शहरं
Join us  
Trending Stories
1
"अख्खा जिल्हा, ९९१ एकर जमीन एकाच कंपनीला दिली, ही काय चेष्टा लावलीय का?" हायकोर्ट संतापले
2
माणुसकीला काळीमा फासणारी घटना! ४ वर्षाच्या मुलाचं गुप्तांग कापलं; कारण ऐकून संताप अनावर होईल
3
टोल नाक्यावर सैन्यातील जवानाला मारहाण, NHAI ची मोठी कारवाई; कंपनीला २० लाख दंड, सोबतच...
4
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
5
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
6
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
7
Asia Cup 2025 : आता बुमराहला विश्रांतीच घेऊ द्या! आशिया कप स्पर्धेआधी असं का म्हणाले गावसकर?
8
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
9
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
10
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
11
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
12
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
13
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
14
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
15
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
16
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
17
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
18
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
19
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
20
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...

आकडे फिरले ! मात करणाऱ्यांपेक्षा बाधित अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

गोंदिया : मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने घटत चालली असतानाच सोमवारी (दि.२४) जिल्ह्यातील आकडे पुन्हा एकदा फिरले. सोमवारी ...

गोंदिया : मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने घटत चालली असतानाच सोमवारी (दि.२४) जिल्ह्यातील आकडे पुन्हा एकदा फिरले. सोमवारी जिल्ह्यात १४९ नवीन बाधितांची भर पडली असून, १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच, मात करणाऱ्यांपेक्षा बाधित जास्त आढळून आले आहेत. याचा अर्थ आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, मृतांची संख्या कमी होत असून, ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे. मात्र, आता सुदैवाने लाट ओसरत आहे. यामुळेच बाधितांची संख्याही कमी होत असून, मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी (दि.२४) मात्र अचानकच १४९ बाधित आढळून आले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यात ३८, तिरोडा ६, गोरेगाव १०, आमगाव १९, सालेकसा ३२, देवरी ४, सडक-अर्जुनी २६, अर्जुनी-मोरगाव १३, तर इतर राज्य जिल्ह्यातील १ रुग्ण आहे, तर १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०३०६ झाली असून, यातील ३८९०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ७३१ रुग्ण क्रियाशील असून, यामध्ये गोंदिया तालुक्यात १२९, तिरोडा ६, गोरेगाव ४०, आमगाव ८५, सालेकसा १६१, देवरी ९३, सडक-अर्जुनी ७३, अर्जुनी-मोरगाव १२९, तर इतर राज्य जिल्ह्यातील १५ रुग्ण आहेत. यातील ३४८ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे, सोमवारच्या आकडेवारीनंतर आताही नागरिकांनी खबरदारीने वागण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

२३१७ कोरोना चाचण्या

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांवर भर दिला जात आहे. याअंतर्गत रविवारी २३१७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यात १७६५ आरटीपीसीआर असून, ५५२ रॅपिड अँटिजन आहेत. यातील १४९ पॉझिटिव्ह आल्या असून, १४२ संशयित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५६१५३ आरटीपीसीआर, तर १५२१९८ रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.

--------------------------------

नागरिकांनी लस घ्यावी

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान चालविले जात आहे. लसीकरणानंतर कोरोनावर मात करता येणार असल्याने शासनाची ही धडपड सुरू आहे. मनात लसीविषयी संभ्रम न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.