शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

राजकारणाचा उद्देश केवळ जनहित व जनसेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 21:57 IST

राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले. गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा कामठा......

ठळक मुद्देप्रफुल्ल पटेल : कामठा येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचे संमेलन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राजकारणाचा प्रथम आणि अंतिम उद्देश नेहमीच जनहित व जनसेवा असावा, असे प्रतिपादन खा. प्रफुल्ल पटेल यांनी यांनी येथे केले.गोंदिया तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने कामठा, पांजरा, बिरसोला व आसोली जिल्हा परिषद क्षेत्रातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा मेळावा कामठा येथील शिवशंकर भात गिरणीच्या प्रांगणात पार पडला. या वेळी ते मार्गदर्शन करीत होते.याप्रसंगी प्रामुख्याने माजी आ. राजेंद्र जैन, विजय शिवणकर, नरेश माहेश्वरी, विनोद हरिणखेडे, अशोक गुप्ता, कुंदन कटारे, बालकृष्ण पटले, रमेश गौतम, गंगाधर परशुरामकर, केतन तुरकर, सभापती वंदना बोरकर, मनोज दहीकर, खुशबू टेंभरे, रजनी गौतम, प्रकाश देवाधारी, अखिलेश शेठ, विनोद पटले, सौरभ गौतम, सुनिता दोनोडे, सुरेश हर्षे, राजेश भक्तवर्ती, यशवंत गेडाम, किर्ती पटले, जगदीश बहेकार, दिनेश हरिणखेडे, मोहित गौतम, कान्हा बघेले, विनायक खैरे, नूरूदास दिहारी, रामू चुटे, डॉ. शिवणकर, संतोष बिसेन, गंगाराम कापसे, सुरेश कावडे, विकास गेडाम, गंगाराम मानकर, हरिप्रसाद मरठे, महेशप्रसाद मस्करे, हामीदभाई कुरेशी, धनंजय गुप्ता, नाजिम खान, मुकेश तुरकर, रमन उके, सपना अग्रवाल, शोभा गणवीर, योगी येळे, फोगल साठवणे, शामलाल मरस्कोल्हे, भागरता धुर्वे व इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते.पटेल म्हणाले, विरोधी पक्षाने राष्ट्रवादी काँग्रेसवर अनेक आरोप लावून स्वत:चा उदोउदो केला. परंतु विकासाच्या केवळ गोष्टी केल्याने विकास होत नाही. त्यासाठी काम करावे लागते. विकासाचा ढिंढोरा पिटणारे गोंदिया-भंडारा जिल्ह्यासाठी साधारण कामही करू शकले नाही. तर दुसरीकडे संपूर्ण जिल्ह्याचा विकास करण्याचा आमचे लक्ष्य आहे. आज प्रश्न विचारण्याची आमची पाळी आहे. राष्टÑवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मोठमोठे दावे करणाऱ्या भाजपच्या नेत्यांना विचारावे की, शेतकऱ्यांच्या समस्या सोडवून तुम्ही न्याय का करीत नाही. ज्या जीएसटीचा विरोध केला त्याच जीएसटीला वाढवून तुम्ही लागू केले. खोटे आश्वासने देवून भाजप सरकारने मागील तीन वर्षांत काय करून दाखविले. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी निडरपणे कार्य करावे. पक्षाच्या संघटनेसाठी घरोघरी पोहचावे. जबाबदारीने कार्य करा. गोंदिया -भंडारा जिल्ह्यांच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही, असे त्यांनी सांगितले. या वेळी इतर मान्यवरांनीसुद्धा मार्गदर्शन केले.संचालन जितेश टेंभरे व सुनील पटले यांनी केले. आभार बहादूरसिंह यादव यांनी मानले. कार्यक्रमासाठी राजकुमार गजभिये, देवलाल लिल्हारे, समरू सेवतकर, युसुफ शेख, इनायत शेख, प्रकाश मेंढे, अरूण दहीकर, सुभाष माहुले, काशिराम भेलावे, बाबा सुलाखे, विरेंद्र सिंहमारे, लोकचंद मुंडेले, बाबुसिंह खोहरे, देवेंद्र पागोटे, मोतीराम शिवणकर, उदयसिंह खोहरे यांनी सहकार्य केले.इतर पक्षांतील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेशयाप्रसंगी परिसरातील भाजप, काँग्रेस, शिवसेना पक्षातील कार्यकर्त्यांनी राष्टÑवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा स्वागत खा. प्रफुल पटेल यांच्या हस्ते करण्यात आला. यात दुर्गासिंग नागपुरे, मनोज लिल्हारे, अफसर खान, रतन दमाहे, गजनलाल नागपुरे, निलंक तेलासे, परमानंद मेश्राम, अंकुश वासनिक, अनिपल उके, अमित वासनिक, मुलचंद खोहरे, दुर्योधन वासनिक, राजेंद्र गजभिये, योगेंद्र कटरे, कासमभाई शेख, जबराम रणगिरे, मनिष लिल्हारे, राजेंद्र सोनवाने, ज्ञानिराम चौधरी, संतोष चौधरी, कैलाश वाघाडे, मिथून मोहारे, राजू पाटील, संतोष ताटीकर, दिलीप टेकाम, मनोज वाघाडे, बिसन नेवारे, दिनेश नेवारे, गौतम बहेकार, रोहित देवगडे, राधेश्याम मेंढे, इंद्रराज लिल्हारे, उद्रेश बुरडे, दिलीप लिल्हारे, प्रकाश मेंढे यांचा समावेश आहे

टॅग्स :prafull patelप्रफुल्ल पटेल