शहरं
Join us  
Trending Stories
1
धक्कादायक... दिवसाला चार ते पाच मुली मुंबई शहरातून होत आहेत बेपत्ता
2
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
3
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
4
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
5
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
6
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
7
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
8
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
9
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
10
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
11
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
12
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
13
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
14
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
15
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
16
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
17
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
18
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
19
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
20
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रक्चर आॅडिटमध्ये जुना उड्डाणपूल फेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 13, 2018 00:30 IST

शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.

ठळक मुद्देरेल्वे विभाग पाडणार पूल : ६४ कोटींच्या नवीन पुलाचा प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील गोंदिया-बालाघाट मार्गावरील जुन्या उड्डाणपुलाचे रेल्वे आणि सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे स्ट्रक्चर आॅडिट करण्यात आले. यात हा उड्डाणपूल पूर्णपणे जीर्ण झाला असून वाहतुकीसाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट झाले.या पुलावरुन केवळ दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू ठेवता येईल,असे स्पष्ट करण्यात आले आहे. रेल्वे विभागाने तीन महिन्यापूर्वी जिल्हा प्रशासनाला पत्र देवून शहरातील जुना उड्डाणपूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्याचे निर्देश दिले होते. यानंतर जिल्हा प्रशासनाने हा पूल वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केल्यास शहरात वाहतुकीची कोंडी आणि पुलाच्या दोन्ही बाजुच्या नागरिकांना त्रास होण्याची शक्यता लक्षात घेवून या पुलावरुन जडवाहतूक पूर्णपणे बंद केली होती.जुन्या उड्डाणपुलाचे स्ट्रक्चर आॅडिट करुन याचा अहवाल आल्यानंतर पुलावरुन वाहतूक सुरू ठेवायची किंवा नाही याचा निर्णय घेण्याचे ठरविले होते.सार्वजनिक बांधकाम आणि रेल्वे विभागाच्या तज्ञांकडून या पुलाचे स्ट्रक्चर आॅडिट केले. यात हा पूल वाहतुकीसाठी योग्य नसल्याचा अहवाल दिला. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने आठवडाभरापूर्वीच उंची कठड्यानंतर पुलावर रुंदी कठडे लावले. तसेच दुचाकी व तीन चाकी वाहनांना या पुलावरून प्रवेश देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निणर्याचे सर्रासपणे उल्लघंन केले जात आहे.वाहतूक नियंत्रण विभागाचे दुर्लक्षजुन्या उड्डाणपुलावरुन केवळ दुचाकी आणि तीन चाकी वाहनांना प्रवेश असताना या पुलावरुन चारचाकी वाहने सर्रासपणे धावत आहे. त्यामुळे पुलावर अपघात झाल्यास जबाबदार कोण राहणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे पुलाच्या दोन्ही बाजुला वाहतूक नियंत्रण विभागाचे शिपाई कर्तव्यावर असतात मात्र त्यांच्याच डोेळ्यादेखत जुन्या पुलावरुन चार चाकी वाहने धावत आहेत.रेल्वे पाडणार पूलगोंदिया-बालाघाट मार्गावरील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल रेल्वे विभाग पाडणार आहे. मात्र उड्डाणपूल पाडण्यासाठी येणार खर्च सार्वजनिक बांधकाम विभागाला द्यावा लागणार आहे. रेल्वे विभागाने सहा महिन्यात उड्डाणपूल पाडण्याचे नियोजन केल्याची माहिती आहे.६४ कोटी रुपयांच्या नवीन पुलाचा प्रस्तावशहरातील जुना जीर्ण झालेला उड्डाणपूल पाडून त्या ठिकाणी नवीन उड्डाणपूल तयार करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने नवीन उड्डाणपूल बांधकामाचा ६४ कोटी रुपयांचा प्रस्ताव व आराखडा शासनाकडे पाठविला असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.