शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
3
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
4
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
5
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
6
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
7
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
8
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
9
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
10
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
11
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
12
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
13
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
14
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
15
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
16
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
17
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
18
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
19
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर
20
WTC Final : गत चॅम्पियन ऑस्ट्रेलियाला तगडी फाईट देण्यासाठी दक्षिण आफ्रिकेनं केली मजबूत संघ बांधणी

महावितरणकडे आले फक्त ३९ अर्ज

By admin | Updated: December 8, 2015 02:10 IST

जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत.

कपिल केकत ल्ल गोंदियाजिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने तयार केलेल्या १०४ योजनांमधील ९८ योजना अद्याप ‘करंट’च्या प्रतीक्षेत आहेत. वास्तविक महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडे फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) भरण्यात आले असून २५ योजनांसाठीच डिमांड भरण्यात आली आहे. त्यातही महावितरणला १०२ योजनांची माहिती देण्यात आली आहे. अशात महावितरणने या सर्व योजनांची वीज जोडणी कशी करायची, असा सवाल आता महावितरणकडून केला जात आहे.दरवर्षी उन्हाळ््यात निर्माण होणाऱ्या पाणी टंचाईमुळे नागरिकांची चांगलीच फजिती होते. यावर कायमचा तोडगा काढता यावा यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने राष्ट्रीय पेयजल कार्यक्रमांतर्गत १०४ ग्रामीण पाणी पुरवठा योजनांचे काम हाती घेतले होते. फेब्रवारी २०१५ पर्यंत या १०४ योजनांचे काम पूर्ण झाले आहे. योजनांचे काम पूर्ण झाल्याने विभागाने यातील ५२ वीज वितरण कंपनीकडे वीज कनेक्शनसाठी अर्ज केल्याची माहिती ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून देण्यात आली होती. तर वीज जोडणी अभावी ९८ योजना पांढरा हत्ती ठरत आहेत. हे जरी सत्य असले तरी, महावितरणकडे ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने फक्त १०२ योजनांचीच यादी दिली आहे. यात गोंदिया विभागात ५९ तर देवरी विभागात ४३ अशा एकूण १०२ योजनांची नोंद आहे. शिवाय ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांचे बांधकाम करण्यात आले असले तरिही आतापर्यंत फक्त ३९ योजनांचेच अर्ज (अ-१) महावितरणकडे देण्यात आलेले आहेत. यातही २५ योजनांचे डिमांड भरण्यात आले आहेत. म्हणजेच ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून अद्याप ६३ योजनांचे अर्ज महावितरणकडे देण्यात आलेले नसल्याची माहिती आहे. यात गोंदिया विभागातील २९ तर देरवरी विभागातील ३४ योजनांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, महावितरणकडे अर्ज करून योजनांसाठी डिमांड भरण्यात आलीच नाही. अशात महावितरण कसे काय या पाणी पुरवठा योजनांना जोडणी देणार असा सवाल महावितरणकडून केला जात आहे. यातून ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडून योजनांच्या वीज कनेक्शनसाठी कुठेतरी दिरंगाई होत असल्याचे स्पष्ट दिसून येते. फेब्रुवारीतच या योजनांचे काम झाल्यावर आता वर्षभर होत असताना साधे अर्जही भरण्यात आले नाहीत. अशात या योजना कधी सुरू होणार व या गावांतील नागरिकांनी यंदाच्या उन्हाळ््यातही पाण्यासाठी भटकावे लागणार असल्याची चिन्हे दिसून येत आहेत.