शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक बैठक घेण्यासाठी मनोज जरांगेंना आमदार १०-१५ लाख रुपये देतात'; लक्ष्मण हाकेंचा गंभीर आरोप
2
Lalbaugcha Raja 2025 : 'ही शान कोणाची... लालबागच्या राजाची!!"; बाप्पाच्या सजावटीत यंदा खास काय?
3
लाडकी बहीण योजनेच्या गैरवापराची चौकशी करणार - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
4
Manoj Jarange Patil : 'जीव गेला तरीही मागे हटणार नाही, गुलाल उधळूनच परतायचे' मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
5
Bigg Boss 19 Premiere : नव्या पर्वाची दणक्यात सुरुवात! 'ही' आहे पहिली स्पर्धक
6
Bigg Boss 19: घरात होणार गँगवॉर! 'गँग्स ऑफ वासेपूर' फेम अभिनेत्याची 'बिग बॉस'मध्ये एन्ट्री
7
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
8
महिन्याला १ लाख कमवायची निक्की; तरीही का बंद केला ब्युटी पार्लरचा व्यवसाय? वडिलांनी सांगितलं कारण, म्हणाले...
9
पूजाचं ऐकलं अन् पुजारानं हा निर्णय घेतला! निवृत्तीनंतर स्वत: शेअर केली 'अनटोल्ड स्टोरी'
10
सुनेला जाळून मारण्यात मुलाची केली मदत; दिल्लीच्या निक्की भाटी प्रकरणात सासूला अटक!
11
स्कॉर्पिओ, बुलेट, रोख रक्कम आणि सोने; एवढे सगळे देऊनही निक्कीला रोज रात्री मारहाण करायचे, बहिणीने केले धक्कादायक खुलासे
12
विद्यार्थ्याचा पाय घसरला, शिक्षक वाचवायला गेले; वेरुळच्या जोगेश्वरी कुंडात बुडून दोघांचा मृत्यू 
13
'कभी खुशी कभी गम' फेम अभिनेत्री झाली आई, ३४व्या वर्षी दिला गोंडस लेकीला जन्म
14
'सन्मानजनक निरोप द्यायला हवा होता...', पुजाराच्या निवृत्तीवर शशी थरुर यांची भावनिक पोस्ट
15
Ganpati 2025: शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत आले गणपती बाप्पा, इतकी सुंदर मूर्ती की नजरच हटेना, पाहा व्हिडीओ
16
Asia Cup 2025: आशिया चषकात सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप-५ कर्णधार!
17
भारतानंतर आता युरोपचाही अमेरिकेला मोठा धक्का; 'या' दोन देशांनी 'एफ ३५' फायटर जेट्स खरेदीला दिला नकार!
18
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
19
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांना बाप्पा पावला! पगाराबाबत सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय
20
"मी सोहमला सांगितलंय लग्नानंतर वेगळं राहायचं...", सुचित्रा बांदेकर स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या- "एकत्र राहून रोज..."

प्रतिसादाअभावी मुक्कामी फेऱ्यांची संख्या घटली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:29 IST

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके थांबलेली होती. आता परिस्थिती नियंत्रणात ...

गोंदिया : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात चांगलाच कहर केल्याने लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमध्ये एसटीची चाके थांबलेली होती. आता परिस्थिती नियंत्रणात असल्यामुळे प्रवासाला परवानगी देण्यात आली असून पुन्हा एसटी प्रवासी सेवेत रस्त्यावर उतरली आहे. मात्र कोरोनाच्या भीतीमुळे नागरिकांनी प्रवास टाळला असून कोठे जायचे असल्यास स्वत:च्या खासगी वाहनानेच जाण्याला प्राधान्य देत आहेत. परिणामी आजही एसटीला पाहिजे तेवढा प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याचे दिसत आहे. उलट फेऱ्या चालवून डिझेलचा खर्चही निघत नसल्याने आगारांनी आजही कित्येक फेऱ्या बंदच ठेवल्या आहेत. यामध्ये मुक्कामी असलेल्या फेऱ्यांचाही समावेश आहे. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात येत असून जनजीवन पुन्हा सुरळीत होत असल्याने मुक्कामी फेऱ्या बंद असलेल्या गावातील नागरिकांची गैरसोय होतानाही दिसत आहे.

---------------------------

आगार आणि मुक्कामी गावी थांबणाऱ्या बसेस

आगार कोरोनापूर्वी मुक्कामी थांबणाऱ्या बसेस सध्या मुक्कामी थांबणाऱ्या बसेस

गोंदिया ३३ २२

तिरोडा १९ १२

-------------------------------

५० टक्केपेक्षा जास्त बसेस आगारातच

- गोंदिया आगारात ८१ बसेस असून प्रवासी प्रतिसाद नसल्याने काही फेऱ्या बंद असल्याने त्यातील ५७ बसेस सध्या सुरू आहेत.

- तिरोडा आगारात ४२ बसेस असून तेथेही प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने ग्रामीण फेऱ्या बंद असल्याने ३६ बसेस सुरू आहेत.

- अवघ्या जिल्ह्यातच एसटीला प्रवासी प्रतिसाद कमी असल्याने आगारांनी फेऱ्या कमी केल्याने ५० टक्केपेक्षा जास्त बसेस आगारातच राहतात.

-----------------------------------

रुग्ण घटले, एसटी कधी धावणार ?

जिल्ह्यात कोरोनाची स्थिती आता नियंत्रणात आली असून नाममात्र रुग्ण उरले आहेत. मात्र तरीही ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या बंद आहेत. अशात आम्हाला प्रवासात गैरसोय होत आहे. एसटी येत नसल्याने ऑटो किंवा अन्य प्रवासी वाहनाने सोय करावी लागत आहे. एसटी सुरू झाल्यास सोयीचे होणार.

- रोहित गणवीर

------------------------------------

कोरोनामुळे आगाराने ग्रामीण भागातील फेऱ्या बंद केल्या आहेत. मात्र जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात असून आता कामे सुरू झाली आहेत. अशात बाहेरगावी जायचे असल्यास प्रवासाची सोय नसल्याने अडचण होत आहे. ग्रामीण भागातील फेऱ्या पुन्हा सुरू करण्याची गरज आहे.

- सचिन चव्हाण

----------------------------------

जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात आला असला तरीही एसटीला प्रवासी प्रतिसाद कमीच आहे. यामुळेच जेमतेम डिझेल खर्च निघेल अशीच परिस्थिती आहे. करिता काही फेऱ्या आतापर्यंत बंदच ठेवल्या आहेत. परिस्थिती सुरळीत झाल्यावर त्यांना सुरू करता येईल.

- उमेश उके

वाहतूक नियंत्रक, गोंदिया