शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! ऑपरेशन सिंदूरला सुरुवात; भारताचा पाकिस्तान, पीओकेवर हवाई हल्ला 
2
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
3
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
4
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
5
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
6
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
7
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
8
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
9
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
10
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
11
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
12
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
13
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
14
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
15
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
16
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
17
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
18
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
19
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
20
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”

जिल्ह्यातील सर्व समस्यांकडे आता लक्ष देणार- पटोले

By admin | Updated: November 6, 2014 01:57 IST

गेल्या चार महिन्यांपासून गोंदियावासियांपासून दुरावा ठेवून असलेले खासदार नाना पटोले यांनी अखेर मंगळवारी गोंदियात हजेरी लावली.

गोंदिया : गेल्या चार महिन्यांपासून गोंदियावासियांपासून दुरावा ठेवून असलेले खासदार नाना पटोले यांनी अखेर मंगळवारी गोंदियात हजेरी लावली. काही कार्यक्रमांना उपस्थित राहून त्यांनी रात्री पत्रकारांशी संवाद साधला. जिल्ह्याचे खासदार म्हणून अनेक समस्यांकडे त्यांच्याकडून झालेल्या दुर्लक्षाबद्दल यावेळी त्यांना पत्रकारांच्या प्रश्नांचा भडीमार सहन करावा लागला. मात्र आता हा दुरावा ठेवणार नाही, असे म्हणत खा.पटोले यांनी सर्व समस्यांकडे लक्ष देणार, अशी ग्वाही दिली.धान खरेदी, धानाचा हमीभाव, चुकीची पैसेवारी यासह विधानसभा निवडणुकीत गोंदिया मतदार संघात झालेला पराभव, जिल्ह्यातील अनेक समस्यांकडे त्यांचे झालेले दुर्लक्ष यावरून खा.पटोले यांना पत्रकारांनी घेरले. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे देताना त्यांची बरीच दमछाक झाली.विधानसभा निवडणुकीत गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यातून एकमेव गोंदिया विधानसभा मतदार संघात भाजपला हार पत्करावी लागली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची या ठिकाणी सभा होऊनही ही जागा भाजपने कशी गमावली याची कारणे सांगताना खा.पटोले यांची थोडी तारांबळ उडाली. गोंदिया शहरात आमची स्थिती चांगली असली तरी ग्रामीण भागात पक्षबांधणीत आम्ही कमी पडलो, असे ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीदरम्यान प्रचारासाठी खूप कमी वेळ मिळाल्याने गोंदिया मतदार संघात जास्त वेळ देता आला नाही, असेही खा.पटोले म्हणाले. गोंदिया मतदार संघात जातीय समीकरणातून गटबाजी झाल्याचा आरोप फेटाळत येथील उमेदवारही योग्यच होता, असे त्यांनी स्पष्ट केले. धान उत्पादकांना उत्पादन खर्चानुसार भाव मिळावा आणि पैसेवारी काढण्याची कालबाह्य पद्धतही बदलावी यासाठी मागील सरकारच्या काळात नेमलेल्या स्वामीनाथन समितीच्या शिफारसी लागू कराव्या म्हणून आपण केंद्र सरकारकडे पाठपुरावा करणार असल्याचे खा.पटोले म्हणाले. जिल्ह्यातील अनेक कार्यालयांमध्ये अधिकाऱ्यांची किंवा सरकारी रुग्णालयांमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांची पदे रिक्त आहेत ती कधी भरणार यावर विचारले असता, येथील लोकप्रतिनिधी आधी चांगल्या व्यक्तींना येथे टिकू देत नव्हते. त्यामुळे पदे रिक्त राहात होती. आता सरकार बदलल्यामुळे यात बदल होईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी जि.प.चे माजी अध्यक्ष नेतराम कटरे, नगराध्यक्ष कशिश जयस्वाल व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)