शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
2
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
3
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
4
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
5
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
6
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
7
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
8
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
9
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
10
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
11
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
12
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
13
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
14
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात
15
LIC चे तिमाही निकाल जाहीर; नफा 31% ने वाढला अन् ₹10,098 कोटींचा आकडा गाठला...
16
बांगलादेश, नेपाळनंतर आता पाकिस्तानात Gen Z आंदोलन पेटले; शहबाज शरीफ यांच्या सत्तेला हादरा?
17
पार्थ पवारांच्या जमीन व्यवहार प्रश्नावर अजित पवार शांतपणे निघून गेले; पत्रकारांना काहीच उत्तर दिले नाही
18
अक्षरच्या फिरकीची जादू, वॉशिंग्टनच्या ८ चेंडूत ३ विकेट्स! कांगारुंची शिकार करत टीम इंडियाची मालिकेत आघाडी
19
Babar Azam: बाबर आझमचं करिअर धोक्यात? वयाच्या ३१ व्या वर्षीच निवृत्त होण्याची येऊ शकते वेळ!
20
'वन नाइट स्टॅण्ड'मधून पैसे कमावतेय ही बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री, डिटेक्टिव्हचा खुलासा, म्हणाली-"तासानुसार..."

आकडे फिरले ! मात करणाऱ्यांपेक्षा बाधित अधिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:33 IST

गोंदिया : मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने घटत चालली असतानाच सोमवारी (दि.२४) जिल्ह्यातील आकडे पुन्हा एकदा फिरले. सोमवारी ...

गोंदिया : मागील काही दिवसांपासून बाधितांची संख्या सातत्याने घटत चालली असतानाच सोमवारी (दि.२४) जिल्ह्यातील आकडे पुन्हा एकदा फिरले. सोमवारी जिल्ह्यात १४९ नवीन बाधितांची भर पडली असून, १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली. म्हणजेच, मात करणाऱ्यांपेक्षा बाधित जास्त आढळून आले आहेत. याचा अर्थ आणखी खबरदारी घेण्याची गरज आहे. मात्र, दिलासादायक बाब म्हणजे, मृतांची संख्या कमी होत असून, ३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात कहर केला आहे. मात्र, आता सुदैवाने लाट ओसरत आहे. यामुळेच बाधितांची संख्याही कमी होत असून, मात करणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत असल्याने दिलासादायक चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी (दि.२४) मात्र अचानकच १४९ बाधित आढळून आले असून, यामध्ये गोंदिया तालुक्यात ३८, तिरोडा ६, गोरेगाव १०, आमगाव १९, सालेकसा ३२, देवरी ४, सडक-अर्जुनी २६, अर्जुनी-मोरगाव १३, तर इतर राज्य जिल्ह्यातील १ रुग्ण आहे, तर १३० रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

जिल्ह्यात एकूण बाधितांची संख्या ४०३०६ झाली असून, यातील ३८९०६ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे, तर ७३१ रुग्ण क्रियाशील असून, यामध्ये गोंदिया तालुक्यात १२९, तिरोडा ६, गोरेगाव ४०, आमगाव ८५, सालेकसा १६१, देवरी ९३, सडक-अर्जुनी ७३, अर्जुनी-मोरगाव १२९, तर इतर राज्य जिल्ह्यातील १५ रुग्ण आहेत. यातील ३४८ रुग्ण घरीच अलगीकरणात आहेत. विशेष म्हणजे, सोमवारच्या आकडेवारीनंतर आताही नागरिकांनी खबरदारीने वागण्याची गरज असल्याचे दिसून येत आहे.

------------------------------

२३१७ कोरोना चाचण्या

जिल्ह्यात कोरोनाचा प्रसार थांबविण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्यांवर भर दिला जात आहे. याअंतर्गत रविवारी २३१७ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. यात १७६५ आरटीपीसीआर असून, ५५२ रॅपिड अँटिजन आहेत. यातील १४९ पॉझिटिव्ह आल्या असून, १४२ संशयित आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १५६१५३ आरटीपीसीआर, तर १५२१९८ रॅपिड अँटिजन चाचण्या करण्यात आल्या आहेत.

--------------------------------

नागरिकांनी लस घ्यावी

कोरोनावर मात करण्यासाठी देशभरात लसीकरण अभियान चालविले जात आहे. लसीकरणानंतर कोरोनावर मात करता येणार असल्याने शासनाची ही धडपड सुरू आहे. मनात लसीविषयी संभ्रम न बाळगता नागरिकांनी पुढे येऊन लसीकरण करून घ्यावे, असे आरोग्य विभागाकडून कळविण्यात आले आहे.