शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
2
'डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे अध्यक्ष, जगाचे सम्राट नाहीत, त्यांच्या चुकांची किंमत...'; ब्राझीलच्या राष्ट्रपतींनी सुनावले
3
अमेरिकेत ३० वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या भारतीयाला ग्रीन कार्ड असूनही अटक, कुटुंबीय हताश! नेमकं प्रकरण काय?
4
पाकिस्तान-सौदी अरेबियात डील, भारताची पहिली प्रतिक्रिया; "आम्ही देशहिताचं रक्षण करण्यासाठी..."
5
'यानं' केवळ ३.७७ रुपयांप्रमाणे घेतलेले Urban Company चे शेअर्स, IPO उघताच त्याचे झाले ३९० कोटी
6
IND vs PAK: नीरज चोप्रा आज अर्शद नदीमशी भिडणार! भारत-पाकमध्ये आणखी एक 'हाय-व्होल्टेज' सामना
7
कर्नाटकमध्ये मतचोरीचा डाव काँग्रेसवरच उलटला, आमदार संशायाच्या भोवऱ्यात, हायकोर्टाने निकाल रद्द केला
8
'साप चावला' म्हणत कळवळला, वांद्रे-वरळी सी-लिंकवर गाडी थांबवली अन्...; मुंबईतल्या व्यापाऱ्याने उचलले टोकाचे पाऊल
9
"पल्लेदार वाक्य बोलणारी प्रिया शेवटच्या क्षणी...", अभिजीतची प्रतिक्रिया ऐकून डोळ्यात येईल पाणी
10
ऐकावं ते नवलच! डिजिटल फ्रेंडली भिकारी; ऑनलाईन मागतो भीक, काही मिनिटांत बक्कळ कमाई
11
दीड कोटींच्या जमिनीवर सगळ्यांचा डोळा; सावत्र भावांनी कट रचला, ८ लाख दिले तरी प्लॅन कसा फसला?
12
फक्त ५००० रुपयांच्या कर्जातून उभारले १३,५०० कोटींचे साम्राज्य! तुमच्या घरातही वापरली जाते 'ही' वस्तू
13
BAN vs AFG Live Streaming : अफगाणिस्तानसमोर मोठं चॅलेंज! लढत श्रीलंकेविरुद्ध अन् चितपट करायचंय बांगलादेशला! जाणून घ्या समीकरण
14
महामार्गावर अचानक भूस्खलन, पळाले म्हणून थोडक्यात वाचले भाजप खासदार; व्हिडीओ केला शेअर
15
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
16
पहिल्याच प्रयत्नात नीरज पोहोचला अंतिम फेरीत; जागतिक अजिंक्यपद : सचिन यादवही ठरला पात्र
17
तासाभराचं नाट्य, बहिष्काराची धमकी, ६ ईमेल आणि..., पाकिस्तान असा आला वठणीवर, त्या बैठकीत काय घडलं?
18
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
19
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
20
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी

आता उरले फक्त ८३४ नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने शनिवारपर्यंत (दि.२५) यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच, आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९२ टक्के लसीकरण झाले असून आता फक्त ८३४ नागरिकच लस घेणे शिल्लक असल्याचे चित्र आहे. अशात सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केल्याची गूड न्यूज येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरूवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात केलेल्या कहराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन करून लसीकरणाला गती दिली. परिणामी झपाट्याने लसीकरण होत गेले व शनिवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्याची ९९.९२ एवढी टक्केवारी आहे. यामध्ये ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी आहे. तर २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण झाल्याने आता फक्त ८३४ नागरिकांचे लसीकरण व्हायचे असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दिवसाला १००००-१५००० च्या घरात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. अशात रविवारची सुटी सोडून सोमवारी मात्र जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केले अशी गूड न्यूज अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हावासीयांनी केलेल्या सहकार्याची आता पुढेही कोरोनाला मात देण्यासाठी गरज आहे.

----------------------------

दुसरा डोस घेणाऱ्यांनी केला हिरमोड

जिल्हा आता शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यात ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी अपेक्षित आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा हिरमोड केला आहे. कारण, जिल्ह्यातील फक्त २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे व ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. लाखाच्या घरात नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. ही बाब नक्कीच एवढ्या सर्व परिश्रमानंतर अपेक्षित नाही.

-------------------------------

आता टार्गेट दुसऱ्या डोसचे

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही लाखांच्यावर नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसून असे करून ते शासनाचे नव्हे तर स्वत: सह आपल्या कुटुंबाचे नुकसान करीत आहेत अशी म्हणण्याची पाळी आली आहे. आता शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे टार्गेट दुसरा डोस राहणार आहे.