शहरं
Join us  
Trending Stories
1
'दोषींना पाठिशी घालणाऱ्यांवरही कारवाई करणार', एकनाथ शिंदेंनी घेतली वैष्णवी हगवणेच्या आईवडिलांची घेतली भेट
2
अंबा एक्सप्रेसची ओव्हरहेड वायर तुटली! विदर्भ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेससह अनेक गाड्यांचे वेळापत्रक कोलमडले
3
तीन वर्षांच्या मुलाला अंधार असलेल्या खोलीत नेले अन्...; उल्हासनगरात डान्स टीचरचा अल्पवयीन मुलावर अत्याचार
4
EPF News: 7 कोटींपेक्षा जास्त लोकांसाठी गुड न्यूज! केंद्र सरकारने पीएफवरील व्याजाची केली घोषणा
5
'...तर कमी लोक मेले असते', पहलगाममध्ये कुंकू पुसलं गेलेल्या महिलांबद्दल भाजप खासदाराचं वादग्रस्त विधान
6
नाव ऐकून गुन्हेगारांना भरायची धडकी! नागपूरचे माजी पोलीस आयुक्त एस.पी. यादव यांचे मुंबईत निधन
7
वैष्णवी मृत्यु प्रकरण : 'कार, दोन पिस्तूल, चांदीची भांडी...' हगवणेंच्या घरून पोलिसांनी जप्त केलं घबाड
8
जिथं संधी मिळते तिथं तो 'बेस्ट'च देतो! टेस्टमधून डावललेल्या श्रेयस अय्यरनं पुन्हा दाखवली आपली ताकद
9
केरळजवळच्या समुद्रात बुडतंय परदेशी जहाज, तटरक्षक दलाने ९ जणांना वाचवले 
10
Mahayuti: छगन भुजबळ यांना काटशह देण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेकडून नरेंद्र दराडे, राजकारण काय?
11
"ज्यांना अजून देश समजला नाही त्यांना परराष्ट्र धोरण काय समजणार?’’, बावनकुळेंची राहुल गांधींवर बोचरी टीका  
12
"मला बऱ्याच दिवसांपासून हे सांगायचं होतं की, मी अनुष्कासोबत रिलेशनशिपमध्ये'; तेज प्रताप यादवांनी दिली प्रेमाची कबुली
13
Sai Sudharsan: भारतीय संघात निवड झाल्यानंतर साई सुदर्शनची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाला?
14
Crime: लग्न मोडल्याच्या रागातून दिवसाढवळ्या तरुणीची निर्घृण हत्या, घरात घुसून चिरला गळा
15
Karun Nair : रोहित-विराटच्या टेस्ट निवृत्तीनंतर आठवला 'त्रिशतकवीर'! आठ वर्षांनी कमबॅकची संधी
16
'धनंजय मुंडेंना क्लीनचिट मिळाली तर मी मंत्रिपदाचा राजीनामा देईन', मंत्री होताच छगन भुजबळांचे मोठे विधान
17
बंदूक नाही पण निलेश चव्हाणचा लॅपटॉप पोलिसांच्या हाती, आत सापडले… 
18
Mohammed Shami: इंग्लंड दौऱ्यासाठी मोहम्मद शमीची निवड का झाली नाही? अजित आगरकर म्हणाले...
19
मोठी अपडेट : वैष्णवी हगवणे प्रकरणात निलेश चव्हाण सहआरोपी, पोलिसांच्या हाती लागण्याची प्रतिक्षा कायम
20
टीम इंडियातील 'प्रिन्स'च्या गळ्यात कॅप्टन्सीची माळ; गंभीर-गिल जोडीसह कसोटीत नवे पर्व

आता मिळणार २४ तासांत वीज जोडणी

By admin | Updated: September 24, 2016 01:41 IST

कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे.

मोबाईल अ‍ॅप : महावितरणचा नवा उपक्रमगोंदिया : कार्यालयाच्या चकरा न मारता फक्त २४ तासात ग्राहकांना वीज जोडणी देण्याचा उपक्रम महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने सुरू केला आहे. महावितरणच्या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने हे शक्य होणार असून शहरासह ग्रामीण भागात सुद्धा ही सुविधा उपलब्ध करवून दिली गेली आहे. ग्राहकांना नवीन वीज कनेक्शन हवे असल्यास विविध कागदपत्रे घेवून वीज वितरण कंपनीच्या कार्यालयाच्या चकरा माराव्या लागत होत्या. मात्र आता काळानुरूप वीज वितरण कंपनीच्या कार्यप्रणालीतही सुसूत्रता आली असून नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर कंपनी करीत आहे. त्यातून आता ग्राहक वीज कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी वीज कंपनीने मोबाईल अ‍ॅप लॉंच केले आहे. या मोबाईल अ‍ॅपच्या मदतीने आता ग्राहकांना बील भरणे, मीटर रिंडींग घेणे आदी सुविधा एका क्लिकवर उपलब्ध होत असतानाच नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करण्याचीही सुविधा मिळत आहे. त्यात नवीन वीज कनेक्शन अधिक सुविधाजनक बनवून देण्यासाठी वीज वितरण कंपनीने राज्यात २४ तासात नवीन वीज कनेक्शन देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी ग्राहकांना मोबाईल अ‍ॅपवरून नवीन वीज कनेक्शनसाठी अर्ज करावयाचा आहे. या मागचा उद्देश असा की, महावितरणद्वारा वीज जोडणी देण्याची संपूर्ण कारवाई आॅनलाईन करणे हा होय. शिवाय नवीन वीज जोडणीचे अर्ज प्राप्त होताच त्याबाबतची तांत्रीक व अन्य बाबींची माहिती महावितरणच्या प्रणालीतून आॅनलाईन करण्याची सोय अभियंता व कर्मचाऱ्यांना अ‍ॅपमुळे शक्य झाली आहे. (शहर प्रतिनिधी)- १२ उपविभागात सुविधा गोंदिया परिमंडळाच्या अधिन असलेल्या गोंदिया व भंडारा मंडळात आठ व चार महावितरण उपविभागीय कार्यालयात अशा १२ उपविभागातून अ‍ॅपद्वारा तोवीच तासात वीज जोडणी देण्यात येणार आहे. यात गोंदिया मंडळात मेन मार्केट कक्ष कार्यालय, दासगाव, गोरेगाव, तिरोडा, आमगाव, देवरी, अर्जुनी-मोरगाव व सडक-अर्जुनी येथे तर भंडारा मंडळात उत्तर भंडार कक्ष, शहापूर कक्ष, साकोली व तुमसर येथे हा उपक्रम राबविला जात आहे. परिमंडळात २६८ वीज जोडणी आतापर्यंत राज्यात १२६० ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली असून परिमंडळात यापैकी २६८ वीज ग्राहक आहेत. यामध्ये सडक-अर्जुनी उपविभागात ४९ ग्राहकांना वीज जोडणी देण्यात आली आहे. यामध्ये दुर्गम व नक्षलग्रस्त भागाचा समावेश आहे. विशेष म्हणजे या उपक्रमांतर्गत इच्छूक ग्राहकाकडून साधा अर्ज सुद्धा प्राप्त झाल्यास वीज वितरण कंपनीचे अधिकारी-कर्मचारी संबंधीत ग्राहकाकडे जाणून त्यांच्याकडून उर्वरीत कागदपत्र व पाहणी करून त्यांना कनेक्शन देणार आहेत.