शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

राजकारणाचा उद्देश केवळ जनहित व जनसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:57 IST

राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले. गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा कामठा......

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कामठा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले.गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा कामठा येथील शिवशंकर भात गिरणीच्या प्रांगणात पार पडला. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, अशोक गुप्ता, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, रमेश गौतम, गंगाधर परशुरामकर, केतन तुरकर, सभापती वंदना बोरकर, मनोज दहीकर, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, प्रकाश देवाधारी, अखिलेश शेठ, विनोद पटले, सौरभ गौतम, सुनिता दोनोडे, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, यशवंत गेडाम, किर्ती पटले, जगदीश बहेकार, दिनेश हरिणखेडे, मोहित गौतम, कान्हा बघेले, विनायक खैरे, नूरूदास दिहारी, रामू चुटे, डॉ. शिवणकर, संतोष बिसेन, गंगाराम कापसे, सुरेश कावडे, विकास गेडाम, गंगाराम मानकर, हरिप्रसाद मरठे, महेशप्रसाद मस्करे, हामीदभाई कुरेशी, धनंजय गुप्ता, नाजिम खान, मुकेश तुरकर, रमन उके, सपना अग्रवाल, शोभा गणवीर, योगी येळे, फोगल साठवणे, शामलाल मरस्कोल्हे, भागरता धुर्वे व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पटेल म्हणाले, विरोधी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक आरोप लावून स्वत:चा उदोउदो केला. परंतु विकासाच्या केवळ गोष्टी केल्याने विकास होत नाही. त्यासाठी काम करावे लागते. विकासाचा ढिंढोरा पिटणारे गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी साधारण कामही करू शकले नाही. तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचे लक्ष्य आहे. आज प्रश्न विचारण्याची आमची पाळी आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारावे की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून तुम्ही न्याय का करीत नाही. ज्या जीएसटीचा विरोध केला त्याच जीएसटीला वाढवून तुम्ही लागू केले. खोटे आश्वासने देवून भाजप सरकारने मागील तीन वर्षांत काय करून दाखविले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निडरपणे कार्य करावे. पक्षाच्या संघटनेसाठी घरोघरी पोहचावे. जबाबदारीने कार्य करा. गोंदिया -भंडारा जिल्ह्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी इतर मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले.संचालन जितेश टेंभरे व सुनील पटले यांनी केले. आभार बहादूरसिंह यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजकुमार गजभिये, देवलाल लिल्हारे, समरू सेवतकर, युसुफ शेख, इनायत शेख, प्रकाश मेंढे, अरूण दहीकर, सुभाष माहुले, काशिराम भेलावे, बाबा सुलाखे, विरेंद्र सिंहमारे, लोकचंद मुंडेले, बाबुसिंह खोहरे, देवेंद्र पागोटे, मोतीराम शिवणकर, उदयसिंह खोहरे यांनी सहकार्य केले.इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशयाप्रसंगी परिसरातील भाजप, काँग्रेस, शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा स्वागत खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यात दुर्गासिंग नागपुरे, मनोज लिल्हारे, अफसर खान, रतन दमाहे, गजनलाल नागपुरे, निलंक तेलासे, परमानंद मेश्राम, अंकुश वासनिक, अनिपल उके, अमित वासनिक, मुलचंद खोहरे, दुर्योधन वासनिक, राजेंद्र गजभिये, योगेंद्र कटरे, कासमभाई शेख, जबराम रणगिरे, मनिष लिल्हारे, राजेंद्र सोनवाने, ज्ञानिराम चौधरी, संतोष चौधरी, कैलाश वाघाडे, मिथून मोहारे, राजू पाटील, संतोष ताटीकर, दिलीप टेकाम, मनोज वाघाडे, बिसन नेवारे, दिनेश नेवारे, गौतम बहेकार, रोहित देवगडे, राधेश्याम मेंढे, इंद्रराज लिल्हारे, उद्रेश बुरडे, दिलीप लिल्हारे, प्रकाश मेंढे यांचा समावेश आहे

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल