शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संवर्धन करणेही गरजेचे ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:19 IST

खातिया : झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ...

खातिया : झाडांच्या कत्तलीमुळे पर्यावरणाचे संतुलन बिघडले असून, त्याचे दुष्परिणाम आता बघावयास मिळत आहेत. अशात जास्तीत जास्त झाडे लावणे ही काळाची गरज आहे. मात्र, फक्त यावेळी झाडे लावणेच नव्हे, तर त्यांचे संरक्षण व संवर्धन करणे हीसुद्धा आम्हा सर्वांची जबाबदारी आहे असे प्रतिपादन विमानतळ संचालक विनय ताम्रकार यांनी केले.

बिरसी विमानतळ येथे भारतीय विमानपतन प्राधिकरणच्यावतीने अभिनव भारतच्या ७५ व्या स्वातंत्र्य अमृतमहोत्सवानिमित्त मंगळवारी (दि.२०) आयोजित वृक्षारोपण महोत्सव कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी नयना गुंडे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, एनएफटीआईचे जीएम पेट्रीक मरसी, मुख्य उडान प्रशिक्षक दीपक चंद्रण, इग्रुआके सीएफआई बरनी शंकर, मुख्य सुरक्षा अधिकारी मिलेंद्र नीरमालकर, विमानतळ समितीचे सदस्य गजेंद्र फुुंडे, एअरपोर्ट टर्मिनल प्रबंधक इंडियन ऑयलचे वसंत पारडीकर, पंकज वंजारी, विनोद नेताम, आदी प्रामुख्याने उपस्थित होते. यावेळी नीम, बाबूळ, गुलमोहर, करंजी, आदी प्रजातींची एकूण ३० रोपटी विमानतळ परिसरात लावण्यात आली. गेल्या अनेक वर्षांपासून बिरसी विमानतळाच्यावतीने अनेक ठिकाणी वृक्षारोपण करण्यात येत असून, पर्यावरण संतुलित ठेवण्याच्या उद्देशातून हे कार्यक्रम घेण्यात येत आहे.