शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शेतकऱ्यांना जुना अन् राईसमिल मालकांना नवीन बारदाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:36 IST

यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जुना बारदान उपलब्ध करुन देण्यात आला. तर राईसमिल मालकांना धान भरडाईसाठी नवीन बारदान उपलब्ध करुन देत धान खरेदीतही शेतकऱ्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात धान खरेदी केली जात आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : २ लाख ५५ हजार बारदाना उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जुना बारदान उपलब्ध करुन देण्यात आला. तर राईसमिल मालकांना धान भरडाईसाठी नवीन बारदान उपलब्ध करुन देत धान खरेदीतही शेतकऱ्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात धान खरेदी केली जात आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख क्विंटल धान शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. यंदा ५८ धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी करण्यात येणार आहे.धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला २ लाख ५५ हजार नवीन बारदान उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शेतकºयांना जुने बारदाना देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेताना चांगलीच अडचण होत आहे.दरम्यान काही शेतकऱ्यांनी याची जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे तक्रार सुध्दा केल्याची माहिती आहे.धान खरेदीसाठी नवीन बारदाना उपलब्ध करुन दिल्यानंतरही त्यांना फाटका बारदाना दिला जात आहे.याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा २ लाख ५५ हजार नवीन बारदाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र हा बारदाना राईस मिल मालकांना धान भरडाई करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर फेडरेशनकडे १० लाख जुना बारदाना उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग धान खरेदीसाठी केला जात असल्याचे सांगितले.बारदान्याचा दर निश्चित नाहीजिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत धान खरेदी केली जाते. फेडरेशन शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध करुन देते तर आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून बारदान्यासह धान खरेदी करते. मागील वर्षी १५ रुपये प्रती बारदाना दर निश्चित करण्यात आला होता. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता अद्यापही बारदान्याचा दर निश्चित करण्यात आला नाही. त्यामुळे या आदिवासी विकास महामंडळ आणि शेतकरी या दोघांची अडचण झाली आहे.