शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
3
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
4
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
5
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
6
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
7
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
8
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
9
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
10
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
11
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
12
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
13
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण
14
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
15
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
16
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
17
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
18
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
19
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
20
Simhastha Kumbh Mela Nashik: नाशिकमधील रस्ते होणार चकाचक; २२७० कोटी रुपयांची कामे, कोणत्या रस्त्यांचा समावेश?  

पावसाळ्यात सुरगाव-सावराटोला नॉट रिचेबल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 22:15 IST

पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे.

ठळक मुद्दे६० वर्षांपासून रस्ताच नाही : प्रशासनाचे दुर्लक्ष, आंदोलनाचा इशारा

आर.एस.टेंभुर्णे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : पंतप्रधान व मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतंर्गत केंद्र व राज्य सरकार ग्रामीण भागात रस्त्यांचे जाळे तयार करीत असल्याचा दावा करीत आहे. मात्र अद्यापही जिल्ह्यातील ग्रामीण भागातील गावकऱ्यांना पक्क्या रस्त्यांची प्रतीक्षा आहे. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सुरगाव-सावराटोला या गावांना जोडण्यासाठी रस्त्याच नाही. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो. त्यामुळे ही दोन्ही गावे नॉट रिचेबल असतात.सन १९६१ मध्ये सावरटोला गटग्रामपंचायत अस्तित्वात आली. त्यानंतर या ग्रामपंचायतमध्ये सुरगावचा समावेश करण्यात आला. मात्र दोन गावांना जोडणारा रस्ताच नाही. या मार्गावर एक नाला असून पावसाळ्यात या नाल्यावरुन पाणी वाहत असते. त्यामुळे सुरगावचा सावराटोल्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे येथील गावकऱ्यांना मुंगली अथवा चापटी या गावावरुन ७ किमीचे अंतर कापून सावरटोला येथे जावे लागते. मागील अनेक वर्षांपासून रस्त्याची मागणी सुरगाव ग्रामवासीयांकडून केली जात आहे. मात्र या मागणीकडे लोकप्रतिनिधी, शासन ग्रामपंचायत प्रशासनाने सुध्दा दुर्लक्ष केले आहे. प्रशासनाला येथे रस्ताच तयार करुन द्यायचा नसेल तर त्यांनी सावरटोला ग्रामपंचायतमधून सुरगावला वगळून त्यांचा समावेश मुंगली अथवा चापटी ग्रामपंचायतमध्ये करण्याची मागणी येथील गावकºयांची आहे. सुरगाव हे रिठी गाव आहे. चापटी मालगुजारीमध्ये या गावाचा समावेश होता. परदेशीनबाई व हिराईबाईचा सुरगाव म्हणून ओळखला जातो. या दोघींची मालगुजारी चापटी व सुरगाव येथे होती. कालंतराने हे गाव रिठी झाले. त्यानंतर चापटी व बाहेरगावावरुन काही लोक या ठिकाणी राहयला लागले. नंतर सुरगाव उदयास आले. या गावाची लोकसंख्या २१२ ऐवढी आहे. या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा होती.पहिला वर्ग तीन वर्षापूर्वी या गावात सुरु झाला. परंतु गेल्या दोन अडीच वर्षापूर्वी ३ रा व ४ था वर्ग सुरु होण्यापूर्वीच या गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, जि.प.गोंदियाच्या शिक्षण विभागाने बंद केली.आता या गावची पहिल्या वर्गापासूनची मुले मुंगली येथील तीन कि.मी. अंतरावरील जि.प. वरिष्ठ प्राथमिक शाळेत पायी चालत जातात. तर गावात आरोग्य, शिक्षण, बेरोजगारीच्या अनेक समस्या आहेत.विविध दाखल्यांसाठी पायपीटविद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक कामासाठी लागणारे दाखले व गावकऱ्यांना विविध कामासाठी लागणारे प्रमाणपत्रे, शासकीय योजनांचे अर्ज, रंोजगार हमी कामावर जाण्यासाठी कागदपत्रांच्या कामांसाठी ग्रामपंचायत सावरटोला येथे ७ कि.मीे.चे अंतर पार करुन मुंगली किंवा चापटीवरुन जावे लागते. पावसाळ्यात या दोन्ही गावांचा संपर्क तुटत असल्याने गावकºयांना विविध अडचणींना सामोरे जावे लागते.रस्त्यासाठी जमिनी देणाऱ्यावरुन तिढासुरगाव व सावरटोला या दोन गावांच्या मध्ये एक नाला आहे. या नाल्याला लागून चापटी व सावरटोला येथील काही शेतकऱ्यांची शेती आहे. रस्ता तयार करण्यासाठी तीन शेतकरी जमिन देण्यास तयार आहेत. मात्र दोन शेतकरी जमीन देण्यास तयार नाही. प्रशासनाने पुढाकार घेवून शेतकºयांची समजूत घातल्यास रस्त्याचा प्रश्न मार्गी लागू शकतो. असे उपसरपंच भागवत मुंगमोडे यांनी सांगितले.पूल तयार करा अथवा ग्रा.पं.मधून वगळानाल्यालगत असलेली सुरगाव व सावराटोली जमीन शासनाने अधिग्रहीत करुन या दोन गावांना जोडण्यासाठी नाल्यावर पूल तयार करावा. अथवा ते शक्य होत नसेल तर सावरटोला ग्रामपंचायतमधून सुरगावचा मुंगली किंवा चापटी ग्रामपंचायतमध्ये समावेश करावा, अशी येथील गावकºयांची मागणी आहे.

सुरगाव व सावरटोला या गावाला जोडणारा रस्ता तयार करण्याची मागणी केली. मात्र ग्रामपंचायत व जिल्हा प्रशासनाने सुध्दा याकडे दुर्लक्ष केले आहे. पावसाळ्यात या गावाचा सावरटोल्याशी संपर्क तुटतो. त्यामुळे ७ कि.मी.ची पायपीट करुन जावे लागते.-प्रेमदास लांडगे,गावकरी, सुरगाव..........................................नाल्यालगतच्या शेतजमिनी अधिग्रहित करुन रस्ता तयार करण्याचा प्रयत्न केला जात आहे. परंतु काही शेतकरी शेतजमिनी द्यायला तयार नाहीत. त्यामुळे रस्ता तयार करण्यात अडथळा येत आहे. पटसंख्येअभावी शिक्षण विभागाने येथील प्राथमिक शाळा सुध्दा बंद केली.- भागवत मुंगमोडे,उपसरपंच,गट ग्रामपंचायत सावरटोला