शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2022 05:00 IST

केंद्र सरकारने केवळ शंभर रुपयांत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरूवातीला गॅस सिलिंडरचा दर कमी असल्याने तो गोरगरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या गॅस सिलिंडर १,०५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या याेजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर खरेदी करणे बंद करून पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे.

मुन्नाभाई नंदागवळीलोकमत न्यूज नेटवर्क बाराभाटी :  अनेक योजना या गरीब नागरिकांसाठी निर्माण केल्या जातात. पण अशा योजना जे सरकार राबविते तेच सरकार सामान्य नागरिकांना रस्त्यावर आणण्याचे काम करत असल्याचे चित्र आहे. अशाचप्रकारे केंद्र सरकारची ‘प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना’ ही सामान्य नागरिकांच्या डोक्यावर बसली आहे. ही योजना मिळाली फक्त १०० रुपयांत, मात्र गॅस सिलिंडर आता १ हजार ५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे तो घेणे गोरगरीब आणि सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. परिणामी ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर...’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.केंद्र सरकारने केवळ शंभर रुपयांत प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेंतर्गत लाभार्थ्यांना गॅस संच उपलब्ध करून दिले. सुरूवातीला गॅस सिलिंडरचा दर कमी असल्याने तो गोरगरीब व सर्वसामान्यांच्या आवाक्यात होता. मात्र, मागील सहा ते सात महिन्यांपासून गॅस सिलिंडरच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. सध्या गॅस सिलिंडर १,०५० रुपयांवर पोहोचला आहे. त्यामुळे या याेजनेच्या लाभार्थ्यांनी गॅस सिलिंडर खरेदी करणे बंद करून पुन्हा आपला मोर्चा चुलीकडे वळवला आहे. पोटाची भूक भागविण्यासाठी ते चूल पेटवत आहेत. अखेर सरपणच आमची भूक भागविणार, असे महिला स्पष्टपणे सांगत आहेत. 

चुलीवरची भाकर हाच खरा स्वाभिमान...- सिलिंडरच्या किमतीत खूप वाढ केल्यामुळे महिलांना पुन्हा चुलीकडे वळावे लागले. चुलीवरचा स्वयंपाकच गोड लागतो, कारण हे स्वाभिमानाचे असते. यावेळी बहिणाबाईंच्या ओळी खऱ्या ठरतात. 

‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर... लागते हाताला चटकेतेव्हा मिळते भाकर...’ या ओळी सार्थक ठरल्या आहेत.

 

टॅग्स :Cylinderगॅस सिलेंडर