शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

आता शनिवार, रविवारी वनपर्यटन राहणार बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2021 05:00 IST

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाकडून वेगवेगळे निर्बंध लावून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांपासूनही कोरोनाचा धोका पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच आता वनविभागाने शनिवारी व रविवारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनपर्यटन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश काढले आहेत.

ठळक मुद्देनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : ठरवून दिलेल्या निर्बंधांचे करावे लागणार पालन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राज्यासह आता जिल्ह्यातही कोरोनाचा भडका उडत असून, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी शासनाने काही आदेश निर्गमित केले आहेत. यांतर्गत, आता नवेगाव-नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात शनिवारी व रविवारी वनपर्यटन पूर्णत: बंद ठेवले जाणार आहे. तसेच वनविभागाने वनपर्यटनासाठी काही निर्बंध लावून दिले असून, त्यांचे पालन करावे लागणार आहे. येत्या शुक्रवारपासून (दि.१६) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता शासनाकडून वेगवेगळे निर्बंध लावून कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अशात वनपर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांपासूनही कोरोनाचा धोका पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. यामुळेच आता वनविभागाने शनिवारी व रविवारी नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनपर्यटन पूर्णपणे बंद करण्याचे आदेश काढले आहेत. विशेष म्हणजे, यासह पर्यटकांसाठी वनविभागाने काही निर्बंध लावले असून, त्यांचेही येत्या शुक्रवारपासून (दि.१६) पालन करावे लागणार आहे. यामध्ये, आठवडी पर्यटन बंद वगळता इतर दिवशी फक्त दुपारचे पर्यटन पूर्वीप्रमाणेच म्हणजेच दुपारी ३ ते ६.३० वाजतापर्यंत सुरू राहील. वाहनाच्या क्षमतेच्या ५० टक्केच पर्यंटकांना प्रवेश दिला जाणार असून जिप्सीत वाहनचालक व गाइड वगळून चार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. तसेच एकाच कुटुंबातील व्यक्ती असल्यास चालक व गाइड वगळून सहा व्यक्तींना प्रवेश दिला जाईल. खासगी लहान चारचाकी वाहनात चालक व गाइड वगळून २ पर्यटक, तर मोठ्या वाहनात चार पर्यटकांना प्रवेश दिला जाईल. याशिवाय राज्य व जिल्हा प्रशासनाकडून पारित केल्या जाणाऱ्या सर्व निर्देशांचे काटेकोरपणे पर्यटकांना पालन करणे बंधनकारक राहणार आहे. 

आरक्षणाची रक्कम परत मिळणार सध्या वनपर्यटनाचा हंगाम सुरू असून शनिवारी व रविवारी सुटीचा दिवस बघून अधिकांश पर्यटक अगोदरच आरक्षण करून घेतात व त्यासाठी पैसे भरून टाकतात. मात्र आता नवीन आदेशानुसार शनिवारी व रविवारी वनपर्यटन बंद राहणार आहे. अशात त्यांना प्रकल्पात प्रवेश दिला जाणार नाही. मात्र यामुळे त्यांना घाबरण्याची गरज नसून त्यांनी आरक्षणासाठी भरलेले पैसे परत दिले जाणार आहे.

 

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्यtourismपर्यटन