शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवारांची वसंतदादा शुगरच्या बैठकीला दांडी! पुण्यात राजकीय खलबतं; निवडणुकीच्या रणधुमाळीमुळे काकांनी बोलावलेली बैठक चुकवली?
2
मीरारोडमध्ये भाजपाकडून हळदीकुंकूच्या आड भेटवस्तूंचे वाटप; काँग्रेसची गुन्हा दाखल करण्याची मागणी 
3
कुलदीप सेंगर पुन्हा तुरुंगात जाणार? स्थगित शिक्षेविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी करणार सर्वोच्च न्यायालय
4
'ऑपरेशन सिंदूर'यशस्वी! पाकिस्तानने सात महिन्यानंतर कबूल केले; ब्रह्मोसचा जबरदस्त निशाणा, नूर खान एअरबेसवर विध्वंस
5
सावधान! मोबाईलवर येणारा एक मेसेज तुमचं बँक खातं रिकामं करू शकतो; काय आहे हा नवा 'SIM Box Scam'?
6
राज-उद्धव एकत्र; भाजप-शिंदेसेना तह आणि युद्ध..!
7
'मला वाटलं पुढचा स्टीव्ह जॉब्स मीच आहे..;' सर्गेई ब्रिन यांनी गुगलच्या 'या' अपयशाबद्दल व्यक्त केली खंत
8
"त्यांनी कधीच मला सुनेसारखं वागवलं नाही...", सासूबाईंच्या निधनानंतर अमृता देशमुखची डोळ्यांत पाणी आणणारी पोस्ट
9
निसर्गाचा अजब चमत्कार! पृथ्वीवर एक असे ठिकाण जिथे कधीच पडत नाही थंडी; शास्त्रज्ञही थक्क
10
"ते हात मिळवणार नसतील, तर आम्हालाही गरज नाही!" पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांनी ओकले भारताविरुद्ध विष
11
BMC Election 2026: नवनाथ बन, तेजस्वी घोसाळकर, सोमय्यांच्या पुत्राला भाजपकडून उमेदवारी; वॉर्डही ठरले, एबी फॉर्मचे वाटप सुरू
12
टॅरिफ लादणाऱ्या ट्रम्पना धक्का! भारताची निर्यात विक्रमी शिखरावर! २०२६ मध्येही निर्यातीचा 'वारू' सुसाट राहणार
13
५०० वर्षांनी ५ दुर्मिळ योगात २०२६ प्रारंभ: ८ राशींना लक्षणीय लाभ, अकल्पनीय पद-पैसा; शुभ घडेल!
14
Akola Municipal Election 2026: इच्छुकांची धाकधूक वाढली, भाजपची यादी शेवटच्या क्षणी; कारण...
15
सलमानच्या 'बॅटल ऑफ गलवान' अन् आलियाचा 'अल्फा' यांच्यात क्लॅश! 'हा' सिनेमा होणार पोस्टपोन?
16
"जयपूरमध्ये बॉम्बस्फोट होणार!", मध्यरात्री फोन करून धमकी दिली; पोलिसांनी पकडल्यावर वेटर जे म्हणाला... 
17
ठाण्यात शिंदेसेनेपुढे भाजपने नांगी टाकली? शिंदेसेना ८१ ऐवजी ९१ जागा लढणार
18
Astro Tips: तुमच्या हाताच्या मधल्या बोटात लोखंडी अंगठी आहे का? नसेल तर 'हे' नक्की वाचा!
19
मुंबईत उमेदवार भाजपचा अन् चिन्ह मात्र शिंदेसेनेचे? आता उच्च पातळीवर होणार चर्चा
20
अखेर ठरलं! दोन्ही राष्ट्रवादी महापालिकेत एकत्र लढणार; अजित पवार यांची घोषणा
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात१२ हजार २२० हेक्टरमध्ये रोपवाटिका

By admin | Updated: June 28, 2014 01:06 IST

जिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे.

देवानंद शहारे गोंदियाजिल्हा कृषी अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने संपूर्ण जिल्ह्यात आतापर्यंत १२ हजार २२० हेक्टर क्षेत्रात धानाची रोपवाटिका तयार करण्यात आल्याची नोंद घेतली आहे. अधूनमधून वातावरण ढगाळलेले असते. परंतु १८ जून नंतर पाऊस पडले नाही. यानंतर २७ जूनला पहाटे जिल्ह्यात काही प्रमाणात पाऊस पडले. त्यामुळे सदर रोपवाटिका जिवंत राहण्यास थोडीफार मदत झाल्याने शेतकरी थोडक्यात सुखावला आहे. गतवर्षी जिल्ह्यात धान पिकाचे सरासरी क्षेत्र एक लाख ८४ हजार ९०० हेक्टर होते. एवढ्या क्षेत्रात मागील वर्षी धानाचे पीक लावण्यात आले होते. तर याच्या १० टक्के क्षेत्रात रोपवाटिका तयार करण्यात आली होती. यंदा कृषी विभागाने एक लाख ९० हजार हेक्टर क्षेत्रात जिल्ह्यात भातपीक लागवडीचे नियोजन केले आहे. याच्या १० टक्के क्षेत्रात म्हणजे १९ हजार हेक्टर क्षेत्रात रोपवाटिका यंदा तयार होणे अपेक्षित होते. मात्र पाऊस पडत नसल्याने काही शेतकऱ्यांनी धानाची रोपवाटिका लावण्यास सध्या अनुत्सुकता दाखविल्याचे दिसून येते. मागील आडवड्यात १८ जून रोजी पाऊस पडला होता. त्यानंतर पाऊस न पडल्याने शेतकरी त्रस्त झाले होते. तीव्र उन्ह पडत होते व रोपवाटिकेला पाण्याची गरज होती. त्यामुळे रोपवाटिका नष्ट तर होणार नाही ना? शारीरिक श्रम व आर्थिक फटका सहन करून दुबार पेरणीचे संकट तर ओढावणार नाही? अशा शंकाकुशंकांनी शेतकऱ्यांना पछाडले होते. मात्र २७ जूनच्या पहाटे थोड्या प्रमाणात आलेल्या पावसाने त्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. २७ जूनला दिवसभर ढगाळलेले वातावरण होते. मात्र पाऊस सायंकाळपर्यंत पडला नसल्याने पुन्हा शेतकऱ्यांना निराशेने घेरण्याची स्थिती निर्माण झाली आहे. सन २०१३ मध्ये २६ जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण २८२४.१ मिमी पाऊस पडले होते. मात्र यंदा २६ जूनपर्यंत जिल्ह्यात ५६३.१ मिमी पाऊस पडले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा तब्बल २,२६१ मिमी पाऊस जिल्ह्यात कमी पडले. याशिवाय यंदा पाऊस कमी प्रमाणात पडण्याची शक्यतासुद्धा कृषी विभागाने वर्तविली आहे. या प्रकारांमुळे काही शेतकऱ्यांनी आतापर्यंत धान बियाण्यांची पेरणीसुद्धा केली नाही. मात्र पुन्हा आठ-दहा दिवस पाऊस पडले नाही तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावणार, ऐवढे मात्र नक्की.