शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

ओबीसी कृती समितीने व्यक्त केला पालकमंत्र्यांवर रोष

By admin | Updated: March 29, 2016 03:05 IST

राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास

गोंदिया : राज्याचे सामाजिक न्यायमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राजकुमार बडोले ओबीसी समाजाच्या समस्या ऐकून घेण्यास वेळ देत नाहीत, चर्चा करीत नाहीत असा आरोप करीत ओबीसी संघर्ष कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी पालकमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर त्यांच्याविरूद्ध नारेबाजी केली. यावेळी पालकमंत्र्यांनी ओबीसी समाजाबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप करीत समितीच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. पालकमंत्र्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत अन्यथा त्यांना गावबंदी, जिल्हाबंदी करू, असा इशाराही पदाधिकाऱ्यांनी दिला. मात्र आपण ओबीसी समाजाबद्दल कोणतेही अपशब्द बोललो नसताना काही लोक राजकीय भूमिकेतून अशा पद्धतीने आरोप करीत असल्याचे पालकमंत्री बडोले यांनी स्पष्ट केले.गेल्या काही महिन्यांपासून ओबीसी समाजातील विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती, नॉन क्रिमिलेयरची मर्यादा वाढविणे, ओबीसी समाजाची जनगणना अशा अनेक मुद्द्यांवर ओबीसी संघर्ष कृती समितीचा संघर्ष सुरू आहे. यासंदर्भात सामाजिक न्यायमंत्री या नात्याने ना.बडोले यांनी सदर जिल्हा समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करावी आणि मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी अशी समितीच्या पदाधिकाऱ्यांची मागणी आहे. यातूनच सोमवारी दुपारी ना.बडोले गोंदियातील सामाजिक न्यायभवनातील कार्यक्रम आटोपून निघत असताना ओबीसी संघर्ष कृती समितीचे पदाधिकारी अमर वराडे, बबलू कटरे, बी.एम.करमकर, कैलाश भेलावे, आशिष नागपुरे व इतर पदाधिकाऱ्यांनी त्यांना थांबविले. आपल्या मागण्यांचे निवेदन ना.बडोले यांना देऊन चर्चाही करण्यात आली. मात्र त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी राज्य सरकारविरूद्ध घोषणाबाजी सुरू केली. ‘पालकमंत्री हाय हाय, मुख्यमंत्री हाय हाय, नॉन क्रिमिलेयरचे झाले काय, पालकमंत्री मुर्दाबाद’ अशा घोषणा देणे सुरू केले. हा प्रकार पाहून पालकमंत्री चिडून अपशब्द बोलले, असा आरोप समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. त्यामुळे त्यांनी आपले शब्द मागे घ्यावेत, अन्यथा त्यांना गावबंदी करू, असा इशारा त्यांनी दिला आहे. (जिल्हा प्रतिनिधी)ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी- बडोले४काहीही कारण नसताना घोषणाबाजी सुरू केल्यामुळे मी एका ओबीसी कार्यकर्त्याला हा काय प्रकार आहे असे म्हणून नाराजी व्यक्त केली. पण ओबीसी समाजाचा अनादर होईल असे कोणतेही शब्द बोललो नाही. ओबीसी समाजाबद्दल मला आपुलकी आहे. केवळ तुम्ही ओबीसी समाजाचे आहे म्हणून ओबीसींचे नेते झाले असे नाही. मीसुद्धा ओबीसी समाजासाठी आपल्या विभागामार्फत शिष्यवृत्तीसाठी निधी मिळवून दिला. केवळ राजकीय भूमिकेतून काही लोक असा आरोप करीत असतील तर त्याला अर्थ नाही, अशा शब्दात ना.राजकुमार बडोले यांनी आपली बाजू सांगितली.