4
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
5
Sushila Karki: 'आम्ही सत्तेचा आस्वाद घेण्यासाठी आलेलो नाही, ६ महिन्यांतच...' पंतप्रधान सुशीला कार्की 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये!
6
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
7
तुमचे LPG गॅस सिलेंडरचे अनुदान बंद झाले? घरबसल्या मोबाईलवरुन करता येईल सुरू
8
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
9
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
10
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
11
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
12
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
13
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
14
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
15
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
16
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
17
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
18
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
19
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
20
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा

महावितरणकडे आले फक्त ३९ अर्ज

By admin | Updated: December 8, 2015 02:10 IST

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत.

कपिल केकत ल्ल गोंदियाजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) भरण्यात आले असून २५ योजनांसाठीच डिमांड भरण्यात आली आहे. त्यातही महावितरणला १०२ योजनांची माहिती देण्यात आली आहे. अशात महावितरणने या सर्व योजनांची वीज जोडणी कशी करायची, असा सवाल आता महावितरणकडून केला जात आहे.दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले होते. फेब्रवारी २०१५ पर्यंत या १०४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजनांचे काम पूर्ण झाल्याने विभागाने यातील ५२ वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. तर वीज जोडणी अभावी ९८ योजना पांढरा हत्ती ठरत आहेत. हे जरी सत्य असले तरी, महावितरणकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने फक्त १०२ योजनांचीच यादी दिली आहे. यात गोंदिया विभागात ५९ तर देवरी विभागात ४३ अशा एकूण १०२ योजनांची नोंद आहे. शिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांचे बांधकाम करण्यात आले असले तरिही आतापर्यंत फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) महावितरणकडे देण्यात आलेले आहेत. यातही २५ योजनांचे डिमांड भरण्यात आले आहेत. म्हणजेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून अद्याप ६३ योजनांचे अर्ज महावितरणकडे देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. यात गोंदिया विभागातील २९ तर देरवरी विभागातील ३४ योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महावितरणकडे अर्ज करून योजनांसाठी डिमांड भरण्यात आलीच नाही. अशात महावितरण कसे काय या पाणी पुरवठा योजनांना जोडणी देणार असा सवाल महावितरणकडून केला जात आहे. यातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांच्या वीज कनेक्शनसाठी कुठेतरी दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. फेब्रुवारीतच या योजनांचे काम झाल्यावर आता वर्षभर होत असताना साधे अर्जही भरण्यात आले नाहीत. अशात या योजना कधी सुरू होणार व या गावांतील नागरिकांनी यंदाच्या उन्हाळ््यातही पाण्यासाठी भटकावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.