शहरं
Join us  
Trending Stories
1
भुईमूग बाजारात नेला अन् पावसामुळे वाहून गेला; महाराष्ट्रातील शेतकऱ्याला थेट केंद्रीय कृषिमंत्र्याचा कॉल; म्हणाले...
2
"भारत धर्मशाळा नाही, जिथं जगातील शरणार्थींना ठेवू शकतो..."; सुप्रीम कोर्टाची टिप्पणी
3
सूरतमध्ये २३ वर्षीय युवतीवर गँगरेप; पोलिसांनी भाजपा पदाधिकाऱ्यासह त्याच्या मित्राला केली अटक
4
प्लेऑफ्सआधी RCB ची मोठी चाल! रोहित, शुबमनवर भारी पडलेल्या झिम्बाब्वेच्या गड्यावर खेळला डाव
5
सैफुल्लाह खालिदचा खात्मा...आतापर्यंत १५ हून अधिक क्रूर दहशतवाद्यांना 'सीक्रेट किलर'ने मारले
6
IPL 2025: एकच नंबर..!! प्रिती झिंटा स्वत: जाऊन वैभव सूर्यवंशीला भेटली, केलं खास कौतुक (Video)
7
हृदयद्रावक! बहिणीच्या मुलावर आईसारखी केली माया अन् रागाच्या भरात त्यालाच संपवलं, कारण...
8
आठवड्यातून नेमका किती वेळा रेफ्रिजरेटर बंद करावा, कशामुळे होऊ शकतो लवकर खराब?
9
Mumbai Covid: मुंबईतील केईएम रुग्णालयात दोन रुग्णांचा कोविडमुळे मृत्यू; रुग्णालयाने अखेर काय सांगितलं?
10
चाळीशी ओलांडली तरी मुक्ता बर्वे का आहे सिंगल? या विवाहित दिग्दर्शकावर होतं अभिनेत्रीचं क्रश
11
"बाई आणि बाटली..." शरद पोंक्षेंकडून मुलाला दोन महत्त्वाचे सल्ले, म्हणाले "नाहीतर करिअरची वाट"
12
७ वर्षांनी 'टीम मोदी'मध्ये परतले एमजे अकबर; केंद्रीय मंत्रिपदाचा का द्यावा लागला होता राजीनामा?
13
भारताचा संघ Asia Cup 2025 मध्ये सहभागी होणार? BCCI ने दिली महत्त्वाची ताजी अपडेट
14
Shrikant Shinde On Rahul Gandhi: 'राहुल गांधींना देशभक्तीपेक्षा राजकारणात रस' श्रीकांत शिंदेंचा टोला
15
"मला आतापर्यंत भेटलेला सर्वात मेहनती भारतीय"; दिव्यांग रिक्षा चालकाला पाहून व्लॉगर भावुक
16
'सिमकार्ड नको, आता काहीतरी मोठे करा...', हरियाणाच्या तारीफला पाकिस्तानने दिले होते 'हे' काम!
17
अभिनेत्री शिल्पा शिरोडकरला कोरोनाचं निदान, सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत दिली माहिती
18
बाजारात चढ-उतार! इन्फोसिससह 'हे' शेअर्स घसरले; तुमच्या पोर्टफोलिओवर काय परिणाम?
19
Mumbai: नाल्यात अडकलेल्या मुलीला वाचवण्याच्या प्रयत्नात एका तरुणाचा दुर्दैवी मृत्यू
20
"त्यांनी माझं पॅकअप केलं होतं..", आमिर खानमुळे 'तारक मेहता...' फेम अभिनेत्याची गेली नोकरी

केवळ १२१ मंडळांकडे अधिकृत वीज जोडणी

By admin | Updated: September 29, 2014 23:06 IST

जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांकडून ५६१ नवदुर्गा आणि ५५१ शारदा मूर्तींची स्थापन करण्यात आली आहे. मात्र या एकूण १,११२ मंडळांपैकी केवळ १२१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृतपणे विजेची

एकूण १११२ मंडळ : वीजचोरीला महावितरणचेच अभयगोंदिया : जिल्ह्यात सार्वजनिक मंडळांकडून ५६१ नवदुर्गा आणि ५५१ शारदा मूर्तींची स्थापन करण्यात आली आहे. मात्र या एकूण १,११२ मंडळांपैकी केवळ १२१ सार्वजनिक मंडळांनीच अधिकृतपणे विजेची जोडणी (कनेक्शन) घेतल्याची माहिती वीज वितरण कंपनीने दिली आहे. त्यामुळे उर्वरित ९९१ मंडळांकडे असलेला वीज पुरवठा चोरीचा किंवा अवैध मार्गाने घेतलेला असल्याचे स्पष्ट होत आहे. मात्र अद्याप वीज चोरीचा एकही गुन्हा वीज कंपनीचे अधिकारी उघडकीस आणू शकलेले नाही. त्यामुळे महावितरण कंपनीने गणेश मंडळांप्रमाणेच दुर्गाेत्सव मंडळांनाही वीज चोरीची खुली सूट दिल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. देवीचा पवित्र उत्सव साजरा करताना उत्सव मंडळांनी अधिकृतरित्या विद्युत कनेक्शन घेवून उत्सव साजरा करणे अपेक्षित आहे. परंतु अनेक लोक रस्त्यारस्त्यावर देवीचे मंडप टाकून चोरीची वीज वापरत असल्याचे प्रकार दिसून येतात. नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विद्युत वितरण कंपनीतर्फे पोलीस ठाण्यांना विनंती करून दुर्गादेवीच्या मंडळांना मूर्ती मांडण्याची परवानगी देताना त्या ठिकाणी तुमच्याकडे अधिकृतरित्या वीज कनेक्शन आहे किंवा नाही याची शहनिशा करूनच परवानगी द्यावी, अशी विनंती करण्यात आली होती. पोलीस विभागाने परवानगी देताना या बाबीचा विचारच केला नाही. परंतु विद्युत विभागाने कनेक्शन न घेणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यासाठी पुढाकारही घेतला नाही. एका मंडळात विद्युत वितरण कंपनीचे कर्मचारी कारवाई करण्यास गेल्यावर त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता असते. देवीचा उत्सव हा धार्मिक उत्सव असल्यामुळे विद्युत वितरण कंपनी या मंडळांवर कारवाई करण्यास धजावत नाही. मग अशावेळी सर्वांसाठीच वीजचोरी खुली का करत नाही, असा सवाल गोंदिया शहरातील अधिकृतरित्या वीज पुरवठा घेणाऱ्या ३३ मंडळांनी केला आहे. तिरोडा सर्कलमधील ३३ मंडळांनी, गोरेगाव येथील एका मंडळाने तर गोंदिया ग्रामीण सर्कलमधील २२ मंडळांनी विद्युत कनेक्शन घेतलेले आहे. देवरी विभागांतर्गत येणाऱ्या आमगाव सर्कल अंतर्गत सात कनेक्शन, अर्जुनी/मोरगाव सर्कल अंतर्गत चार कनेक्शन, सडक/अर्जुनी सर्कल अंतर्गत ११ कनेक्शन, देवरी सर्कल अंतर्गत ७ कनेक्शन तर सालेकसा सर्कल अंतर्गत २२ कनेक्शन असे एकूण १२१ विद्युत कनेक्शन घेण्यात आले आहेत. विशेष म्हणजे महावितरण कंपनीने मंडळांसाठी स्वस्त दरात वीज देण्याची सोय केली आहे. तरीही त्याकडे मंडळांकडून दुर्लक्ष होत आहे. (तालुका प्रतिनिधी)