शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

पोषण आहारासाठी मिळाले ३.१३ कोटी

By admin | Updated: June 21, 2015 01:03 IST

ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे.

गोंदिया : ग्रामीण भागातील विद्यार्थ्याची शालेय उपस्थिती वाढण्यासोबत त्यांना सकस आहार मिळण्यासाठी शाळेतच मध्यान्ह भोजन मिळण्याची व्यवस्था शासनाने केली आहे. यावर्षीही पोषण आहारासाठी जुनाच मेनू कायम ठेवला असून जुन्याच एजन्सीला दोन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. पहिल्या दिवशीपासून विद्यार्थ्यांना हा आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाखांचा निधीही जिल्ह्यातील शाळांसाठी देण्यात आला आहे.या पोषण आहाराला लागणारा खर्च २५ टक्के राज्य शासन तर ७५ टक्के केंद्र शासन देते. सन २०१५-१६ या शैक्षणिक सत्रासाठी गोंदिया जिल्ह्यातील १३५३ शाळांमधील विद्यार्थ्यांना हा पोषण आहार दिला जाणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी गतवर्षीच्या मेनूत अद्याप कोणताही बदल केलेला नाही. पहिल्या दिवशीपासून पोषण आहार मिळावा यासाठी ३ कोटी १३ लाख २२ हजार रूपये जिल्ह्याच्या शिक्षण विभागाला दिले आहेत. मागील वर्षी ज्या संघटनेने धान्याचा पुरवठा केला त्याच दि महाराष्ट्र स्टेट को आॅपरेटीव्ह माकॅटींग फेडरेशनला दोन महिन्यासाठी पोषण आहार पुरवठ्याचा कंत्राट वाढवून देण्यात आला आहे. गोंदिया जिल्ह्यातील बालकांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारासाठी राज्य शासनाने पहिल्या टप्याची २५ टक्के रक्कम ७९ लाख ९० हजार तर केंद्र शासनाने ७५ टक्के रक्कम म्हणजे २ कोटी ३३ लाख ३२ हजार रूपये पाठविली आहे. १ लाख २८ हजार बालकांना मिळणार भोजनमध्यान्ह भोजन देण्याची सोय शासनाने केल्यामुळे यंदा गोंदिया जिल्ह्यातील एक लाख २८ हजार ३६ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. वर्ग १ ते ५ वीे तील ७५ हजार १४७ तर वर्ग ६ ते ८ चे ५२ हजार ८८९ बालकांना मध्यान्ह भोजनाचा लाभ मिळणार आहे. या भोजनासाठी जुलै महिन्यासाठी निधी तालुकास्तरावर वितरीत करण्यात आला आहे. प्राथमिक विद्यार्थ्यासाठी ३६ लाख ८२ हजार तर उच्च माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी ३२ लाख ५३ हजार रूपये वितरीत करण्यात आला आहे. दरपत्रक निश्चितवर्ग १ ते ५ च्या विद्यार्थ्याना प्रत्येक विद्यार्थ्यामागे १०० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ३.५० रूपये, वर्ग ६ ते ८ च्या विद्यार्थ्यांसाठी १५० ग्रॅम तांदूळ व इतर साहित्यासाठी ५.२० रूपये दिले जातात. शासनाने या शालेय पोषण आहारात कोणकोणते साहित्य द्यावे ते प्रपत्रात नमूद करूनही प्रत्येक वस्तूचे दरही ठरवून दिले आहे. मूगडाळ ८४ रूपये किलो, मसूर डाळ ७३ रूपये किलो, तूर डाळ ८४.५० रूपये किलो, हरभरा ४८ रूपये किलो, चवळी ६१.७५, मटकी ६९, मूग ७८, वाटाणा ५९, सोयाबीन तेल ९९, कांदा, लसून १८५, हळद १९०, मीठ ९, जिरे १८०, मोहरे ५२ रूपये प्रतिकिलो असे दर ठरविण्यात आले आहे.