शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

आता उरले फक्त ८३४ नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने शनिवारपर्यंत (दि.२५) यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच, आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९२ टक्के लसीकरण झाले असून आता फक्त ८३४ नागरिकच लस घेणे शिल्लक असल्याचे चित्र आहे. अशात सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केल्याची गूड न्यूज येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरूवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात केलेल्या कहराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन करून लसीकरणाला गती दिली. परिणामी झपाट्याने लसीकरण होत गेले व शनिवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्याची ९९.९२ एवढी टक्केवारी आहे. यामध्ये ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी आहे. तर २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण झाल्याने आता फक्त ८३४ नागरिकांचे लसीकरण व्हायचे असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दिवसाला १००००-१५००० च्या घरात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. अशात रविवारची सुटी सोडून सोमवारी मात्र जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केले अशी गूड न्यूज अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हावासीयांनी केलेल्या सहकार्याची आता पुढेही कोरोनाला मात देण्यासाठी गरज आहे.

----------------------------

दुसरा डोस घेणाऱ्यांनी केला हिरमोड

जिल्हा आता शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यात ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी अपेक्षित आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा हिरमोड केला आहे. कारण, जिल्ह्यातील फक्त २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे व ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. लाखाच्या घरात नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. ही बाब नक्कीच एवढ्या सर्व परिश्रमानंतर अपेक्षित नाही.

-------------------------------

आता टार्गेट दुसऱ्या डोसचे

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही लाखांच्यावर नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसून असे करून ते शासनाचे नव्हे तर स्वत: सह आपल्या कुटुंबाचे नुकसान करीत आहेत अशी म्हणण्याची पाळी आली आहे. आता शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे टार्गेट दुसरा डोस राहणार आहे.