शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
4
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
5
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
6
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
7
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
8
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
9
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
10
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
11
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
12
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
13
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
14
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
15
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
16
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
17
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
18
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
19
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
20
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तलावांत केवळ १०.२८ टक्के पाणी

By admin | Updated: April 18, 2015 00:41 IST

जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. ..

पाणीसाठ्यात घट : मागील वर्षी होते ३२.१६ टक्के पाणीगोंदिया : जिल्ह्यातील १० मध्यम प्रकल्प, २० लघू प्रकल्प व ३८ जुन्या मालगुजारी तलाव मिळून केवळ १०.२८ टक्केच पाणी उरले आहे. मागील एक ते दोन आठवड्यात थोड्याफार प्रमाणात पाऊस येत आहे. तरीही जलाशय-तलावांतील पाण्याचे स्तर एवढे कमी झाले आहे. विशेष म्हणजे मागील वर्षी आजच्या तारखेत ३२.१६ टक्के जलसंग्रह होते.जिल्ह्यातील सर्वात मोठ्या चार जलाशयांतही पाणी संग्रहाची स्थिती बिकट आहे. कालीसरार जलाशय तर अनेक महिन्यांपूर्वीच आटले आहे. इटियाडोह जलाशयात २७.४४ टक्के, सिरपूर जलाशयात १८.९३ टक्के व पूजारीटोला जलाशयात २१.३८ टक्के जलसंग्रहाची स्थिती आहे. मध्यम प्रकल्पाच्या तलावांपैकी तीन तलावांची स्थिती गंभीर आहे. त्यांत एक टक्कासुद्धा पाणी उरले नाही. मध्यम प्रकल्पाच्या बोदलकसा जलाशयात ५.५३ टक्के, चोरखमारा जलाशयात ०.८७ टक्के, चुलबंदमध्ये ६.४० टक्के, खळबंदामध्ये १०.६३ टक्के, मानागडमध्ये ११.७४ टक्के, रेंगेपारमध्ये ०.२८ टक्के, संग्रामपूरमध्ये पाणी लघुत्तम पातळीच्या खाली आहे. मध्यम प्रकल्पाच्या सात तलावांत पाण्याचा साठा केवळ ५.६१ टक्के आहे. उमरझरी येथे १७.४४ टक्के, कटंगी येथे १७.९५ टक्के, कलपाथरी येथे १६.९७ टक्के जलसाठ्याची स्थिती आहे. लघू प्रकल्पाच्या १९ तलावांत एकूण १३.५१ टक्के पाणी उरले आहे. आक्टीटोला येथे १०.०१ टक्के, भदभद्या येथे १४.०१ टक्के, डोंगरगाव येथे १.९८ टक्के, कालीमाटी येथे २.१५ टक्के, मोगर्रा २७.४६ टक्के, नवेगावबांध १९.३० टक्के, पिपरिया २२.६५ टक्के, पांगडी ०.८९ टक्के, रेहाडी १४.४३ टक्के, राजोली १०.८६ टक्के, रिसाला २.२२ टक्के, सोनेगाव १.६८ टक्के, सालेगाव ९.७५ टक्के, शेरपार ७.०७ टक्के, जुनेवानी ११.६३ टक्के, गुमडोह, हरी, शेळेपार व वडेगाव येथील तलावांत पाण्याची टक्केवारी लघुत्तम स्तरापर्यंत पोहोचली आहे. ओवारा तलावात १६.९८ टक्के पाणी उरले आहे. जुन्या मालगुजारी तलावात फुलचूर ६.४७, गोठणगाव १२.७५, गिरोला ४.२७, गंगेझरी ६.००, कवठा २०.४५, कोहलगाव १८.९०, खैरी ०.९७, खमारी १०.३५, कोसमतोंडी ११.९५, कोकणा १६.९६, खोडशिवनी ९.००, खाडीपार ०.६३, लेंडेझरी १९.०५, माहुली १.६१, मालीजुंगा १.८२, मेंढा ६.५३, मोरगाव ४.४४, माहुरकुडा ९५.१०, निमगाव ३.३४, नांदलपार ११.८१, पळसगाव (सौंदड) ६.२२, पुतळी ४७.७८, सौंदड तलावात ३१.११ टक्के पाणी उरले आहे. भानपूर, बोपाबोडी, भिवखिडकी, चान्ना-बाक्टी, चिरचाळबांध, चिरचाळी, धाबेटेकडी, कोसबी-बकी, ककोडी, काटी, मुंडीपार, पालडोंगरी, पळसगाव-डव्वा, तेढा व ताडगाव येथे जलसाठा लघुत्तम स्तरापेक्षा खाली गेला आहे. स्थानिक पातळीवरील छत्तरटोला, सालेकसा (नर्सरी) व चारभाटा येथेसुध्दा लघु सिंचन प्रकल्पांतर्गत पाणी समाप्त झाले आहे. (प्रतिनिधी)