शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
2
Maharashtra Rain: लहरी पावसाने शेतकऱ्यांना रखडविले, केवळ २२ लाख हेक्टरवर पेरण्या पूर्ण  
3
ई-बाइक टॅक्सी सेवा नको! राज्य परिवहन विभागास नागरिकांच्या सूचना
4
Todays Horoscope: 'या' राशींच्या लोकांचं नशीब फळफळणार! कसा असेल तुमचा आजचा दिवस? जाणून घ्या
5
...तर नाराजी घ्यायची ताकद ठेवावी लागते; शरद पवारांनी मांडली स्पष्ट भूमिका
6
युद्धाचा भडका, तेल खरेदीचा झपाटा! महागाई वाढणार, भारताच्या व्यापाराला मोठा  फटका
7
लेख: कमी जागा कोण घेणार? भाजप की शिंदेंची शिवसेना?
8
Mumbai: २ कोटी ३६ लाख... बंद विमा पॉलिसीतील पैशांसाठी दादरमधील आजोबांनी गमावली आयुष्याची जमापुंजी
9
युद्धात उतरली महासत्ता! ऑपरेशन मिडनाइट हॅमर, इराणच्या ३ अणुतळांवर अमेरिकेचे १४ बॉम्ब
10
Iran Israel Conflict: काही दिवस संकटाचे, बाजार कोसळणार? 
11
Mumbai Local Train: मोटरमनच्या केबिनमध्ये आता सीसीटीव्हीचा ‘वॉच’, मुंब्रातील घटनेनंतर काम फास्ट ट्रॅकवर
12
Pahalgam Attack: पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना आश्रय देणारे दोघे अटकेत
13
जेएनपीए चॅनलच्या भ्रष्टाचारात आणखी अधिकारी अडकणार? वाढवण बंदराचे संचालक पदही जाणार?
14
निम्म्या जगावर इंधनाचे संकट? इराण बंद करणार होर्मुझची सामुद्रधुनी; प्रस्ताव मंजूर
15
विशेष लेख : ...शेवटी ट्रम्प काका म्हणतील तेच खरे!
16
शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 
17
बघ्यांसमोर प्राण सोडला, मृतदेह २ तास रस्त्यावर; पोलिसांची विनंतीही धुडकावली
18
अग्रलेख: भावना दुखावलेल्यांची झुंड, लोकशाही धोक्यात असल्याची ही लक्षणे
19
नालेसफाईतील पैशांचा गाळ नेमका कुणाच्या खिशात? यंत्रणा काय करत होती? 
20
ENG vs IND : आता अनुभवी KL राहुलसह कॅप्टन शुबमन गिलवर मोठी जबाबदारी

राबराब राबून हातात दमडीही नाही ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:34 IST

अमरचंद ठवरे बोंडगावदेवी : निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भात शेती दरवर्षी दगा देत असल्याने तोटाच सहन करावा लागत आहे. ...

अमरचंद ठवरे

बोंडगावदेवी : निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून असलेली भात शेती दरवर्षी दगा देत असल्याने तोटाच सहन करावा लागत आहे. यात काही बदल करीत विहिरगाव/बर्ड्या येथील विश्वनाथ व त्यांच्या खांद्याला खांदा लावून भक्कमपणे साथ देणारी सहचारिणी विशाखा वालदे यांनी दोन एकरात भाजीपाल्याचे उत्पादन घेतले आहे. दिवस-रात्र राबराब राबून पीक हातात आले. हाती आलेला भाजीपाला दररोज तालुक्यात विक्री करतात. परंतु कमी भावाने मालाची विक्री होत असल्याने हातामध्ये दमडीही लागत नसल्याचे विशाखा विश्वनाथ वालदे यांनी सांगितले.

अर्जुनी मोरगाव तालुक्यातील विहिरगाव (बर्ड्या) येथील विश्वनाथ वालदे मागील काही वर्षांपासून भात पिकाची लागवड न करता नावीन्यपूर्ण पिके घेण्यात त्यांचा नावलौकिक आहे. अख्ख्या कुटुंबाला त्यांनी प्रयोगशील शेती करण्यात झोकून दिले. गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतशिवारात त्यांनी छोटेसे घर बांधून कायमस्वरुपी वास्तव्याने राहत आहेत. सध्या पावसाळी हंगामात त्यांनी भेंडी, दोडका, चवाळीच्या शेंगा, वांगी, काकडी या पिकांची लागवड केली. मांडव पद्धतीने काकडी पिकाची लागवड अर्धा एकरात केली होती. निसर्गाच्या कोपाने काकडीचा मांडवच खाली कोसळला. संपूर्ण पीक उदध्वस्त झाल्याने जवळपास दोन लाखांचे नुकसान झाल्याचे विश्वनाथ वालदे यांनी सांगितले. तंत्रशुद्ध यांत्रिकी पद्धतीने संपूर्ण कुटुंबातील सदस्य शेती करून स्वत:च राबतात.

बॉक्स.....

राबराब राबून हातात दमडीही नाही

हाती आलेला भाजीपाला तोडण्यासाठी सकाळच्या पाळीत महिला मजूर शेतात राबतात. सकाळी ६ पासून ८ पर्यंत भाजीपाला तोडला जातो. पॅकिंग व वजन काटा करून तालुक्याच्या बाजारात उत्पादित केलेला भाजीपाला नेला जातो. व्यापारी कमी भावाने मालाची खरेदी करतो. सध्या दोडका १५ ते २० रुपये किलो, चवळी शेंगा १० ते १५ रुपये किलो, भेंडी ५ ते १० रुपये किलोप्रमाणे विकून घरची वाट धरावी लागते. कमी भाव, निसर्गाचा कोप, विद्युत विभागाचा कानाडोळा त्यामुळे पिकांना वेळेवर पाणी देता येत नाही, अशी व्यथा वालदे यांनी मांडली.