शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
2
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
3
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
4
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
5
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
6
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
7
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
8
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
9
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
10
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
11
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
12
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
13
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
14
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
15
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
16
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
17
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
18
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
19
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
20
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!

भाजी विक्रेत्यांना मिळणार आता हक्काची जागा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 23:51 IST

बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

ठळक मुद्देजुन्या बाजार समितीत स्थानांतरण : नाममात्र शुल्कावर मिळणार सुविधा

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : बाजारातील दुकानदारांकडून भाजी विक्रेत्यांच्या होत असलेल्या शोषणाला आता पूर्ण विराम लागणार आहे. कारण, जुन्या बाजार समितीत आता भाजी व फळ बाजार स्थानांतरीत करून त्यांना हक्काची जागा देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. असे झाल्यास सध्याच्या भाजी बाजारात होणारी भाजी विक्रेत्यांची लुट थांबून त्यांचा पैसाही वाचणार आहे.सध्या भाजी बाजारात भाजी विक्रेत्यांना दुकानांसमोर आपली दुकान थाटावी लागत आहे. यासाठी मात्र दुकानदार या भाजी विक्रेत्यांकडून दुकान लावू देण्यासाठी काही ठरावीक रक्कम दररोज घेतात. शिवाय त्यांच्याकडून भाजीपालाही फुकटात घेतात. एवढेच नव्हे तर भाजी विक्रेत्यांचा माल उरल्यास आपल्या दुकानात ठेऊ देण्यासाठी पैसे घेऊन त्यातूनही माल काढून घेत असल्याचे प्रकार ऐकीवात आहेत. ग्रामीण भागातून येऊन येथे भाजी विकल्यानंतर या प्रकारामुळे भाजी विके्रत्यांच्या हाती मोजकाच पैसा येतो.भाजी विक्रेत्यांचे हे शोषण थांबविता यावे यासाठी येथील जुन्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या जागेवर भाजी बाजार स्थानांतरीत करण्याची संकल्पना आमदार गोपालदास अग्रवाल यांच्या डोक्यात आली. यांतर्गत येथील जुन्या बाजार समितीतील सध्याचे बांधकाम पाडून तेथे मोठे शेड तयार केले जाणार आहे. यासाठी बाजार समिती प्रशासनाने पणन संचालकांकडे प्रस्ताव पाठविला असून लवकरच त्याला मंजुरी मिळल्यानंतर काम सुरू होणार असल्याचीही माहिती आहे.बाजार समितीत तयार करण्यात येणाऱ्या या शेडमध्ये भाजी व फळ विक्रेत्यांना नाममात्र दर आकारून दुकान लावण्यासाठी जागा दिली जाणार आहे. येथे भाजी विक्रेत्यांसाठी वीज व बसण्याची सोय करून दिली जाणार असून शिवाय त्यांच्याकडे उरलेला भाजीपाला किंवा फळ ठेवण्यासाठी बाजार समितीत व्यवस्था केली जाणार आहे. फक्त नाममात्र दर आकारून ही सोय दिली जाणार असून या पैशांतून खर्च काढला जाईल.शेड व कोल्ड स्टोरेजसाठी ४ कोटींचा निधीजुन्या बाजार समितीच्या जागेवर भाजी व फळबाजार स्थानांतरीत करण्याच्या कामाला गती मिळत असतानाच या बाजार समितीच्या जागेवर शेड व कोल्ड स्टोरेज तयार करण्यासाठी वैशिष्ट पूर्ण योजनेंतर्गत चार कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. येथे कोल्ड स्टोरेजची सुविधा उपलब्ध झाल्यास भाजी विक्रेत्यांची मोठी समस्या दूर होणार आहे.मेहनतीचे फळ मिळणारजुन्या बाजार समितीत भाजीबाजार गेल्याने भाजी विक्रेत्यांची होत असलेली लूट थांबणार. अशात त्यांच्या हाती चार पैसे उरणार व गावातून ये-जा करण्याची त्यांची मेहनत फलीतास येणार. पैसा हाती उरणार असल्याने त्यांच्या मेहनतीचे फळ त्यांना मिळणार आहे.