शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
2
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
3
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
4
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
5
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
6
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
7
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
8
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
9
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
10
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
11
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
12
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
13
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
14
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
15
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
16
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
17
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
18
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
19
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
20
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू

पोषण आहारासाठी मिळाले ३.१३ कोटी

By admin | Updated: June 21, 2015 01:03 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. यावर्षीही पोषण आहारासाठी जुनाच मेनू कायम ठेवला असून जुन्याच एजन्सीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना हा आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाखांचा निधीही जिल्ह्यातील शाळांसाठी देण्यात आला आहे.या पोषण आहाराला लागणारा खर्च २५ टक्के राज्य शासन तर ७५ टक्के केंद्र शासन देते. सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी गोंदिया जिल्ह्यातील १३५३ शाळांमधील विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या मेनूत अद्याप कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या दिवशीपासून पोषण आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाख २२ हजार रूपये जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. मागील वर्षी ज्या संघटनेने धान्याचा पुरवठा केला त्याच दि महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटीव्ह माकॅटींग फेडरेशनला दोन महिन्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट वाढवून देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील बालकांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्याची २५ टक्के रक्कम ७९ लाख ९० हजार तर केंद्र शासनाने ७५ टक्के रक्कम म्हणजे २ कोटी ३३ लाख ३२ हजार रूपये पाठविली आहे. १ लाख २८ हजार बालकांना मिळणार भोजनमध्यान्ह भोजन देण्याची सोय शासनाने केल्यामुळे यंदा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख २८ हजार ३६ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. वर्ग १ ते ५ वीे तील ७५ हजार १४७ तर वर्ग ६ ते ८ चे ५२ हजार ८८९ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. या भोजनासाठी जुलै महिन्यासाठी निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. प्राथमिक विद्यार्थ्यासाठी ३६ लाख ८२ हजार तर उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ५३ हजार रूपये वितरीत करण्यात आला आहे. दरपत्रक निश्चितवर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्याना प्रत्येक विद्यार्थ्यामागे १०० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ३.५० रूपये, वर्ग ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ५.२० रूपये दिले जातात. शासनाने या शालेय पोषण आहारात कोणकोणते साहित्य द्यावे ते प्रपत्रात नमूद करूनही प्रत्येक वस्तूचे दरही ठरवून दिले आहे. मूगडाळ ८४ रूपये किलो, मसूर डाळ ७३ रूपये किलो, तूर डाळ ८४.५० रूपये किलो, हरभरा ४८ रूपये किलो, चवळी ६१.७५, मटकी ६९, मूग ७८, वाटाणा ५९, सोयाबीन तेल ९९, कांदा, लसून १८५, हळद १९०, मीठ ९, जिरे १८०, मोहरे ५२ रूपये प्रतिकिलो असे दर ठरविण्यात आले आहे.