शहरं
Join us  
Trending Stories
1
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
2
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
3
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
4
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
5
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
6
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
7
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
8
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
9
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
10
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
11
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
12
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
13
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
14
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
15
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)
16
कामाची गोष्ट! पीठ मळल्यानंतर किती वेळात वापरता येतं, कधी खराब होतं, फ्रिजमध्ये ठेवायचं का?
17
Video: पहलगाम, RCB ते विमान अपघात..; 2025 मध्ये घडलेल्या घटनांवर तरुणाने बनवले गाणे
18
काल मातोश्रीवर बैठकीत, आज माजी नगरसेवक शिवसेनेत; वर्धापन दिनीच शिंदेंचा उद्धवसेनेला धक्का 
19
डोंगराच्या ३०० फूट खाली इराणचं अण्वस्त्र ठिकाण, अमेरिका इस्रायलला 'ब्रह्मास्त्र' देणार? ताकद जाणून थक्क व्हाल!
20
“‘अ‍ॅक्ट ऑफ गॉड’ घटना, जगाला जागे करणारे संकेत”; एअर इंडिया अपघातावर पीयूष गोयल यांचे विधान

आता उरले फक्त ८३४ नागरिक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2021 04:31 IST

कपिल केकत गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले ...

कपिल केकत

गोंदिया : लसीकरणासाठी राज्य शासनाच्या कुटुंब कल्याण कार्यालयाने जिल्ह्यात १८ वर्षांपेक्षा जास्त वयोगटातील १०३०२२७ नागरिकांचे उद्दिष्ट दिले होते. जिल्ह्याने शनिवारपर्यंत (दि.२५) यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण केले आहे. म्हणजेच, आतापर्यंत जिल्ह्यात ९९.९२ टक्के लसीकरण झाले असून आता फक्त ८३४ नागरिकच लस घेणे शिल्लक असल्याचे चित्र आहे. अशात सोमवारी सायंकाळपर्यंत जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केल्याची गूड न्यूज येणार असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

देशात १६ जानेवारीपासून सुरू झालेल्या लसीकरणात गोंदिया जिल्हा सुरूवातीपासूनच अग्रेसर राहिला आहे. दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात केलेल्या कहराची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने उत्तम नियोजन करून लसीकरणाला गती दिली. परिणामी झपाट्याने लसीकरण होत गेले व शनिवारपर्यंत (दि.२५) जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण करण्यात आले असून त्याची ९९.९२ एवढी टक्केवारी आहे. यामध्ये ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी आहे. तर २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे. जिल्ह्यातील १०२९५६६ नागरिकांचे लसीकरण झाल्याने आता फक्त ८३४ नागरिकांचे लसीकरण व्हायचे असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात दिवसाला १००००-१५००० च्या घरात नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. अशात रविवारची सुटी सोडून सोमवारी मात्र जिल्ह्याने शंभर टक्के लसीकरण केले अशी गूड न्यूज अपेक्षित आहे. यासाठी आतापर्यंत जिल्हावासीयांनी केलेल्या सहकार्याची आता पुढेही कोरोनाला मात देण्यासाठी गरज आहे.

----------------------------

दुसरा डोस घेणाऱ्यांनी केला हिरमोड

जिल्हा आता शंभर टक्के लसीकरणाकडे वाटचाल करीत आहे. यात ७३१८२७ नागरिकांनी पहिला डोस घेतला असून त्याची ७१.०२ एवढी टक्केवारी अपेक्षित आहे. मात्र, दुसरा डोस घेणाऱ्यांनी जिल्हा प्रशासनाचा हिरमोड केला आहे. कारण, जिल्ह्यातील फक्त २९७७३९ नागरिकांनी दुसरा डोस घेतला असून त्याची २८.९० एवढी टक्केवारी आहे व ती अपेक्षेपेक्षा खूपच कमी आहे. लाखाच्या घरात नागरिकांनी मुदत निघून गेल्यानंतरही दुसरा डोस घेतलेला नाही. ही बाब नक्कीच एवढ्या सर्व परिश्रमानंतर अपेक्षित नाही.

-------------------------------

आता टार्गेट दुसऱ्या डोसचे

कोरोनाला मात देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या लसींचे दोन्ही डोस घेणे गरजेचे आहे. असे असतानाही लाखांच्यावर नागरिकांनी मुदत संपूनही दुसरा डोस घेतला नसून असे करून ते शासनाचे नव्हे तर स्वत: सह आपल्या कुटुंबाचे नुकसान करीत आहेत अशी म्हणण्याची पाळी आली आहे. आता शंभर टक्के लसीकरण झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाचे टार्गेट दुसरा डोस राहणार आहे.