शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

आता प्रत्येक मिठाई ट्रे समोर असेल ‘बेस्ट बिफोर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2020 05:00 IST

हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ खाले की अनेकांची प्रकृती खालावले. अन्नातून विषबाधा होते.

ठळक मुद्देनियम न पाळल्यास होणार कारवाई : १ ऑक्टोंबरपासूनच अमंलबजावणी, अन्न व औषध प्रशासन

नरेश रहिले ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मिठाई निकृष्ट दर्जाची दिली, जुनी दिली, त्यात किडे आढळले किंवा मिठाई खाल्यानंतर विषबाधा झाली अशी अनेक प्रकरणे आपल्या कानावर पडली आहेत. या सर्व बाबींवर मात करण्यासाठी तसेच ग्राहकांना ती मिठाई केव्हापर्यंत खाता येईल यासंबधी सूचना देणारी तारीख म्हणजेच ‘बेस्ट बिफोर’ ही मिठाईच्या ट्रेसमोर लिहीणे बंधनकारक आहे. यासंदर्भात अन्न व औषध प्रशासनानचे सहायक आयुक्त अभय देशपांडे यांनी या संदर्भात पत्र काढले आहे. या नियमाची अमंलबजावणी १ ऑक्टोंबरपासून न केल्यास दुकानदारांवर कारवाई करण्यात येईल असा इशारा दिला आहे.हॉटेल, मिस्ठान्न भांडार व विविध दुकानांवर मिठाई व दुग्धजन्य पदार्थ विक्री केले जातात. परंतु त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदार्थांचा वापर केव्हापर्यंत करायचा यासंदर्भात त्या मिठाई किंवा दुग्धजन्य पदर्थांवर लिहीलेले नसते. परिणामी हलकी बुरशी चढलेले पदार्थही ग्राहकांच्या माथी मारले जाते. घरी नेल्यावर रात्रभरातच ते साहित्य खराब होतात. ते पदार्थ खाले की अनेकांची प्रकृती खालावले. अन्नातून विषबाधा होते. अशी अनेक उदाहरणे समोर येतात. परंतु या प्रकारासंदर्भात एखाद्या ग्राहकाने दुकानदाराला म्हटल्यावर ते आपला हात झटकतात. हे होऊ नये यासाठी आता प्रत्येक मिठाई व दुग्धजन्य पदार्थाच्या ट्रे समोर बेस्ट बिफोर लिहिणे बंधनकारक करण्यात आले आहे. सर्व मिठाई उत्पादक विक्रेत्यांना या संदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. बर्फी, मिठाई व दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रीसाठी साठविलेल्या ट्रेववर ‘बेस्ट बिफोर’ ठळक अक्षरात लिहिणे १ ऑक्टोंबरपासून बंधनकारक करण्यात आले आहे.मिठाई किती दिवस खाण्यायोग्य याची मिळेल माहितीअन्न सुरक्षा व मानदे प्राधिकारी नवी दिल्ली यांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. याची अंमलबजावणी दिनांक १ आॅक्टोबर २०२० पासून महाराष्ट्र राज्यात अन्न व औषध प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. प्रत्येक खुल्या मिठाईच्या ट्रेवर बेस्ट बिफोर दिनांक टाकल्याने ग्राहकांना ती मिठाई किती दिवसपर्यंत खाणे योग्य राहते याची कल्पना येईल. त्यामुळे अन्न विषबाधा सारख्या अप्रिय घटना टाळता येऊ शकतील.या नियमासंदर्भात सर्व दुकानदारांना सूचना दिलेल्या आहेत. सर्व मिठाई विक्रेत्यांनी या तरतूदीचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांच्याविरूद्ध अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ अंतर्गत कारवाई करण्यात येईल याची नोंद घ्यावी.-अभय देशपांडे,सहाय्यक आयुक्त अन्न भंडारा/गोंदिया.

टॅग्स :food poisoningअन्नातून विषबाधा