शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

तलावांत केवळ १०.२८ टक्के पाणी

By admin | Updated: April 18, 2015 00:41 IST

जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. ..

पाणीसाठ्यात घट : मागील वर्षी होते ३२.१६ टक्के पाणीगोंदिया : जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. मागील एक ते दोन आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस येत आहे. तरीही जलाशय-तलावांतील पाण्याचे स्तर एवढे कमी झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आजच्या तारखेत ३२.१६ टक्के जलसंग्रह होते.जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चार जलाशयांतही पाणी संग्रहाची स्थिती बिकट आहे. कालीसरार जलाशय तर अनेक महिन्यांपूर्वीच आटले आहे. इटियाडोह जलाशयात २७.४४ टक्के, सिरपूर जलाशयात १८.९३ टक्के व पूजारीटोला जलाशयात २१.३८ टक्के जलसंग्रहाची स्थिती आहे. मध्यम प्रकल्पाच्या तलावांपैकी तीन तलावांची स्थिती गंभीर आहे. त्यांत एक टक्कासुद्धा पाणी उरले नाही. मध्यम प्रकल्पाच्या बोदलकसा जलाशयात ५.५३ टक्के, चोरखमारा जलाशयात ०.८७ टक्के, चुलबंदमध्ये ६.४० टक्के, खळबंदामध्ये १०.६३ टक्के, मानागडमध्ये ११.७४ टक्के, रेंगेपारमध्ये ०.२८ टक्के, संग्रामपूरमध्ये पाणी लघुत्तम पातळीच्या खाली आहे. मध्यम प्रकल्पाच्या सात तलावांत पाण्याचा साठा केवळ ५.६१ टक्के आहे. उमरझरी येथे १७.४४ टक्के, कटंगी येथे १७.९५ टक्के, कलपाथरी येथे १६.९७ टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. लघू प्रकल्पाच्या १९ तलावांत एकूण १३.५१ टक्के पाणी उरले आहे. आक्टीटोला येथे १०.०१ टक्के, भदभद्या येथे १४.०१ टक्के, डोंगरगाव येथे १.९८ टक्के, कालीमाटी येथे २.१५ टक्के, मोगर्रा २७.४६ टक्के, नवेगावबांध १९.३० टक्के, पिपरिया २२.६५ टक्के, पांगडी ०.८९ टक्के, रेहाडी १४.४३ टक्के, राजोली १०.८६ टक्के, रिसाला २.२२ टक्के, सोनेगाव १.६८ टक्के, सालेगाव ९.७५ टक्के, शेरपार ७.०७ टक्के, जुनेवानी ११.६३ टक्के, गुमडोह, हरी, शेळेपार व वडेगाव येथील तलावांत पाण्याची टक्केवारी लघुत्तम स्तरापर्यंत पोहोचली आहे. ओवारा तलावात १६.९८ टक्के पाणी उरले आहे. जुन्या मालगुजारी तलावात फुलचूर ६.४७, गोठणगाव १२.७५, गिरोला ४.२७, गंगेझरी ६.००, कवठा २०.४५, कोहलगाव १८.९०, खैरी ०.९७, खमारी १०.३५, कोसमतोंडी ११.९५, कोकणा १६.९६, खोडशिवनी ९.००, खाडीपार ०.६३, लेंडेझरी १९.०५, माहुली १.६१, मालीजुंगा १.८२, मेंढा ६.५३, मोरगाव ४.४४, माहुरकुडा ९५.१०, निमगाव ३.३४, नांदलपार ११.८१, पळसगाव (सौंदड) ६.२२, पुतळी ४७.७८, सौंदड तलावात ३१.११ टक्के पाणी उरले आहे. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाळी, धाबेटेकडी, कोसबी-बकी, ककोडी, काटी, मुंडीपार, पालडोंगरी, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव येथे जलसाठा लघुत्तम स्तरापेक्षा खाली गेला आहे. स्थानिक पातळीवरील छत्तरटोला, सालेकसा (नर्सरी) व चारभाटा येथेसुध्दा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत पाणी समाप्त झाले आहे. (प्रतिनिधी)