शहरं
Join us  
Trending Stories
1
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
4
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
5
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
6
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
7
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
8
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
9
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
10
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
11
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
12
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
13
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
14
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
15
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
16
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
17
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
18
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत
19
मुलाच्या शाळेतच वडिलांनी सोडला जीव, अर्जावर सही करताना खुर्चीवरून कोसळले आणि...  
20
हाफिज सईदच्या भेटीनंतर पंतप्रधानांनी आभार मानले; दहशतवादी यासीन मलिकच्या शपथपत्रातील अनेक दाव्यांमुळे खळबळ

आता आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री कोण रे भाऊ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2022 05:00 IST

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सलग दोन वेळा आणि ते सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्यामुळे यापुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणी स्वीकारेल की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया :  राज्याचे अल्पसंख्याक मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नवाब मलिक यांना ईडीने बुधवारी (दि. २३) अटक केली. विशेष म्हणजे यापूर्वी जिल्ह्याचे पालकमंत्री असलेले अनिल देशमुख यांनासुद्धा काही महिन्यांपूर्वी ईडीने अटक केली होती. त्यामुळे नवाब मलिक यांच्याकडे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपविण्यात आली. मात्र आता त्यांनासुद्धा ईडीने अटक केल्याने जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री कोण? यावरून चर्चेला उधाण आले आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केल्यानंतर नवाब मलिक यांना गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री बनविण्यात आले. त्यांचा कारभार सुरळीत सुरू असतानाच ईडीने त्यांच्यावरही कारवाईचा फास आवळला. बुधवारी त्यांना अटक केली. महाविकास आघाडी सरकारच्या काळात गोंदिया जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांवर सलग दोन वेळा आणि ते सुद्धा राष्ट्रवादी कॉंग्रेसचेच असल्यामुळे यापुढे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद कुणी स्वीकारेल की नाही, असा प्रश्न जिल्ह्यातील जनतेला पडलेला आहे.कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असताना कॅबिनेट मंत्री राहिलेले राष्ट्रवादी कॉंग्रेसचे वरिष्ठ नेते अनिल देशमुख यांनी २००५ ते २००९ आणि २००९ ते २०१४ या कालावधीत गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले आहे. २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले. तेव्हापासून राज्याचे गृहमंत्री राहिलेले अनिल देशमुख यांनी पुन्हा गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्रिपद भूषविले. पण माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांनी त्यांच्यावर १०० कोटी रुपये वसुलीचा आरोप केल्यानंतर त्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला आणि त्यांना अटक झाली. अनिल देशमुखांना अटक झाल्यानंतर राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर गोंदिया जिल्ह्याचे पालकत्व सोपविण्यात आले. गोंदिया जिल्ह्याचे त्यांचे दौरेही नियमित सुरू झाले होते. पण अंडरवर्ल्डशी त्यांचे संबंध आहेत आणि त्या संबंधांतूनच त्यांनी जमिनीच्या खरेदी-विक्रीच्या व्यवहारात घोटाळे केल्याचा आरोप विरोधी पक्ष भाजपने केले. त्यानंतर त्यांच्याही मागे केंद्रीय तपास यंत्रणांच्या चौकशीचा ससेमिरा लागला. त्यानंतर बुधवारी सकाळीच त्यांच्याकडे ईडीचे अधिकारी जाऊन धडकले आणि दुपारी त्यांना अटक करण्यात आली. तर जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केंद्र सरकारने महाराष्ट्रात सूडाचे राजकारण सुरू केल्याचा आरोप केला. नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध नोंदविला. तसेच केंद्र सरकारवर आगपाखड केली. 

 

टॅग्स :nawab malikनवाब मलिकguardian ministerपालक मंत्री