शहरं
Join us  
Trending Stories
1
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
2
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
3
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
4
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
5
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
6
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणकडे आले फक्त ३९ अर्ज

By admin | Updated: December 8, 2015 02:10 IST

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत.

कपिल केकत ल्ल गोंदियाजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) भरण्यात आले असून २५ योजनांसाठीच डिमांड भरण्यात आली आहे. त्यातही महावितरणला १०२ योजनांची माहिती देण्यात आली आहे. अशात महावितरणने या सर्व योजनांची वीज जोडणी कशी करायची, असा सवाल आता महावितरणकडून केला जात आहे.दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले होते. फेब्रवारी २०१५ पर्यंत या १०४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजनांचे काम पूर्ण झाल्याने विभागाने यातील ५२ वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. तर वीज जोडणी अभावी ९८ योजना पांढरा हत्ती ठरत आहेत. हे जरी सत्य असले तरी, महावितरणकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने फक्त १०२ योजनांचीच यादी दिली आहे. यात गोंदिया विभागात ५९ तर देवरी विभागात ४३ अशा एकूण १०२ योजनांची नोंद आहे. शिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांचे बांधकाम करण्यात आले असले तरिही आतापर्यंत फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) महावितरणकडे देण्यात आलेले आहेत. यातही २५ योजनांचे डिमांड भरण्यात आले आहेत. म्हणजेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून अद्याप ६३ योजनांचे अर्ज महावितरणकडे देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. यात गोंदिया विभागातील २९ तर देरवरी विभागातील ३४ योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महावितरणकडे अर्ज करून योजनांसाठी डिमांड भरण्यात आलीच नाही. अशात महावितरण कसे काय या पाणी पुरवठा योजनांना जोडणी देणार असा सवाल महावितरणकडून केला जात आहे. यातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांच्या वीज कनेक्शनसाठी कुठेतरी दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. फेब्रुवारीतच या योजनांचे काम झाल्यावर आता वर्षभर होत असताना साधे अर्जही भरण्यात आले नाहीत. अशात या योजना कधी सुरू होणार व या गावांतील नागरिकांनी यंदाच्या उन्हाळ््यातही पाण्यासाठी भटकावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.