- जिल्ह्यात कोरोना नियंत्रणात : २७४ शाळांमध्ये वाजली घंटा
कपिल केकत
गोंदिया : राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आली आहे. यामुळे शाळा सुरू करण्यास निर्माण झालेले वातावरण बघून राज्य शासनाने स्थानिक स्तरावर निर्णय घेऊन शाळा करण्यास परवानगी दिली. त्यानुसार, जिल्ह्यातही वर्ग आठवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने आजघडीला जिल्ह्यातील ३७६ पैकी २७४ शाळांची घंटा वाजली आहे. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये विद्यार्थीच कोरोनाबाधित निघाल्याने शाळाच बंद करण्याची पाळी आली आहे. मात्र, सुदैवाने जिल्ह्यात असा प्रकार घडलेला नाही. जिल्ह्यात सुरू झालेल्या २७४ शाळा सुरू झाल्यानंतर त्यातील एकही शाळा आतापर्यंत बंद करण्याची पाळी आलेली नाही.
--------------------------
- जिल्ह्यात एकूण शाळा - ३७६
-सध्या सुरू असलेल्या शाळा - २७४
------------------------
२) कोणत्या वर्गात किती उपस्थिती?
मुले-मुली एकूण उपस्थितीचे प्रमाण (%)
आठवी - १०४७५ १०१२६ २०६०१
नववी - १०७१५ १००५७ २०७७२
दहावी - ११६७३ १०८४९ २२५२२
अकरावी - ९००९ ९५०० १८५०९
बारावी - १०६२७ १०२२९ २०८५६
--------------------------------
एकही शाळा बंद नाही
- राज्य शासनाच्या आदेशानुसार पालकांची परवानगी घेऊन जिल्ह्यातील २७४ शाळा सुरू करण्यात आल्या असून, त्यातील एकही शाळा बंद झाली नाही.
- शाळा सुरू करण्यासाठी जिल्ह्यातील २८९०० पालकांनी संमती दिली असून, त्यानुसार शाळा सुरू आहेत. यात गोंदिया तालुक्यातील सर्वांत शाळा सुरू असल्याचे दिसत आहे.
- जिल्ह्यात कोरोनाची स्थिती नियंत्रणात असून, आतापर्यंत एकही विद्यार्थी बाधित निघालेला नाही. त्यामुळे शाळा बंद करण्याची गरजच पडलेली नाही.
-------------------------------
विद्यार्थ्यांना मिळाले आपले मित्र
मागील मार्च महिन्यापासून शाळा बंद असल्याने घरातच कोंडून राहावे लागत होते. मात्र, आता शाळा सुरू झाल्याने आपल्या मित्रांना भेटता आले. नियमात राहून का होईना मात्र अभ्यासासोबतच आता मित्रांच्या भेटीगाठी तरी होत आहेत.
-अभिषेक वाघमारे (विद्यार्थी)
-----------------------------
शाळा सुरू झाल्याने आता घराबाहेर पडता येत आहे. नाहीतर मागील वर्षापासून घरातच राहावे लागत होते. आता अभ्यासही होत असतानाच मित्रांसोबतही भेटता येत आहे.
-विनोद तुरकीवार (विद्यार्थी)
---------------------------
मागील वर्षापासून शाळा बंद असल्याने मुले घरात कोंडून होती. घरात राहून त्यांना कंटाळा आला होता. शिवाय ऑनलाइनमध्ये हवा तसा अभ्यास होत नव्हता. आता शाळा सुरू झाल्याने मुले अभ्यास करीत असून, त्यांना घराबाहेरही पडता येत आहे.
-देवीदास कोरटे (पालक)