शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

रस्त्यात खड्डे नव्हे, खड्ड्यात रस्ते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2019 22:25 IST

गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते.

ठळक मुद्देवडसा-कोहमारा राज्य महामार्गाची दुर्दशा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : गावातील रस्ते गुटगुटीत झाले आहेत. मात्र ज्या रस्त्यांच्या माध्यमातून कर मिळतो,अशा रस्त्यांची मात्र दुर्दशा झाली आहे. खड्डे बुजवा अभियान शासन राबविते. मात्र सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्र्यांना जिल्ह्यातच रस्त्यांची अशी दूरवस्था बघावयाला मिळते. वडसा-कोहमारा राज्य महामार्गावर रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते हे कळायला मार्गच नाही.गोंदिया-गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्याला जोडणारा वडसा-कोहमारा हा मार्ग आहे. या मार्गाने मध्यप्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल राज्यातून आंधप्रदेश राज्याकडे वाहतूक होते.या मार्गावर ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. ते बुजविण्यासाठी दरवर्षी लाखोंचा रुपयांचा खर्च केला जातो.परंतु पुन्हा खड्डे जैसे थे राहत आहेत. खड्डे बुजविण्यासाठी आतापर्यंत जेवढा खर्च झाला तेवढ्याच खर्चात नवीन रस्ते तयार झाले असते, असे या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांचे म्हणणे आहे. या रस्त्यावर विशेषत: खामखुरा ते गौरनगरच्या पुढे पर्यंत प्रवास करताना जीव मुठीत घेवूनच प्रवास करावा लागतो.गतवर्षी याच मार्गाने राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकातदादा पाटील यांनी दौरा केला होता. ते या मार्गाने येणार असल्याची खात्री पटल्यानंतर रात्रंदिवस एक करुन अधिकाऱ्यांनी या रस्त्यारील खड्डे बुजवूज अगदी नववधुसारखी सजावट केली होती. जर मंत्री महोदयांच्या आगमनाप्रित्यर्थ रस्ते गुटगुटीत होत असतील तर या जिल्ह्याचे पालकमंत्री ना.परिणय फुके यांनी सुद्धा एखादा दौरा करुन बघावा अशी जनतेची मागणी आहे.२००९ ते २०१४ या शासन काळात काँग्रेस-राष्टÑवादीची सत्ता होती. त्यावेळी राजकुमार बडोले हे भाजपचे आमदार होते. आघाडी सरकार विरोधी पक्षाच्या आमदारांना विकास निधी देत नसल्याची खंत त्यांनी यावर केली होती.मात्र २०१४ ते २०१९ या काळात ते मंत्री होते. मात्र ते सुद्धा या रस्त्याचा कायापालट करु शकले नाही.गतवर्षी राष्टÑवादी काँग्रेसच्या विद्यार्थी सेनेने याच रस्त्यावर बेशरमची झाडे लावून शासनाचे लक्ष वेधले होते. तात्पुरती डागडुजी करण्यात आली. मात्र अजुनही रस्त्याची दुर्दशा तशीच आहे.आसोली या गावाच्या पुढे या रस्त्याने वाहतूक करणे म्हणजे अपघाताला निमंत्रण देण्यासारखे आहे.दुचाकीस्वारांशी तर अनेकदा प्रकार घडले आहेत.या राज्य महामार्गाचे नवीनीकरण न करण्याचे गौडबंगाल अद्यापही गुलदस्त्यात आहे. या विभागाच्या अधिकाºयांशी चर्चा केली असता लवकरच रस्ता तयार होणार अशी राजकीय मंडळीसारखी कोरडी आश्वासने देतात. या सर्व प्रकारामुळे खड्डेमुक्त महाराष्टÑ या शासनाच्या योजनेचे श्राद्ध करण्यात येत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून होत आहे. राज्याचे सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री परिणय फुके यांच्याकडून जनतेच्या बºयाच अपेक्षा आहेत.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक