शहरं
Join us  
Trending Stories
1
"लाज वाटू द्या, गिधाडांनो !"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावला, पोलिसांची दडपशाही (video viral)
2
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
3
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
4
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
5
ब्रायन लाराचा ४०० धावांचा विक्रम थोडक्यात बचावला, फलंदाज ३६७ धावांवर नाबाद असताना घडलं असं काही...  
6
“ठाकरे गटाच्या खासदार प्रियंका चतुर्वेदींना दोन ओळी मराठी बोलता येत नाही”; शिंदेसेनेची टीका
7
राहा फिट! वजन कमी करण्यासाठी अत्यंत प्रभावी ठरतं 'पिरॅमिड वॉक'; पण 'ते' आहे तरी काय?
8
'पंचायत'च्या विनोदने 'या' मराठी अभिनेत्रीसोबतही केलंय काम, सिनेमाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा
9
“हेच मराठी, महाराष्ट्राचे मारेकरी, हिंदूंनाही वाचवू शकत नाही”; उद्धव ठाकरेंचा भाजपावर पलटवार
10
…तेव्हा अवघ्या २ मतांनी पराभव, आता ४ वर्षांनी बदललं नशीब, पुनर्मतमोजणीत बाजी मारून बनल्या सरपंच  
11
“महात्मा गांधींचे विचार देशाची दिशा, सत्य; पुतळ्यावर वार करून संपणार नाही”: हर्षवर्धन सपकाळ
12
सेन्सेक्स-निफ्टी सपाट! पण, अंबानींच्या 'या' कंपनीच्या शेअर्समध्ये धडाकेबाज वाढ! कोणत्या क्षेत्रात घसरण?
13
"संजय शिरसाट यांच्या मुलाची मालमत्ता शून्य, मग त्यांनी हॉटेल विकत कसं घेतलं?" अंबादास दानवेंचा सवाल
14
सरकारी बँकांमध्ये खातं असेल तर हे वाचाच; मिनिमम बॅलन्सवरील दंडाबाबत मोठी अपडेट
15
वंदे भारत ट्रेन पुराच्या पाण्यात अडकली; सात तास, रेल्वे इंजिन आले आणि...
16
मुंबईच्या क्रिकेट संघाला पृथ्वी शॉचा राम राम, आता या संघाकडून खेळणार
17
पाकिस्तान सांगत राहिले, राफेल पाडले, राफेल पाडले...! अमेरिकेच्या F-१६ माजी पायलटने सांगितले काय घडले...
18
"नवोदित कलाकारांनाही इथे...", मराठी अभिनेत्याची 'चला हवा येऊ द्या'साठी पोस्ट, निलेश साबळेंबद्दल म्हणाला...
19
चमत्कार! पाकिस्तानात हिंदू कुटुंबातील २० जणांचा मृत्यू; ३ महिन्यांची चिमुकली बचावली
20
Vastu Shastra: अंघोळ झाल्यावर करत असाल 'ही' एक चूक तर घरात भरेल नकारात्मक ऊर्जा!

शेतकऱ्यांना जुना अन् राईसमिल मालकांना नवीन बारदाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2018 21:36 IST

यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जुना बारदान उपलब्ध करुन देण्यात आला. तर राईसमिल मालकांना धान भरडाईसाठी नवीन बारदान उपलब्ध करुन देत धान खरेदीतही शेतकऱ्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे. जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात धान खरेदी केली जात आहे.

ठळक मुद्देशासकीय धान खरेदी : २ लाख ५५ हजार बारदाना उपलब्ध

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : यंदा शासकीय धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून धान खरेदी करण्यासाठी जुना बारदान उपलब्ध करुन देण्यात आला. तर राईसमिल मालकांना धान भरडाईसाठी नवीन बारदान उपलब्ध करुन देत धान खरेदीतही शेतकऱ्यांसोबत भेदभाव करण्यात आला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये रोष व्याप्त आहे.जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व आदिवासी विकास महामंडळामार्फत जिल्ह्यात धान खरेदी केली जात आहे. यंदा खरीप हंगामात जिल्ह्यात ५ लाख क्विंटल धान शासकीय धान खरेदी केंद्रावरुन खरेदी होण्याचा अंदाज जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने वर्तविला आहे. यंदा ५८ धान खरेदी केंद्रावरुन धान खरेदी करण्यात येणार आहे.धान खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला २ लाख ५५ हजार नवीन बारदान उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र जिल्हा मार्केटिंग फेडरेशन शेतकºयांना जुने बारदाना देत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना धान खरेदी केंद्रावर धान विक्रीस नेताना चांगलीच अडचण होत आहे.दरम्यान काही शेतकऱ्यांनी याची जिल्हाधिकारी व संबंधित विभागाकडे तक्रार सुध्दा केल्याची माहिती आहे.धान खरेदीसाठी नवीन बारदाना उपलब्ध करुन दिल्यानंतरही त्यांना फाटका बारदाना दिला जात आहे.याबाबत जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या कर्मचाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी यंदा २ लाख ५५ हजार नवीन बारदाना उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र हा बारदाना राईस मिल मालकांना धान भरडाई करण्यासाठी देण्यात येणार आहे. तर फेडरेशनकडे १० लाख जुना बारदाना उपलब्ध आहे. त्याचाच उपयोग धान खरेदीसाठी केला जात असल्याचे सांगितले.बारदान्याचा दर निश्चित नाहीजिल्ह्यात जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळा अंतर्गत धान खरेदी केली जाते. फेडरेशन शेतकऱ्यांना बारदाना उपलब्ध करुन देते तर आदिवासी विकास महामंडळ शेतकऱ्यांकडून बारदान्यासह धान खरेदी करते. मागील वर्षी १५ रुपये प्रती बारदाना दर निश्चित करण्यात आला होता. तर २०१८-१९ या आर्थिक वर्षाकरीता अद्यापही बारदान्याचा दर निश्चित करण्यात आला नाही. त्यामुळे या आदिवासी विकास महामंडळ आणि शेतकरी या दोघांची अडचण झाली आहे.