शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel-Iran War: भारतासाठी कायपण ! परतीसाठी इराणने आपले हवाई क्षेत्र उघडले, आणखी दोन विमाने नवी दिल्लीत पोहोचणार
2
भीषण अपघात! नवी मुंबईत मुलीने मर्सिडीजने दुचाकीला उडवले; महिलेचा जागेवर मृत्यू, एकजण गंभीर जखमी
3
Devendra Fadnavis: "बोल बच्चन भैरवी असणाऱ्यांना मी उत्तरे देत नाही" फडणवीसांची उद्धव ठाकरेंवर टीका
4
मराठमोळ्या अभिनेत्याने केली आत्महत्या, काम मिळत नसल्याने उचललं टोकाचं पाऊल
5
Amit Shah: इतक्या वर्षांत महाराष्ट्रासाठी, मुंबईसाठी तुम्ही काय केले? अमित शाहांची काँग्रेसवर टीका
6
बिझनेसमन संजय कपूर यांना मैदानावरच देण्यात आलेला CPR, शेवटचा Video समोर
7
आता विका जिकडे विकायचंय.., पाकिस्तान 'याचा' जगातील सर्वात मोठा उत्पादक, भारतानं नाकारलं आता अन्य देशांचे दरवाजे ठोठावतोय
8
अहमदाबादमधील विमान अपघातात प्रसिद्ध चित्रपट निर्मात्याचा मृत्यू, DNA चाचणीमधून झालं उघड  
9
आजचे राशीभविष्य - २१ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना आज सामाजिक, आर्थिक तसेच कौटुंबिक क्षेत्रात लाभ होतील
10
FD पेक्षा अधिक रिटर्न, रिस्कही कमी! 'याला' म्युच्युअल फंडाचं सेफ झोन म्हणतात, तुमच्यासाठी योग्य आहे का?
11
Iran Israel War : इराण मागे हटेना! अमेरिकेसोबत बोलण्यास नकार, इस्त्रायलने अनेक इराणी लष्करी तळ उद्ध्वस्त केले
12
अक्षय कोठारीला मिळालं बालपणीचं प्रेम, 'लक्ष्मीच्या पावलांनी' फेम अभिनेता अडकला विवाहबंधनात
13
Air India च्या भाड्यात १५% पर्यंतची घसरण; अहमदाबाद विमान अपघातानंतर बुकिंग मोठ्या प्रमाणात घटलं
14
Air India Plane Crash: ‘त्या’ विमानात कोणताही बिघाड नव्हता, एअर इंडियाचे सीईओ कॅम्पबेल विल्सन यांची ग्वाही
15
Nana Patole: निवडणुकीच्या 'या' नियमात मोठा बदल; पटोलेंचा केंद्र अन् निवडणूक आयोगाला थेट सवाल!
16
Navi Mumbai: मुलीवरून चिडवल्याने मित्राचा कापला गळा, नवी मुबईतील घटनेने खळबळ!
17
लोकलमध्ये दोन महिलांत डोकं फुटेपर्यंत हाणामारी; नेमकं कशामुळं पेटलं भांडण? खरं कारण आलं समोर
18
Nagpur: राजधानी एक्सप्रेसवर दगडफेक, प्रवाशांमध्ये दहशत 
19
Elections: आगामी निवडणुका एकत्र की स्वतंत्र? महाआघाडीमध्ये अद्यापही सूर जुळेना!
20
एअर इंडियाच्या विमानाचा मोठा अपघात टळला; पायलटच्या प्रसंगावधानामुळे शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

सहा महिन्यांपासून मजुरीविना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2019 21:18 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रोजंदारी काम करणाºया मजुरांची मजुरी गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी त्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मजुरी काढून देण्याची मागणी मजूर करीत आहेत.

ठळक मुद्देनवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प : मजुरांवर उपासमारीची पाळी, अधिकाऱ्यांचा बेजबाबदारपणा

लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील रोजंदारी काम करणाºया मजुरांची मजुरी गेल्या सहा महिन्यांपासून मिळालेली नाही. परिणामी त्या मजुरांवर उपासमारीची पाळी आली आहे. अशात जबाबदार अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालून मजुरी काढून देण्याची मागणी मजूर करीत आहेत.नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील कक्ष क्रमांक १२४ भाग-१ मध्ये रायमोनिया व महाडोर निर्मूलनाकरिता १११ मजुरांना रोजगार देण्यात आला होता. मात्र त्यांची मजूरी सहा महिन्यापासून मिळाली नाही. त्यात घाटेझरी ३६, कोसमतोंडी ३५ तर धानोरीचे २९ मजूर कामावर होते. धानोली, कोसमतोंडी व घाटेझरी या गावात आदिवासी बहूल जनता रोजगाराच्या शोधात असतात. सुजलाम-सुफलाम शेती नसल्यामुळे गोरगरीब लोकांना रोजगाराची नितांत गरज आहे. घाटेझरी हे गाव येथून २८ किमी. असून तालुक्याच्या शेवटच्या टोकावर आहे.फायर लाईन व रस्त्याच्या बाजूने गवत कटाईच्या कामावर १० ते १५ दिवस मजूर कामावर होते. त्याचीही मजुरी यांना मिळाली नाही. नागझिरा येथील पाच कमरे परिसरात घाटेझरी येथील ६० मजुरांनी तरोटा उपसण्याचे काम केले. त्या गरीब महिला मजुरांचे पैसे न मिळाल्याने वन्यजीव विभागाप्रती कोसमतोंडी परिसरातील नागरिक रोष व्यक्त करीत आहेत. गोरगरीब मजुरांचे पैसे लवकर देण्याची मागणी होत आहे. तरी वरिष्ठ जबाबदार अधिकाºयांनी लक्ष देण्याची गरज आहे.शासनाकडून निधी न आल्याने मजुरांचे पैसे देण्यास विलंब लागला आहे. येत्या दोन-चार दिवसांत त्या मजुरांचे पैसे त्यांच्या खात्यावर जमा केले जाईल.सचिन शिंदे,वनपरिक्षेत्र अधिकारी, नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्प वन्यजीव विभाग साकोली

टॅग्स :forest departmentवनविभाग