शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

पाणी टंचाईचे प्रशासनाला ‘नो टेंशन’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2018 23:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलसाठी लागणारे सुटे सामान आणि पाईप उपलब्ध नाहीत. परिणामी बोअरवेल दुरूस्तीचे कामे रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत लागत आहे. गावकऱ्यांची पाणी टंचाईबाबत ओरड वाढल्यानंतरही प्रशासनाने मात्र कुठलीच उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे पाणी टंचाईवर प्रशासन नो टेशंनमध्ये ...

ठळक मुद्देसहा महिन्यांपासून पाईपचा तुटवडा : महिलांची पाण्यासाठी भटकंती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाकडे मागील सहा महिन्यापासून बोअरवेलसाठी लागणारे सुटे सामान आणि पाईप उपलब्ध नाहीत. परिणामी बोअरवेल दुरूस्तीचे कामे रखडल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागत लागत आहे. गावकऱ्यांची पाणी टंचाईबाबत ओरड वाढल्यानंतरही प्रशासनाने मात्र कुठलीच उपाय योजना केलेली नाही. त्यामुळे पाणी टंचाईवर प्रशासन नो टेशंनमध्ये असल्याचे चित्र आहे.मागील वर्षी जिल्ह्यात केवळ ५४ टक्के पाऊस झाला. परिणामी सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा अत्यल्प पाणीसाठा आहे. भूजल सर्वेक्षण विभागाने मागील पाच वर्षांच्या तुलनेत जिल्ह्याची भूजल पातळी २ मीटरने खालावली असून उन्हाळ्यात पाणी टंचाईची तीव्र समस्या निर्माण होण्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाला दिला होता.त्यावरुन जि. प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने यावर वेळीच उपाय योजना करण्याची गरज होती. मात्र जिल्ह्यात सध्या नेमके या विरोधात चित्र आहे.जानेवारी महिन्यातच गावातील महिलांची पाण्यासाठी भटकंती सुरू असताना प्रशासनाला मात्र त्याच्याशी काहीे घेणे देणे नसल्याचे चित्र आहे. भूजल पातळी खालावल्याने ग्रामीण भागातील बोअरवेलची पाण्याची पातळी खालावली आहे. त्यासाठी नवीन पाईपची गरज आहे.जिल्ह्यातील आठही पं.स.मध्ये जवळपास ७० बोअरवेल बंद आहे. तर मागील सहा महिन्यापासून पाईप व सुटे सामान उपलब्ध नाहीत.पाईप अभावी बोअरवेल नादुरस्त असल्याने गावातील महिलांची सकाळपासून पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. मात्र गावकºयांच्या समस्येशी जिल्हा प्रशासनाला काहीच घेणे देणे नसल्याचे चित्र आहे.या विषयाला घेऊन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी जि.प.च्या मागील दोन तीन सभेत या विषयावर चर्चा घडवून आणली. तेव्हा पाईप खरेदीसाठी ७२ लाख रुपये पाणी पुरवठा विभागाला देण्याचा निर्णय घेण्यात सभेत घेण्यात आला होता.मात्र, डिसेंबरच्या सभेची अद्यापही अवतरण प्रत तयार झाली नसल्याने तो निधी जि.प.ग्रामीण पाणी पुरवठा विभागाला मिळाला नाही. परिणामी पाईपची खरेदी झाली नसल्याची माहिती आहे.आठ दिवसात तोडगा काढा, अन्यथा आंदोलनजिल्ह्यात यंदा कमी प्रमाणात पाऊस झाला परिणामी भूजल पातळी खालावली आहे. मागील सहा महिन्यांपासून जिल्ह्यात बोअरवेलसाठी लागणारे पाईप व सुटे साहित्त्य उपलब्ध नाहीत. यासाठी मागील सभेत चर्चा झाली. त्यासाठी ७० लाख रुपयांचा निधी देण्याच्या निर्णय घेण्यात आला. मात्र अद्यापही पाईपची खरेदी करण्यात आली नाही. त्यामुळे पाणी टंचाईची समस्या कायम आहे. जि.प. ग्रामीण पाणी पुरवठा विभाग व जिल्हा प्रशासनाने यावर आठ दिवसात तोडगा न काढल्यास राष्ट्रवादी काँग्रेस या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी दिला आहे.अध्यक्षांच्या कार्यकाळातील पहिलीच सभा तहकूबमंगळवारी (दि.२३) स्थायी समितीची सभा नव्याने पदारुढ झालेल्या जि.प.अध्यक्षा सीमा मडावी यांनी बोलावली होती. त्यामुळे या सभेत पाणी टंचाई आणि पाईप खरेदीचा मुद्दा विरोधक लावून धरणार होते. पण ही सभा तहकुब झाल्याने त्यावर चर्चा होवू शकली नाही. दुष्काळ, पाणी टंचाई, २१ बंद शाळा या विषयांवर चर्चाच झाली नाही. त्यामुळे सत्ताधाऱ्यांना ग्रामीण भागातील समस्यांशी काहीच घेणे देणे नसल्याचा आरोप जि.प.सदस्य परशुरामकर, सुरेश हर्षे, मनोज डोंगरे, राजलक्ष्मी तुरकर, जियालाल पंधरे, सुखराम फुंडे, किशोर तरोणे यांनी केला आहे.