शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
3
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
4
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
5
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
6
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
7
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
8
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
9
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
10
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
11
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
12
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
13
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
14
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
15
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
16
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
17
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
18
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
19
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
20
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!

जनता दरबारात अधिकारी-गावकरी आमने-सामने ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 26, 2021 04:31 IST

अर्जुनी-मोरगाव : ५० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावाचे झाशीनगर येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनअंतर्गत अपेक्षित सुविधा झाशीनगर येथे न ...

अर्जुनी-मोरगाव : ५० वर्षांपूर्वी पुनर्वसन झालेल्या गावाचे झाशीनगर येथे पुनर्वसन करण्यात आले. मात्र, पुनर्वसनअंतर्गत अपेक्षित सुविधा झाशीनगर येथे न केल्यामुळे नागरिकांना अजूनही अनेक अडचणी भेडसावत आहेत. समस्यांच्या बाबतीत संबंधित विभागाकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांच्या सूचनेनुसार शुक्रवारी (दि.२४) झाशीनगर येथे जनता दरबार घेण्यात आला. यात संबंधित सर्व विभागाचे अधिकारी, जनप्रतिनिधी व गावकरी आमने-सामने आले व झाशीनगरवासीयांच्या समस्यांवर चर्चेचा मुहूर्त निघाला.

जनता दरबारात झाशीनगरचे पुनर्वसन झाले; परंतु आबादी नकाशा तयार करण्यात आला नाही. पुनर्वसनकरिता दिलेली जमीन वनविभागाने त्यांच्या रेकॉर्डवरून कमी केली नाही. पुनर्वसित गावातील रस्ते व नाल्यांची कामे पूर्ण झाली नाहीत, पिण्याच्या शुद्ध पाण्याची सोय नाही, डिमांड भरूनही वीज मीटर मिळाले नाही, झाशीनगर उपसा सिंचन योजना पूर्ण झाली नाही, अतिक्रमणधारकांचे पट्टे मिळाले नाहीत, मिळालेले पट्टेधारकांचे सातबारा व नकाशा नाही आदी समस्या झाशीनगरवासीयांनी जनता दरबारात मांडल्या व त्यावर चर्चा झाली. यावर यातील कामे मार्गी लावण्यास सुरुवात झाली असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. जनता दरबारात उपविभागीय अधिकारी विनोद मेश्राम, गटविकास अधिकारी विलास निमजे, तालुका आरोग्य अधिकारी विजय मेश्राम, जलसंपदा विभाग अमृतराज पाटील, ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता राकेश चांदेवार, वीज विभाग उपअभियंता सहारे, गटविकास अधिकारी मांढरे, लघु पाणीपुरवठा सी. के. पटले, तलाठी मोहरले, पाटबंधारे विभाग उपअभियंता लंजे, यशवंत गणवीर, सरपंच आशा गढ़वार, उपसरपंच रवींद्र नाईक, सुदाम गुरुनेले, अविनाश रहिले, डॉ. यशवंत गुरुनेले, दिलीप कोरेटी यांच्यासह गावकरी उपस्थित होते.