शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
3
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
4
दिवाळीपूर्वी मोठी भेट! कपडे, खाद्यपदार्थांवरील GST ५% होणार? 'या' वस्तू आणि सेवांवरील टॅक्सही घटणार
5
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
6
Pune: लक्ष्मी रोडवरील थरार... गर्दीत बस येताच चालकाला ह्रदयविकाराचा झटका; पोलीस धावले अन्...
7
Atharva Sudame: पुण्याचा रीलस्टार ते थेट राज ठाकरेंशी मैत्री; कोण आहे अथर्व सुदामे?
8
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
9
वाह! आयुष्य असावं तर 'या' क्रिकेटरसारखं...; ६ महिने आराम अन् पगार मिळतो २७ कोटी
10
तंत्रज्ञानाची किमया! इंटरनेटशिवाय WhatsApp कॉल; गुगलचा आश्चर्याचा धक्का, काय आहे प्लॅन?
11
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
12
अर्जुन-सानिया यांच्या साखरपुड्यासंदर्भातील फिरकी घेणारा प्रश्न अन् सचिन तेंडुलकरचा 'स्ट्रेट ड्राइव्ह'
13
उकडीचे की तळणीचे मोदक? वाद मोठा जहाल, पण दोन्ही मोदक आरोग्याच्या हिताचे; वाचा फायदे
14
मेड इन इंडिया! मारुतीची पहिली इलेक्ट्रिक कार अखेर लॉन्च, परदेशातही निर्यात होणार
15
डोनाल्ड ट्रम्प यांचा हट्टीपणा, अतिरिक्त २५ टक्के टॅरिफ लागू; भारत 'चौफेर' पलटवार करणार?
16
गणेश चतुर्थी २०२५: गुरुजींना उशीर झाला? रेकॉर्डेट कंटेट नको? स्वतःच करा गणपती प्राणप्रतिष्ठा पूजाविधी
17
चीनमध्ये शक्तीप्रदर्शन; मोदी, पुतिन आणि जिनपिंग एकाच व्यासपीठावर, अमेरिकेला लागणार मिरची
18
गणपती २०२५: ६ मूलांकांना ८ राजयोग शुभ, दुपटीने चौफेर लाभ; धनलक्ष्मी-गणेश कृपेचा वरदहस्त!
19
पैसै घेऊन मूर्तीकार पळाला, कारखाना जैसे थे ठेवला; ऐनवेळी मूर्ती कुठून आणायची, गणेशभक्तांना चिंता
20
Nikki Murder Case : निक्कीला जाळणाऱ्या विपिनच्या कुटुंबाचं सर्वात मोठं खोटं पकडलं; तपासात 'अशी' झाली पोलखोल

आता फक्त सालेकसा तालुकाच कोरोना पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2021 04:30 IST

गोंदिया : ४०४९२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता फक्त एक बाधित जिल्ह्यात उरला आहे. सालेकसा तालुक्यात हा बाधित ...

गोंदिया : ४०४९२ कोरोना बाधितांनी कोरोनावर मात केल्यानंतर आता फक्त एक बाधित जिल्ह्यात उरला आहे. सालेकसा तालुक्यात हा बाधित रुग्ण असून, उर्वरित सात तालुके कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळेच आता फक्त सालेकसा तालुका कोरोना पॉझिटिव्ह असून, फक्त एक बाधितामुळे जिल्हा कोरोनामुक्तीसाठी अडला आहे. दिलासादायक बाब म्हणजे, उरलेला हा १ बाधितही घरीच अलगीकरणात आहे.

मागील वर्षी मार्च महिन्यापासून अवघ्या देशासह जिल्ह्यातही कोरोनाने कहर केला. तेव्हापासून आतापर्यंत कोरोनाची आकडेवारी झपाट्याने वाढत चालली असून, पहिल्या नंतर दुसऱ्या लाटेने, तर जिल्ह्याला हादरवूनच सोडले होते. दुसऱ्या लाटेचे हे पडसाद अद्यापही काही जिल्ह्यात दिसत असून, जिल्ह्यात मात्र लाट ओसरली आहे. जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ४११९५ एवढी असून, त्यातील ४०४९२ बाधितांनी कोरोनावर मात केली आहे, तर आता फक्त एक बाधित जिल्ह्यात उरला आहे. हा बाधित सालेकसा तालुक्यातील असून, या व्यतिरिक्त अन्य सात तालुके कोरोनामुक्त झाले आहेत.

विशेष म्हणजे, कोरोनाने जिल्ह्यातील ७०० वर नागरिकांचा जीव घेतला असून, त्यात दुसऱ्या लाटेमुळे अधिक हानी झाली आहे. मात्र, दिलासादायक बाब अशी की, आता जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असून, फक्त एक बाधित उरल्याने अडला आहे. यासाठी जिल्हावासीयांनी पाळलेल्या संयमामुळेही शक्य झाले आहे. मात्र, आता फक्त सालेकसा तालुका कोरोना पॉझिटिव्ह असून, हा एक बाधित कोरोनामुक्त झाल्यास जिल्हाही कोरोनामुक्त होणार आहे.

--------------------------

हॉटस्पॉट तालुक्यांतही कोरोनावर मात

जिल्ह्यातील गोंदिया व तिरोडा तालुका सुरूवातीपासूनच कोरोना हॉटस्पॉट ठरले आहे. यात गोंदिया तालुक्यात सर्वाधिक २१३५६ बाधितांची नोंद असून, मृतांची संख्याही सर्वाधिक असल्याने गोंदिया तालुका प्रथम क्रमांकाचा हॉटस्पॉट आहे, तर तिरोडा तालुक्यात ४०९४ बाधित असून, हा तालुका दुसऱ्या क्रमांकाचा हॉटस्पॉट ठरला आहे. मात्र, आता दोन्ही तालुक्यांनी कोरोनावर मात केली असून, ही दिलासादायक बाब आहे.

---------------------------------

दोन्ही डोस घेणे गरजेचे

जिल्ह्यात ५० टक्के नागरिकांचे लसीकरण झाले असून, यात मात्र कित्येकांचा दुसरा डोस उरला आहे. शिवाय कित्येकांनी आतापर्यंत लसीला घेऊन भीती व संभ्रम बाळगल्याने त्यांनी डोस घेतले नाहीत. मात्र, कोरोना लसीमुळे स्वत:सह परिवाराचेही संरक्षण होणार आहे. करिता प्रत्येकाने लसीचे दोन्ही डोस घेण्याची गरज आहे. जिल्हा कोरोनामुक्तीच्या वाटेवर असतानाच आता लसीकरणात प्रथम क्रमांकावर असणे गरजेचे आहे.