शहरं
Join us  
Trending Stories
1
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
2
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
3
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
4
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
5
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
6
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
7
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
8
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
9
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
10
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
11
२०२५चे शेवटचे पंचक: ५ दिवस अशुभ, पण ‘ही’ कामे करणे शुभ; दोष लागणार नाही, नेमके काय टाळावे?
12
Bigg Boss Marathi: लावणी डान्सरला 'बिग बॉस मराठी'ची ऑफर? म्हणाली- "मला त्यांच्याकडून मेल आलाय..."
13
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
14
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
15
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
16
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
17
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
18
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
19
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
20
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
Daily Top 2Weekly Top 5

मानवी जीवाच्या विषयावर राजकारण नको

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2021 04:29 IST

गोंदिया : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी ...

गोंदिया : गतवर्षीच्या लॉकडाऊनच्या कडू आठवणी सगळ्यांच्याच स्मरणात आहेत. दिवसाचे लॉकडाऊन परवडण्यासारखे नाही. गरीब, गरजू, लघू व मध्यम व्यापारी व जनतेचे हित आणि सुरक्षिततेची भावना लक्षात घेता रात्रीच्या लॉकडाऊनसंदर्भात निर्णय घेण्यात आला. रोज कोविडच्या हजारो चाचण्या होत आहे. भाजपशासित राज्यात चाचण्या नगण्य आहेत. विरोधक मात्र मानवी जीवाच्या विषयावर राजकारण करीत असून लोक मरताहेत तर मरू द्या, या भूमिकेत असल्याचा, घणाघाती आरोप महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला.

मंगळवारी (दि. ३०) सकाळी ११ वाजता विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. याप्रसंगी माजी आमदार आनंदराव वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई, प्रदेश महासचिव जिया पटेल, माजी जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर, मनोज बागडे, प्रशांत देशकर, धनराज साठवणे, अजय गडकरी आदी उपस्थित होते. नाना पटोले म्हणाले, शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वतोपरी निर्णय घेतले जात आहेत. शेतकऱ्यांचे शेकडो पोती धान मिलिंगच्या प्रतीक्षेत आहे. फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या प्रेशरमुळे धानाचे मिलिंग करता आले नाही. आताही अनेक शेतकऱ्यांकडे धान शिल्लक आहे. धानाची उचल करण्यासाठी मुदतवाढीसंदर्भात मागणी केली आहे. तांदळाच्या उताऱ्यासंदर्भातही केंद्र शासनाकडे प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे घोषित करण्यात आलेला प्रतिक्विंटल ७०० रुपये बोनस एप्रिलमध्ये देण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रियाही सुरू झाली आहे. राज्यात कर्मचारी पदभरती संदर्भातही प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

तिन्ही पक्षांचे महाविकास आघाडी सरकारचे काम ऑलवेल सुरू आहे, मात्र विरोधक नाहक आरोप करून जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गतवर्षी घोषित करण्यात आलेल्या २० लाख कोटींचे पॅकेजचे काय झाले, याचे उत्तर अजूनही मिळालेले नाही. कुणाच्याही खात्यावर पैसे जमा झालेले नाहीत. फक्त घोषणा व जुमलेबाजी देऊन वेळ मारून नेण्यात आल्याचा टोलाही पटोले यांनी लगावला. दीपाली चव्हाण मृत्यू प्रकरणात जो कोणी अधिकारी दोषी असेल त्यावर निश्चितच कारवाई झाली पाहिजे, अशी काँग्रेसची स्पष्ट भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.

बॉक्स

मंत्रिपदाच्या शर्यतीत नाही

वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार या संदर्भात प्रश्न उपस्थित केला असता नाना पटोले म्हणाले, वीज ग्राहकांना कुठलीही सुविधा व त्रास निर्माण होता कामा नये, या मताचे आम्ही असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजेच्या देयकाचा भरणा केल्यास त्यापोटी वीज वितरण कंपनीला तोटा कमी प्रमाणात सहन करावा लागेल. मात्र आपण ऊर्जा खात्याच्या संदर्भात मंत्रिपदाच्या कुठल्याही शर्यतीत नाही. मी स्वतः प्रदेशाध्यक्ष असल्याने केव्हाही मंत्रिपद मला मिळू शकते, मात्र आपण त्या संदर्भात कुठलाही विचार केलेला नाही किंवा आपण कुठल्याही शर्यतीत नाही, असेही त्यांनी स्पष्ट सांगितले.