शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

शिक्षणाधिकारी कार्यालय प्रभाऱ्यांच्या खांद्यावर

By admin | Updated: July 27, 2014 00:09 IST

जिल्ह्यातील शाळांची भौतिक तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात माणसेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची भौतिक तपासणी होत नाही. एनकेन प्रकारे या शाळांची तपासणी केली

तीन शाळांना नोटीस : रिक्तपदांअभावी शाळांची तपासणीच होत नाहीगोंदिया : जिल्ह्यातील शाळांची भौतिक तपासणी करण्यासाठी शिक्षणाधिकारी कार्यालयात माणसेच नाही. त्यामुळे जिल्ह्यातील शाळांची भौतिक तपासणी होत नाही. एनकेन प्रकारे या शाळांची तपासणी केली जावी यासाठी संबंधित तालुक्यातील गटशिक्षणाधिकाऱ्यांवर भार टाकला जातो. परंतु शाळा सुरू होवून महिनाभराचा कालावधी लोटला असताना जिल्ह्यातील नाममात्र शाळांची तपासणी करण्यात शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. यात माध्यमिक विभागाच्या शाळांची तपासणी काही प्रमाणात झाली, मात्र प्राथमिक विभागांतर्गत असलेल्या शाळांची तपासणीच होत नसल्याची माहिती आहे. जिल्ह्यात माध्यमिक विभागाच्या ३१२ शाळा आहेत. यात अनुदानित १८९, जिल्हा परिषद व नगर परिषदेच्या २८, शासकीय आश्रमशाळा ११, खासगी आश्रमशाळा २८, विना अनुदानित आश्रमशाळा २८ व कायम विना अनुदानित शाळा २९ आहेत. या सर्व शाळांची तपासणी करण्यासाठी योग्य मनुष्यबळ नसल्यामुळे ते शाळा तपासणीचे टार्गेट संबंधित गटशिक्षणाधिकारी यांना देण्यात आले. शिक्षणाधिकारी माध्यमिक यांना २० शाळा, उपशिक्षणाधिकारी माध्यमिक ४० शाळा, शिक्षणाधिकारी माध्यमिक २०, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक ३०, गटशिक्षणाधिकारी गोंदिया ४०, गटशिक्षणाधिकारी तिरोडा २४, गटशिक्षणाधिकारी आमगाव १४, गटशिक्षणाधिकारी देवरी १२, गटशिक्षणाधिकारी सालेकसा १०, गटशिक्षणाधिकारी गोरेगाव २०, गटशिक्षणाधिकारी सडक/अर्जुनी १५ व गटशिक्षणाधिकारी अर्जुनी/मोरगाव ३५ अशा २८० शाळांची तपासणी करण्याचे उद्दिष्ट शिक्षण विभागाने ठेवले आहे. माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात शिक्षणाधिकारी व उपशिक्षणाधिकारी हे दोन पदे मंजूर आहेत. परंतु या ठिकाणी एक अधीक्षक, एक विज्ञान पर्यवेक्षक, एक विस्तार अधिकारी, दोन विषयतज्ज्ञ, आठ लिपिक, दोन परिचर यांची गरज असतानाही हे पदच मंजूर नाहीत. त्यामुळे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयाचा कामकाज सुरळीत चालू ठेवण्यासाठी प्राथमिक शिक्षण विभागातून एक विस्तार अधिकारी, तीन लिपिक व डायेटमधील दोन लिपिक या ठिकाणी प्रतिनियुक्तीवर आणण्यात आले आहेत. जिल्हा नक्षलग्रस्त असल्यामुळे या माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात वाहन चालकाचे पद मंजूर आहे. परंतु वाहन नाही अन् वाहन चालकही नाही. कार्यालयातील अनेक योजना राबविण्यासाठी अपूरा मनुष्यबळ आहे. त्यामुळे प्रतिनियुक्तीवर असलेल्या कर्मचाऱ्यांना ताणतनावात काम करावे लागते. (तालुका प्रतिनिधी)