शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

रस्त्यात खड्डे नव्हे, खड्ड्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:25 IST

गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते.

ठळक मुद्देवडसा-कोहमारा राज्य महामार्गाची दुर्दशा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. वडसा-कोहमारा राज्य महामार्गावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्गच नाही.गोंदिया-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वडसा-कोहमारा हा मार्ग आहे. या मार्गाने मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल राज्यातून आंधप्रदेश राज्याकडे वाहतूक होते.या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी दरवर्षी लाखोंचा रुपयांचा खर्च केला जातो.परंतु पुन्हा खड्डे जैसे थे राहत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढ्याच खर्चात नवीन रस्ते तयार झाले असते, असे या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर विशेषत: खामखुरा ते गौरनगरच्या पुढे पर्यंत प्रवास करताना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो.गतवर्षी याच मार्गाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी दौरा केला होता. ते या मार्गाने येणार असल्याची खात्री पटल्यानंतर रात्रंदिवस एक करुन अधिकाऱ्यांनी या रस्त्यारील खड्डे बुजवूज अगदी नववधुसारखी सजावट केली होती. जर मंत्री महोदयांच्या आगमनाप्रित्यर्थ रस्ते गुटगुटीत होत असतील तर या जिल्ह्याचे पालकमंत्री ना.परिणय फुके यांनी सुद्धा एखादा दौरा करुन बघावा अशी जनतेची मागणी आहे.२००९ ते २०१४ या शासन काळात काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता होती. त्यावेळी राजकुमार बडोले हे भाजपचे आमदार होते. आघाडी सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देत नसल्याची खंत त्यांनी यावर केली होती.मात्र २०१४ ते २०१९ या काळात ते मंत्री होते. मात्र ते सुद्धा या रस्त्याचा कायापालट करु शकले नाही.गतवर्षी राष्टÑवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने याच रस्त्यावर बेशरमची झाडे लावून शासनाचे लक्ष वेधले होते. तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र अजुनही रस्त्याची दुर्दशा तशीच आहे.आसोली या गावाच्या पुढे या रस्त्याने वाहतूक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.दुचाकीस्वारांशी तर अनेकदा प्रकार घडले आहेत.या राज्य महामार्गाचे नवीनीकरण न करण्याचे गौडबंगाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. या विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता लवकरच रस्ता तयार होणार अशी राजकीय मंडळीसारखी कोरडी आश्वासने देतात. या सर्व प्रकारामुळे खड्डेमुक्त महाराष्टÑ या शासनाच्या योजनेचे श्राद्ध करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांच्याकडून जनतेच्या बºयाच अपेक्षा आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक