शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

आता अल्पवयीन वाहन चालकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:25 IST

महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारी आहे.

ठळक मुद्देनियम पाळा : वाहतूक पोलिसांची शाळा-शाळांमध्ये जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारी आहे. वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले-मुली वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे.महाराष्टÑ राज्यात बालन्याय (संरक्षण व काळजी) अधिनियम-२००५ व नियम २०१८ अंतर्गत राज्यातील बालन्याय यंत्रणेचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने निरनिराळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी अल्पवयीन (१८ वर्ष पेक्षा कमी वयाचे) मुलांद्वारे वाहन चालविण्यात येवू नये, यासाठी गोंदिया पोलीस व मोटर परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे विशेष जनजागृती मोहीम १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जे.एम.हायस्कूल गणेशनगर गोंदिया, साकेत पब्लिक स्कूल, एस.एस.गर्ल्स कॉलेज व किरसान इंटरनॅशनल स्कूल, श्रीराम विद्यालय चिचगड, कला व विज्ञान विद्यालय चिचगड, शिव आदिवासी विद्यालय डव्वा येथे वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता अपघात, वाहतूक नियम तसेच लहान मुलांनी वाहन चालवू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात इतर शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. १९ डिसेंबरपासून गोंदिया शहरात व गोंदिया जिल्ह्यात वाहन चालविणारे अल्पवयीन मुले व त्यास वाहन देणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअन्वये कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये असे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी कळविले आहे.बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईनरस्त्यावर बेवारस वाहने यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. याबाबत नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात व शहरात अशा अनाधिकृतपणे सोडून दिलेले वाहने व बेवारस वाहने यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनाबाबत तक्रार करण्याकरिता हेल्पलाईन क्रं.०७१८२-२३६१०० वर नागरिकांना तक्रार करता येईल. तक्रार प्राप्त होताच संबंधी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन किंवा वाहतुक शाखा यांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. रहदारीस अडथडा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ व भारतीय दंड संहिता प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस