शहरं
Join us  
Trending Stories
1
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
2
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
3
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
4
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
5
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
6
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
7
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
8
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
9
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
10
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
11
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
12
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
13
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
14
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
15
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
16
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
17
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
18
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
19
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
20
'या' देशात वडील मुलाला देतात कंडोम तर आई बॅगेत गर्भनिरोधक गोळ्या ठेवते; कारण ऐकून हैराण व्हाल

ओबीसी कृती समितीने व्यक्त केला पालकमंत्र्यांवर रोष

By admin | Updated: March 29, 2016 03:05 IST

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास

गोंदिया : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास वेळ देत नाहीत, चर्चा करीत नाहीत असा आरोप करीत ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध नारेबाजी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी ओबीसी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अन्यथा त्यांना गावबंदी, जिल्हाबंदी करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र आपण ओबीसी समाजाबद्दल कोणतेही अपशब्द बोललो नसताना काही लोक राजकीय भूमिकेतून अशा पद्धतीने आरोप करीत असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी स्पष्ट केले.गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, नॉन क्रिमिलेयरची मर्यादा वाढविणे, ओबीसी समाजाची जनगणना अशा अनेक मुद्द्यांवर ओबीसी संघर्ष कृती समितीचा संघर्ष सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री या नात्याने ना.बडोले यांनी सदर जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. यातूनच सोमवारी दुपारी ना.बडोले गोंदियातील सामाजिक न्यायभवनातील कार्यक्रम आटोपून निघत असताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी अमर वराडे, बबलू कटरे, बी.एम.करमकर, कैलाश भेलावे, आशिष नागपुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. आपल्या मागण्यांचे निवेदन ना.बडोले यांना देऊन चर्चाही करण्यात आली. मात्र त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली. ‘पालकमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, नॉन क्रिमिलेयरचे झाले काय, पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देणे सुरू केले. हा प्रकार पाहून पालकमंत्री चिडून अपशब्द बोलले, असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी- बडोले४काहीही कारण नसताना घोषणाबाजी सुरू केल्यामुळे मी एका ओबीसी कार्यकर्त्याला हा काय प्रकार आहे असे म्हणून नाराजी व्यक्त केली. पण ओबीसी समाजाचा अनादर होईल असे कोणतेही शब्द बोललो नाही. ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी आहे. केवळ तुम्ही ओबीसी समाजाचे आहे म्हणून ओबीसींचे नेते झाले असे नाही. मीसुद्धा ओबीसी समाजासाठी आपल्या विभागामार्फत शिष्यवृत्तीसाठी निधी मिळवून दिला. केवळ राजकीय भूमिकेतून काही लोक असा आरोप करीत असतील तर त्याला अर्थ नाही, अशा शब्दात ना.राजकुमार बडोले यांनी आपली बाजू सांगितली.