शहरं
Join us  
Trending Stories
1
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
2
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
3
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
4
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
5
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
6
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
7
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
8
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
9
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
10
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
11
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
12
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
13
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
14
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
15
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
16
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
17
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
18
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
19
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट

एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2019 06:00 IST

गोंदिया तालुक्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि.२) आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसह दौरा केला. या वेळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. झालेले परतीच्या पावसाने धान पिकांचे झालेले नुकसान पाहून आणि शेतकऱ्यांचे पाणावलेले चेहरे पाहून आ. अग्रवाल सुध्दा काही क्षण अस्वस्थ झाले होते.

ठळक मुद्देविनोद अग्रवाल । नुकसानीची केली प्रत्यक्ष पाहणी, मदतीसाठी मुख्यमंत्र्यांना साकडे

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परतीच्या पावसाने जिल्ह्यात जोरदार हजेरी लावल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावला गेला असून धानपिक मातीमोल झाले आहे.त्यामुळे शेतकरी संकटात आहे. त्यामुळे परतीच्या पावसाने झालेल्या नुकसानीचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण यंत्रणेने करुन एकही शेतकरी नुकसान भरपाई मिळण्यापासून वंचित राहणार याची काळजी घेण्याची सूचना आ. विनोद अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांना केली.गोंदिया तालुक्यात परतीच्या पावसामुळे धान पिकाच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शनिवारी (दि.२) आ. अग्रवाल यांनी अधिकाऱ्यांसह दौरा केला. या वेळी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतांना भेट देऊन धान पिकाच्या नुकसानीची पाहणी केली. झालेले परतीच्या पावसाने धान पिकांचे झालेले नुकसान पाहून आणि शेतकऱ्यांचे पाणावलेले चेहरे पाहून आ. अग्रवाल सुध्दा काही क्षण अस्वस्थ झाले होते. शेतकऱ्यांनी काबाडकष्ट आणि कुटुंबासह वर्षभर शेतात राबवून मेहनतीने पीक घेतले होते. मात्र परतीच्या पावसाने त्यावर पूर्णपणे पाणी फेरले. पावसामुळे अनेक शेतातील धानाची तणस झाली तर काही धानाला अंकुर फुटल्याने शेतकºयांना पूर्ण हंगामाला मुकावे लागणार आहे. परिणामी त्यांच्यावर अस्मानी संकट ओढावले असून कर्जबाजारी होण्याची वेळ आली. त्यामुळे अशा स्थिती कृषी, महसूल आणि पीक विमा कंपनीच्या यंत्रणेने नुकसानीचे वस्तूनिष्ठ सर्वेक्षण करुन एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना जोपर्यंत योग्य मोबदला मिळणार तोपर्यंत आपण गप्प बसणार नाही. शेतकऱ्यांवर ओढावलेल्या संकटात आपण गंभीरपणे त्यांच्या पाठीशी उभे असल्याचे सांगत शेतकऱ्यांना धीर दिला. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वी आ.अग्रवाल यांनी मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रकातदादा पाटील यांची भेट घेऊन त्यांना जिल्ह्यात परतीच्या पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती देत शेतकऱ्यांना योग्य मोबदला देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल घेत मुख्यमंत्र्यांनी नुकसानीचे सर्वेक्षण करण्याचे निर्देश यंत्रणेला दिले होते.शनिवारी दौऱ्याप्रसंगी तहसीलदार राजेश भांडारकर, तालुका कृषी अधिकारी धनराज तुमडाम, कृषी अधिकारी रहांगडाले, जिल्हा कृषी अधिकारी शुक्ला,महसूल अधिकारी तिवारी, भाऊराव उके, छत्रपाल तुरकर, मुनेश रहांगडाले, रामराज खरे, लखन हरिणखेडे, टिटुलाल लिल्हारे, पन्नालाल मचाडे, भरत लिल्हारे, धनंजय तुरकर, ग्यानचंद जमईवार, गजेंद्र फुंडे, कमलेश सोनवाने, चंद्रिकापुरे, सरपंच राजेश कोल्हे, रामू नशिने उपस्थित होते.

टॅग्स :agricultureशेती