शहरं
Join us  
Trending Stories
1
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
2
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
3
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
4
बांगलादेशचं पाकिस्तानच्या पावलावर पाऊल! चीनकडून खरेदी करणार १५००० कोटींची २० लढाऊ विमाने
5
प्लेन रनवेवर टेकऑफसाठी सुसाट धावलं, पण अचानक पायलटचं नियंत्रण सुटलं आणि...; व्हिडीओ व्हायरल
6
रोहित पवारांचा सभापती राम शिंदेंवर खळबळजनक आरोप; निलेश घायवळला देशाबाहेर पळवण्यामागे कोण?
7
Video - कर्तव्यनिष्ठेला सलाम! IAS संस्कृती जैन यांना सोनेरी पालखीतून अनोखा निरोप, पाणावले डोळे
8
याला म्हणतात जबरदस्त लिस्टिंग, २०% प्रीमिअमसह लिस्ट झाला शेअर; खरेदीसाठी गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
9
"नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नरेंद्र मोदी नाव द्यावं, अदानींचा दि.बा.पाटील नावाला विरोध"
10
“CJI गवई यांच्यावरील हल्ला हा लोकशाहीवरचा हल्ला, सर्वांनी संताप व्यक्त करायला हवा”: सपकाळ
11
VIDEO: आ रा रा रा खतरनाकsss... पक्ष्याने चक्क गिळला जिवंत साप, पाहून तुम्हीही व्हाल अवाक्
12
पुढील वर्षी सरासरी १० टक्क्यांपर्यंत पगारवाढ; सर्वाधिक लाभ कुणाला मिळणार?
13
दिवाळीला कार घ्यायचीय? HDFC, ICICI की IndusInd? ५ वर्षांसाठी सर्वात कमी हप्ता कोणाचा?
14
चीन-भारताच्या संबंधात फिल्मी क्लायमॅक्स; ड्रॅगन म्हणाला, " आश्वासन द्या, आम्ही जे देऊ ते अमेरिकेला देणार नाही..."
15
प्रेमानंद महाराजांची प्रकृती आणखी खालावली? आश्रमाकडून मिळाली 'ही' अधिकृत माहिती 
16
रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार हे आधीच सांगितलं होतं.. प्रेस कॉन्फरन्समध्ये झाला मोठा खुलासा
17
फक्त ८८६ चेंडूत टेस्ट मॅच संपवली; ऑस्ट्रेलियाचा धुव्वा उडवून भारतानं रचला इतिहास!
18
गोल्ड ईटीएफ ठरला नवा मल्टीबॅगर स्टॉक! इतक्या वर्षात ₹१० लाखाचे झाले तब्बल ₹१ कोटी रुपये!
19
Ratan Tata Death Anniversary: वाद... आव्हानं.., रतन टाटांच्या निधनानंतर एका वर्षात किती बदलला टाटा समूह
20
बायकोचं ऐकलं नाही, रोडट्रिपला गेला; अपघतात ३५ वर्षीय गायकाचा मृत्यू, दोन लहान मुलं पोरकी

जडवाहनांना शहरात प्रवेशबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2020 05:00 IST

शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.

ठळक मुद्देवाहतूक नियंत्रण शाखेचा प्रयोग। मंगळवारपासून येणार अंमलात

कपिल केकत ।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरातील रस्ते अगोदरच अरूंद असून त्यात जडवाहनांचा शिरकाव नागरिकांसाठी त्रासदायक व तेवढाच धोकादायक ठरत आहे. जडवाहनांमुळे शहरात कित्येक अपघात घडले असून नागरिकांचा नाहक जीव गेल्याचे प्रकारही घडले आहेत. हे प्रकार थांबविण्यासाठी आता वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजता पर्यंत प्रवेशबंदी केली आहे. मंगळवारपासून (दि.२७) यावर अंमलबजावणी केली जाणार आहे.शहरातील लोकसंख्या झपाटयाने वाढत चालली असून त्याचप्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहनांचे प्रमाणही वाढत आहे. मात्र शहरातील रस्त्यांची स्थिती तीच असून अगोदरच असलेल्या अरूंद रस्त्यांमुळे वाहतुकीची कोंडी होत असून नागरिक चांगलेच त्रस्त झाले आहेत. विशेष म्हणजे, शहरातील बाजारपेठेतील रस्ते अरूंद असून त्यातच व्यापाऱ्यांचा माल घेऊन येणाऱ्या जडवाहनांचा दिवसभर शिरकाव होत असतो. परिणामी बाजारपेठेतील वाहतुक विस्कळीत होऊन नागरिकांची गैरसोय होते.शहरातील वाहतूक सुरळीत व सुरक्षीत ठेवण्याच्या दृष्टीने तसेच सामान्य जनतेला धोका, गैरसोय व अडथळा निर्माण होऊ नये यादृष्टीने वाहतूक नियंत्रण शाखेने जडवाहनांना शहरात सकाळी ९ ते रात्री ९ वाजतापर्यंत प्रवेशबंदीसाठी पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्याकडे प्रस्ताव मांडला होता.त्यास अधीक्षकांनी ग्रीनसिग्नल दिला असल्याने मंगळवारी (दि.२७) सकाळी ९ वाजतापासून शहरात जडवाहनांना प्रवेशबंदी केली जाणार आहे.२ नोब्हेंबर पर्यंत प्रायोगीक तत्वावरवाहतूक नियंत्रण शाखेचा हा प्रयोग २ ऑक्टोबर पर्यंत प्रायोगीक तत्वावर राबविला जाणार आहे. मात्र त्यानंतर कायमस्वरूपी अधिसूचना लागू करण्यात येणार आहे. मात्र तरिही या प्रयोगामुळे नागरिकांना काही अडचण होत असल्यास त्यांचे आक्षेप जाणून घेतले जाणार आहे. यासाठी वाहतूक नियंत्रण शाखेच्या मनोहर चौकातील कार्यालय तसेच पोलीस नियंत्रण कक्ष येथे लेखी स्वरूपात नागरिकांना आपले आक्षेप नोंदविता येणार आहेत.या मार्गावर राहणार जडवाहनांना प्रवेशबंदीकारंजा टी-पॉईंटकडून गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.पतंगा चौक ते फुलचूर शहराकडे येणारा मुख्य रस्ता.राजाभोज चौक ते छोटा गोंदिया मार्गे गोंदिया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.मरारटोली जंक्शनकडून गोंदया शहराकडे येणारा मुख्य रस्ता.राणी अवंतीबाई चौक ते छोटा पाल चौककडे येणार मुख्य रस्ता.कुडवा नाका ते पाल चौक कडे येणारा मुख्य रस्ता.सिंधी स्कूल ते गोंदिया शहराकडे येणार मुख्य रस्ता.

टॅग्स :road transportरस्ते वाहतूक