शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
3
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
4
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
5
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
6
गणेश चतुर्थीला मित्रांना, नातेवाईकांना सोशल मीडियावर 'हा' संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
7
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...
8
Team India Sponsor Deal : टीम इंडियाला पहिला स्पॉन्सर कधी मिळाला? कसा वाढत गेला कमाईचा आकडा?
9
विपिन रात्रभर डिस्कोला जायचा अन्...; निक्की मर्डर केसमध्ये 'मिस्ट्री गर्ल'ची एन्ट्री
10
Dream11चं 'पॅक-अप'; आता टीम इंडियाचा नवा स्पॉन्सर कोण? 'या' बड्या कंपन्यांची नावे चर्चेत
11
Nikki Murder Case : फक्त हुंडा नाही तर रील, पार्लरवरुनही झालेली भांडणं; निक्की हत्याप्रकरणात धक्कादायक खुलासा
12
तिच्यासोबतच लग्न करायचंय! तरुणाचं शोलेस्टाईल आंदोलन, पण प्रेयसीचं सत्य समजताच पायाखालची वाळू सरकली
13
गणेश चतुर्थी २०२५: युट्यूब, फेसबुक Live, रेकॉर्डेड गणपती पूजन पुण्य देते का? पूजा सफल होते?
14
PM मोदी उद्या करणार उद्घाटन; Maruti च्या पहिल्या EV कारची शंभरहून अधिक देशात निर्यात
15
'ऑपरेशन सिंदूर' नंतर भारताची पहिल्यांदाच पाकिस्तानला मदत! दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांशी संपर्क साधला
16
Gold Silver Price 25 August: सोन्याच्या दरात बंपर तेजी, एका दिवसात चांदी २६२७ रुपयांनी महागली; पाहा काय आहेत नवे दर?
17
जगदीप धनखड यांनी अचानक राजीनामा का दिला? अमित शाह म्हणाले, 'जास्त ताणून काहीतरी...'
18
'तुमच्या यूट्यूब चॅनेल्सवर माफी मागा', दिव्यांगांची खिल्ली उडवल्याप्रकरणी SC चे समय रैनासह ५ जणांना आदेश
19
काय आहे 'सलवा जुडूम' ?; ज्यावरून अमित शाहांनी विरोधकांच्या उपराष्ट्रपतिपदाच्या उमेदवाराला घेरले
20
जाऊ डबलसीट रे लांब लांब... पण हे असं?; 'लव्ह बर्ड्स'चा आणखी एक Video तुफान व्हायरल

पाच महिन्यांपासून ई-निविदाच नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:14 IST

उन्हाळा आला की प्रशासनाला पाणीटंचाइचे डोहाळे लागतात एरव्ही मात्र आश्वासनांची खैरात होत असते.

पाणी पुरवठा विभागाचा प्रताप : नळयोजनांना मंजुरी; मात्र लोकमत न्यूज नेटवर्क अर्जुनी-मोरगाव : उन्हाळा आला की प्रशासनाला पाणीटंचाइचे डोहाळे लागतात एरव्ही मात्र आश्वासनांची खैरात होत असते. पाणीटंचाईसारख्या गंभीर मुद्यावर शासन व प्रशासन गंभीर नाही. उन्हाळ्यापूर्वी पाणीटंचाईचे नियोजन करण्यात येऊन जिल्ह्यात कित्येक नळ योजना मंजूर झाल्या मात्र त्यांची साधी ई-निविदा प्रक्रियाही पूर्ण होऊ शकली नाही. गोंदिया जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाच्या या गचाळ कारभाराबद्दल जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी खंत व्यक्त केली. केंद्रातील तत्कालीन मनमोहनसिंग सरकारचे कार्यकाळात भारत निर्मल कार्यक्रम व राष्ट्रीय पेयजल योजनेच्या माध्यमातून पाणी पुरवठा योजनांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी उपलब्ध होत असे, केंद्रातील सत्तारुढ शासनाने या योजना बंद केल्या. २ वर्षापर्यंत पाणी पुरवठा योजनेचे स्पष्ट धोरणच नव्हते, गतवर्षी राज्य शासनाने मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम सुरु केला. त्याची अमंलबजावणी जि.प.च्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत सुरु केली. डव्वा जि.प. क्षेत्रातील डव्वा, खजरी, डोंगरगाव, कोहळीटोला व वडेगाव येथे अभियंत्याकडून पाण्याचे स्त्रोत तपासून प्रस्ताव सादर केले. एकाही योजनेला मंजूरी मिळाली नाही. मंत्रालय स्तरावर या योजनांचे सादरीकरण करुन २८ फेब्रुवारी रोजी मंजूरी मिळवून घेतली. यासोबतच पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने डव्वा (९६.४८), खजरी (५५.५२), कोहळीटोला/आदर्श (५२.६२), डोंगरगाव/खजरी (५३.९८), वडेगाव (५७.५७), दहेगाव (६३.९२), सतोना (७७.१८), पिंडकेपार (६३.०८), कोडेलोहारा (७३.४५), गुमाधावडा (७१.५०), कनेरी/राम (४५.६१), पूरगाव (७१.२९), भर्रेगाव (५८.४२), निंबा (६०.६१), लोहारा (६९.४०), डब्बेटोला (५४.७७), रापेवाडा (५७.७०), नवरगाव (५९.९७), सहेसपूर (६५.५२), दवडीपार (४८.३५), लोधीटोला (८२.२९), शहारवानी (७८.९०), घाटबोरी/तेली (५२.६१), गिरोला (४४.२७), सावली (४३.२६) व खैरलांजी (५८.०६) लाख रुपयांच्या योजनांंना फेब्रुवारी ते मे या कालावधीत राज्य शासनाकडून मंजूरी मिळाली. या नळ योजनांचे ई-निविदांसाठी अनेक प्रयत्न केले मात्र अद्यापही ई-निविदा प्रक्रिया पूर्णत्वास येऊ शकली नाही. पाणी पुरवठा विभागाच्या या कासवगतीमुळे जिल्ह्याच्या विकासावर परिणाम होतत आहे. एकंदरीत शासन व प्रशासनाचेच हे अपयश असल्याची खंत परशुरामकर यांनी व्यक्त केली.