शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
IND vs PAK U19 Asia Cup Final Live Streaming: भारत-पाक महामुकाबला कुठे आणि कसा पाहता येईल?
4
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
5
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
6
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
7
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
8
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
9
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
10
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
11
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
12
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
13
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
14
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
15
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
16
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
17
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
18
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
19
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
20
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

एक कोटीच्या नळ योजनेच्या विहिरीचे काम निकृष्ट

By admin | Updated: May 27, 2014 23:49 IST

सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे

पांढरी : सडक अर्जुनी तालुक्यातील पांढरी येथे सन २0११ ते २0१२ या वर्षी मंजूर झालेल्या नळ योजनेचे काम सन २0१४ मध्ये सुरु करण्यात आले. मात्र कंत्राटदाराने विहीर बांधकाम करताना १0 ऐवजी ८ एमएमचे गज वापरल्याने या कामाचा दर्जा खालावला आहे. त्यामुळे ही विहिरी किती मजबूत होणार, यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वास्तविक निविदेच्या विवरणात या विहिरीसाठी १0 एमएमचा गज वापरणे गरजेचे होते. मात्र प्रत्यक्षात पैसे वाचविण्यासाठी भंडारा येथील कंत्राटदार शिंदे यांनी आठ एमएमचे गज रिंग बांधताना वापरले. यामुळे विहिरीचे काम हलक्या दर्जाचे होत आहे.

शासनाने लाखो रुपये खर्च करुन विहीर बांधण्याकरिता निधी उपलब्ध करून दिला असताना कंत्राटदाराची ही कृती बांधकामाचा दर्जा कमी करणारी आहे. याप्रकरणी कंत्राटदाराकडे शहानिशा केली असता त्यांनीसुद्धा आठ एमएम लोखंडाचा वापर केल्याची कबुली दिली. वास्तविक ही विहीर नाल्याच्या जवळ आहे. त्यामुळे अतवृष्टीमुळे ही विहीर खचली तर जबाबदार कोण, असा प्रश्न गावकर्‍यांना पडला आहे. ‘पायवा मजबूत असला तर घर मजबूत’ अशा उक्तीप्रमाणे कंत्राटदाराने चांगले काम करायला पाहिजे, अशी अपेक्षा केली जात आहे. वरिष्ठ अधिकार्‍यांनी या ठिकाणी बनवलेल्या विहिरीची तपासणी करून चौकशी करावी आणि हे काम अधिक चांगल्या दर्जाचे होईल याकडे लक्ष द्यावे अशी नागरिकांची मागणी आहे. (वार्ताहर)