शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
ट्रम्प यांनी दंड थोपटले! अमेरिकेच्या तीन युद्ध नौका व्हेनेझुएलाच्या दिशेने रवाना; ४००० सैन्यही सज्ज
3
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
4
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
5
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
6
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
7
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
8
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
9
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!
10
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
11
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
12
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
13
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
14
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
15
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
16
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
17
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
18
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
19
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
20
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा

राबराब राबून हातात दमडीही नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

अमरचंद ठवरे बोंडगावदेवी : निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भात शेती दरवर्षी दगा देत असल्याने तोटाच सहन करावा लागत आहे. ...

अमरचंद ठवरे

बोंडगावदेवी : निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भात शेती दरवर्षी दगा देत असल्याने तोटाच सहन करावा लागत आहे. यात काही बदल करीत विहिरगाव/बर्ड्या येथील विश्वनाथ व त्यांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे साथ देणारी सहचारिणी विशाखा वालदे यांनी दोन एकरात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. दिवस-रात्र राबराब राबून पीक हातात आले. हाती आलेला भाजीपाला दररोज तालुक्यात विक्री करतात. परंतु कमी भावाने मालाची विक्री होत असल्याने हातामध्ये दमडीही लागत नसल्याचे विशाखा विश्वनाथ वालदे यांनी सांगितले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव (बर्ड्या) येथील विश्वनाथ वालदे मागील काही वर्षांपासून भात पिकाची लागवड न करता नावीन्यपूर्ण पिके घेण्यात त्यांचा नावलौकिक आहे. अख्ख्या कुटुंबाला त्यांनी प्रयोगशील शेती करण्यात झोकून दिले. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात त्यांनी छोटेसे घर बांधून कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. सध्या पावसाळी हंगामात त्यांनी भेंडी, दोडका, चवाळीच्या शेंगा, वांगी, काकडी या पिकांची लागवड केली. मांडव पद्धतीने काकडी पिकाची लागवड अर्धा एकरात केली होती. निसर्गाच्या कोपाने काकडीचा मांडवच खाली कोसळला. संपूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने जवळपास दोन लाखांचे नुकसान झाल्याचे विश्वनाथ वालदे यांनी सांगितले. तंत्रशुद्ध यांत्रिकी पद्धतीने संपूर्ण कुटुंबातील सदस्य शेती करून स्वत:च राबतात.

बॉक्स.....

राबराब राबून हातात दमडीही नाही

हाती आलेला भाजीपाला तोडण्यासाठी सकाळच्या पाळीत महिला मजूर शेतात राबतात. सकाळी ६ पासून ८ पर्यंत भाजीपाला तोडला जातो. पॅकिंग व वजन काटा करून तालुक्याच्या बाजारात उत्पादित केलेला भाजीपाला नेला जातो. व्यापारी कमी भावाने मालाची खरेदी करतो. सध्या दोडका १५ ते २० रुपये किलो, चवळी शेंगा १० ते १५ रुपये किलो, भेंडी ५ ते १० रुपये किलोप्रमाणे विकून घरची वाट धरावी लागते. कमी भाव, निसर्गाचा कोप, विद्युत विभागाचा कानाडोळा त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही, अशी व्यथा वालदे यांनी मांडली.