शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

अधिकार्‍यांच्या बंगल्यांची वाट झाली कठीण

By admin | Updated: May 17, 2014 23:45 IST

येथील सिव्हील लाईंस परिसरात सुभाष बागेच्या शेजारीच वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय निवासस्थान आहेत. सध्या येथे निवासी उप जिल्हाधिकारी ते

गोंदिया : येथील सिव्हील लाईंस परिसरात सुभाष बागेच्या शेजारीच वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय निवासस्थान आहेत. सध्या येथे निवासी उप जिल्हाधिकारी ते न्यायाधीश यासारखे वरिष्ठ अधिकारी राहतात. मात्र आश्चर्याची बाब अशी की, या अधिकार्‍यांच्या घरचा रस्ता पार उखडून गेला असून येथून ये-जा करणे कठीण झाले आहे. काही वर्षांपूर्वीच या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आजचे चित्र बघितल्यास येथे रस्ता होता की नाही असा विचार करावा लागतो. कोणत्याही शहरातील सिव्हील लाईंस भाग म्हटला की, शहरातील वरिष्ठ अधिकारी व उच्चभ्रुंचे निवासस्थान व सर्व सुविधायुक्त असा हा परिसर असतो. चांगले रस्ते, पथदिवे, स्वच्छता आदिंची पूर्तता या भागात असते व बघता क्षणीच सिव्हील लाईंस काय याबाबत समोरच्या व्यक्तीला समजून जाते. गोंदिया शहरात मात्र विपरीत परिस्थिती आहे. येथे वरिष्ठ अधिकारी व प्रतिष्ठीतांचे निवास असले तरिही पाहिजे तशा सुविधांचा येथे अभाव आहे. रस्ते तर बघता कामा नये, पथदिवे रात्री कमी व दिवसाच जास्त प्रकाशमान होतात. स्वच्छता बघायची झाल्यास पालिकेचा स्वच्छता विभागही लाजून जाणार असा घाणीने व्याप्त परिसर आहे. त्यातही विशेष बाब अशी की, सिव्हील लाईंस परिसरात असलेल्या शहरातील एकमेव सुभाष बागेच्या शेजारीच जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांचे शासकीय निवासस्थान आहेत. बालक मंदिर मार्ग म्हणून शहरात या परिसराची ओळख आहे. येथील क्वार्टर्समध्ये उप वन संरक्षक, न्यायाधीश, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, निवासी उप जिल्हाधिकारी आदींसह अन्य वरिष्ठ अधिकार्‍यांचे निवासस्थान आहेत. त्यांना आवागमनासाठी बालकमंदिर मार्ग हा एकच रस्ता आहे. मात्र या रस्त्याची पार दुर्गत झाली आहे. हा डांबरी रस्ता असून आजघडीला मात्र या रस्त्यावरील डांबरीकरण उखडल्याचे चित्र आहे. तर रस्त्यावर मोठ-मोठाले खड्डे पडले असल्याने या मार्गाने ये-जा करणे एक डोकेदुखीच झाली आहे. शिवाय रस्त्यावर सफाईचा अभाव आहे. रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणात कचर्‍यांचे ढिगार लागल्याचे चित्र. काही वर्षांपूर्वी या रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र आज या रस्त्यावर डांबरीकरणाचे नामोनिशान शिल्लक नाही. रस्ता चांगलाच उखडलेला असल्याने येथून वाहतूक करणे एक कसरत असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. शहरातील सामान्य नागरिकांचा तर कुणीच वाली नाही. मात्र नगर प्रशासनाने जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकार्‍यांनाही सोडले नाही. (शहर प्रतिनिधी)