शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
2
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
3
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
4
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
5
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
6
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
7
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
8
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
9
लवकरच येणार स्वस्त मोबाईल प्लॅन! केवळ कॉल आणि एसएमएस करणाऱ्यांना मिळणार गिफ्ट; कंपन्या दिलासा देणार?
10
समरजित घाटगे यांची भाजपात घरवापसी, शरद पवार गटाला धक्का, कागलमधील समीकरणं बदलणार
11
तुमच्या नगरसेवकांना नियम शिकवा; अधिकारी, विरोधकांनी गणेश नाईकांना घेरले, नेमके काय घडले?
12
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
13
"जी व्यक्ती मालिकेतच नव्हती...", 'लक्ष्य'मधून बाहेर काढण्याच्या दिगंबर नाईकांच्या आरोपांवर आदेश बांदेकरांचं उत्तर
14
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
15
SHOCKING! इराण-अमेरिका युद्धातून डोनाल्ड ट्रम्पची दोन्ही मुलंच उकळताहेत प्रचंड पैसा!
16
RR vs MI: मुंबईच्या रणनीतीचा पालापाचोळा! पराभवानंतर जयवर्धने यांनी सांगितलं नेमकं कुठं गणित बिघडलं?
17
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
18
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
19
Mumbai Local: मध्य रेल्वेची कमाल, १६४ कोटी प्रवाशांचा प्रवास; ८.१६ लाख ट्रेन, १ वर्षांत किती सेवा वाढल्या?
20
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
Daily Top 2Weekly Top 5

आता उरले फक्त ८३४ नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने शनिवारपर्यंत (दि.२५) यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच, आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९२ टक्के लसीकरण झाले असून आता फक्त ८३४ नागरिकच लस घेणे शिल्लक असल्याचे चित्र आहे. अशात सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केल्याची गूड न्यूज येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरूवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात केलेल्या कहराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन करून लसीकरणाला गती दिली. परिणामी झपाट्याने लसीकरण होत गेले व शनिवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्याची ९९.९२ एवढी टक्केवारी आहे. यामध्ये ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी आहे. तर २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण झाल्याने आता फक्त ८३४ नागरिकांचे लसीकरण व्हायचे असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दिवसाला १००००-१५००० च्या घरात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. अशात रविवारची सुटी सोडून सोमवारी मात्र जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केले अशी गूड न्यूज अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हावासीयांनी केलेल्या सहकार्याची आता पुढेही कोरोनाला मात देण्यासाठी गरज आहे.

----------------------------

दुसरा डोस घेणाऱ्यांनी केला हिरमोड

जिल्हा आता शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यात ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी अपेक्षित आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा हिरमोड केला आहे. कारण, जिल्ह्यातील फक्त २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे व ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. लाखाच्या घरात नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. ही बाब नक्कीच एवढ्या सर्व परिश्रमानंतर अपेक्षित नाही.

-------------------------------

आता टार्गेट दुसऱ्या डोसचे

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही लाखांच्यावर नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसून असे करून ते शासनाचे नव्हे तर स्वत: सह आपल्या कुटुंबाचे नुकसान करीत आहेत अशी म्हणण्याची पाळी आली आहे. आता शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे टार्गेट दुसरा डोस राहणार आहे.