शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
6
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
7
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
8
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
9
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
10
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
11
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
12
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
13
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
14
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
15
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
16
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
17
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
18
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
19
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
20
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
Daily Top 2Weekly Top 5

दहा वर्षांपासून भरती नाही; भावी गुरुजींनी रस्त्यावर चहा विकायचा का ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2022 21:14 IST

शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. शासन शिक्षक भरती करण्यास उदासीन आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अध्यापक, पदविका, पदवी पात्रताधारक बेरोजगारांचे जगणे मुश्कील झाले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : शासकीय भरती बंद असल्यामुळे शिक्षण क्षेत्रावर मोठ्या प्रमाणात अवकळा आली आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद केली आणि आता शाळा बंद करण्याचे नियोजन सुरू केले असल्यामुळे शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. विद्यार्थ्यांचे आयुष्य पणास लागले आहे. अनेक शाळांमध्ये पाच ते सात शिक्षकांची आवश्यकता आहे, त्या शाळेत केवळ दोन आणि तीन शिक्षक असल्याचे चित्र आहे.शिक्षकांना शिकवण्याबरोबरच स्कॉलरशिप प्रशिक्षण व पंधरवडा सप्ताह राबविण्यासह इतर सर्व ऑनलाइनची कामे करावी लागतात. जिल्हा परिषद शाळांसह स्थानिक स्वराज्य संस्था खासगी स्तरावरील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील रिक्त पदे मोठ्या प्रमाणात आहेत. शासन शिक्षक भरती करण्यास उदासीन आहे. दहा वर्षांपासून शिक्षक भरती होत नसल्याने अध्यापक, पदविका, पदवी पात्रताधारक बेरोजगारांचे जगणे मुश्कील झाले आहे. काय करावे? असा प्रश्न त्यांना पडला आहे. पदवी घेऊन पदवी, पदविकाधारक बेरोजगारांनी काय करावे? असा प्रश्न आता निर्माण झाला आहे. जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्राथमिक शिक्षक जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा तसेच खासगी शाळेतील अनेक पदे रिक्त आहेत. शेकडो शिक्षक सेवानिवृत्त झाले आहेत, त्यामुळे शिक्षकांची सुमारे हजारांवर पदे रिक्त आहेत. दहा वर्षांपासून भरती प्रक्रिया होत नसल्याने शिक्षक, अध्यापक, पदविका, पदवीधारकांनी आता रस्त्यावर चहा विकायचा का? असा संतप्त सवाल या डीटीएड, बीएड पात्रधारक बेरोजगार भावी शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

जिल्ह्यात आता केवळ ५ डीएड कॉलेज- जिल्ह्यात डीएडची ८ कॉलेज होती. त्यापैकी तीन कॉलेज बंद झाली आहेत. आता जिल्ह्यात पाच डीएड कॉलेज आहेत. ११०० जागा एकूण आहेत.

दरवर्षी २५० शिक्षक बाहेर पडतात त्यांचे काय ?   शासनाच्या शिक्षण विभागाची भरती बंद असल्याने त्याचा परिणाम डीएड कॉलेजवर झाला आहे. त्यामुळे ७० टक्केच ॲडमिशन झाले आहे. नोकरी मिळत नसल्याने अनेक विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. दहा वर्षांपासून शिक्षक भरती नाही. त्यामुळे खासगी कॉन्व्हेंटवर अल्पशा मानधनावर डीएड झालेल्या भावी शिक्षकांना काम करावे लागते.

दहा वर्षांपासून भरती नाही

राज्यात २०१० नंतर शिक्षक भरती झाली नाही. २०१७ मध्ये पवित्र पोर्टलमार्फत प्रक्रिया सुरू झाली; परंतु तीही अद्याप अपूर्ण आहे. शिक्षक भरती प्रक्रियेत मध्यंतरी घोळ झाला होता. त्यामुळे सुपेसह इतरांनाही अटक होऊन ती प्रक्रिया लांबलेली होती.डीटीएड, बीएडधारकांची संख्या मोठी असून, शिक्षक पदभरती होत नसल्याने बेरोजगारीच्या संख्येत दरवर्षी वाढ होत आहे.

कोणी कंपनीत नोकरी करतो, तर कोणी हॉटेलात 

दहा वर्षांपासून शिक्षक भरती बंद असल्याने पदवीधारक बेरोजगारांनी करावे काय, असा यक्ष प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी मिळेल ते काम करून ते पोट भरत आहे. कुणी खासगी कंपनीत नोकरीला आहे तर कोणी हॉटेलात काम करतो आहे तर अनेक भावी शिक्षक शेतात मजुरीला कामाला जात असल्याचे चित्र आहे.

मी २०१० मध्ये डीएड पास झालो; परंतु अद्यापही नोकरी मिळाली नाही. वय निघून जात आहे, त्यामुळे मिळेल ते काम करावे लागत आहे. कुटुंबाची जबाबदारी आहे. शेतीत जाऊन शेतीची कामे आणि दूध वाटण्याचे काम करीत आहे.- पंढरी पाल, (डीएड, उमेदवार)

दहा वर्षांपासून शिक्षक भरती नाही. हजारो जागा रिक्त आहेत. शासन डीएड, बीएडधारकांची भरती करत नाही. त्यामुळे बेरोजगारी वाढत आहे. परिणामी कॉन्व्हेंटमध्ये चार हजार रुपये महिना पगारावर नोकरी सुरू आहे. त्यात काय होणार, तुम्हीच सांगा.- पराग बनकर, (डीएड, उमेदवार)

 

 

टॅग्स :Teachers Recruitmentशिक्षकभरतीjobनोकरी