शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

आता अल्पवयीन वाहन चालकांवर होणार कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2018 00:25 IST

महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारी आहे.

ठळक मुद्देनियम पाळा : वाहतूक पोलिसांची शाळा-शाळांमध्ये जनजागृती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : महाराष्ट्रातील वाहतूक अपघाताच्या गुन्ह्यांचा समितीद्वारे विश्लेषणात्मक अभ्यास केला असता एकंदरीत अल्पवयीन वाहन चालवून केलेल्या अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. अल्पवयीन मुलांनी वाहन चालवून केलेल्या अपघातातील वाढ ही गंभीर बाब असून समाजाचे स्वास्थ्य बिघडविणारी आहे. वाढत्या अपघातांना प्रतिबंध लावण्यासाठी १८ वर्षापेक्षा कमी वयाची मुले-मुली वाहन चालवितांना आढळल्यास त्यांच्यावर मोटार वाहन कायद्यान्वये कडक कारवाई करण्यात येणार आहे.महाराष्टÑ राज्यात बालन्याय (संरक्षण व काळजी) अधिनियम-२००५ व नियम २०१८ अंतर्गत राज्यातील बालन्याय यंत्रणेचे बळकटीकरण करण्याच्या अनुषंगाने निरनिराळ्या उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहे.गोंदिया जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी अल्पवयीन (१८ वर्ष पेक्षा कमी वयाचे) मुलांद्वारे वाहन चालविण्यात येवू नये, यासाठी गोंदिया पोलीस व मोटर परिवहन विभागामार्फत संयुक्तपणे विशेष जनजागृती मोहीम १५ ते २४ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत जे.एम.हायस्कूल गणेशनगर गोंदिया, साकेत पब्लिक स्कूल, एस.एस.गर्ल्स कॉलेज व किरसान इंटरनॅशनल स्कूल, श्रीराम विद्यालय चिचगड, कला व विज्ञान विद्यालय चिचगड, शिव आदिवासी विद्यालय डव्वा येथे वाहतूक शाखेच्या वतीने रस्ता अपघात, वाहतूक नियम तसेच लहान मुलांनी वाहन चालवू नये, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. जिल्ह्यात इतर शाळांमध्ये जनजागृती करण्यात येत आहे. १९ डिसेंबरपासून गोंदिया शहरात व गोंदिया जिल्ह्यात वाहन चालविणारे अल्पवयीन मुले व त्यास वाहन देणाऱ्यांविरुद्ध मोटार वाहन कायद्याअन्वये कारवाई करण्यात येणार आहे. पालकांनी लहान मुलांच्या हातात वाहन देऊ नये असे पोलीस अधीक्षक हरिष बैजल यांनी कळविले आहे.बेवारस वाहनांच्या तक्रारीसाठी हेल्पलाईनरस्त्यावर बेवारस वाहने यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. याबाबत नागरिकांना तक्रारी नोंदविण्यासाठी यंत्रणा तयार करण्याचे निर्देश दिले आहे. गोंदिया जिल्ह्यात व शहरात अशा अनाधिकृतपणे सोडून दिलेले वाहने व बेवारस वाहने यामुळे रहदारीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनाबाबत तक्रार करण्याकरिता हेल्पलाईन क्रं.०७१८२-२३६१०० वर नागरिकांना तक्रार करता येईल. तक्रार प्राप्त होताच संबंधी कार्यक्षेत्रातील पोलीस स्टेशन किंवा वाहतुक शाखा यांच्याकडून कारवाई करण्यात येणार आहे. रहदारीस अडथडा निर्माण करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायदा १९८८ व भारतीय दंड संहिता प्रमाणे कारवाई करण्यात येईल.

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस