शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
2
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
3
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
4
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
5
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
6
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
7
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
8
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
9
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
10
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
11
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
12
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
13
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...
14
Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!
15
"देवेंद्रजीसुद्धा योगीच, ते कसरत नाही पण..', अमृता फडणवीस यांचं विधान
16
"माझे ९ लाख रुपये निर्मात्यांनी दिलेले नाहीत", 'मन उडू उडू झालं' फेम अभिनेत्याची व्यथा, म्हणाला- "मी इंजिनियर असूनही..."
17
उप कर्णधार रिषभ पंतचा मोठा पराक्रम! शतकी खेळीसह मोडला MS धोनीचा विक्रम! सेलिब्रेशनही एकदम झक्कास
18
Tejasvi Ghosalkar: "उद्धव ठाकरे माझे कुटुंबप्रमुख, मी अजूनही...", बँकेचं संचालकपद मिळाल्यानंतर तेजस्वी घोसाळकरांचं स्पष्टीकरण
19
"इराणचा विजय होवो, त्यांनी इस्राइलला…’’, केंद्रातील सत्ताधारी भाजपाच्या मित्रपक्षाने इराणला दिला पाठिंबा   
20
टीव्ही कपल लता सबरवाल-संजीव सेठ यांचा घटस्फोट, लग्नानंतर १५ वर्षांनी मोडला संसार

एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:59 IST

मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.

ठळक मुद्देग्राहक अडचणीत: चार दिवसांपासून समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.शहर आणि जिल्ह्यात विविध बँकाचे १५० जवळपास एटीएम केंद आहे. बँकांनी सर्वच ग्राहकांना एटीएम वितरीत केले आहे. त्यामुळे ग्राहक देखील स्वत:जवळ रोख न बाळगता एटीएम कार्ड ठेवतात. त्यामुळे बाहेरगावी कॅश घेऊन जाण्याची अडचण आणि जोखीम कमी झाली आहे.शहरासह ग्रामीण भागात देखील एटीएमची सुविधा असल्याने बहुतेक सर्वजण स्वत: जवळ रोख बाळगत नाही. एकंदरीत सर्वांनाच एटीएमची सवय लागली आहे. मात्र मागील तीन चार दिवसांपासून एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक लागल्याने ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहे.ही समस्या केवळ एका एटीएममध्ये असेल म्हणून ग्राहक दोन तीन एटीएम केंद्रात जावून चाचपणी करीत आहेत. मात्र तिथे देखील हीच समस्या असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.एटीएममधून पैसे निघत नसल्याने दररोजच्या छोट्या छोटया गरजा भागविण्यासाठी बँकेतून जावून रांगेत लागून पैसे काढण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. मात्र सर्वाधिक एटीएमची अडचण प्रवाश्यांना व बाहेरगावावरुन येणाºया ग्राहकांना बसत आहे.दोनशे, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांची टंचाईसर्वच बँकाना रिर्झव्ह बॅकेकडून पत पुरवठा केला जातो. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून बँकाना रिर्झव्ह बँकेकडून पत पुरवठा झाला नाही. तर दोनशे, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा सध्या बंद झाला असल्याने बँकासमोर देखील अडचण निर्माण झाली आहे. पत पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये कॅश टाकणार कशी असे बँकेचे अधिकाºयांचे म्हणने आहे.कॅशलेस व्यवहारासाठी टंचाईकेंद्र सरकारने नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. यासाठी भीम अ‍ॅप, पेटीएम सारखे प्रयोग राबविले. कॅशलेस व्यवहार भर देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कॅशलेस व्यवहाराला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यामुळेच पत पुरवठा ठप्प करुन ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बाध्य केले जात आहे. सध्या एटीएम केंद्रामध्ये निर्माण झालेली टंचाई हा त्याचाच एक भाग असल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.रिझर्व्ह बँकेकडून बँकाना होणार पतपुरवठा मागील चार पाच दिवसांपासून ठप्प झाला आहे.त्यामुळे एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून कॅश मिळताच सर्व एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध करुन दिली जाईल.- दिलीप सिलारे, मुख्य व्यवस्थापक बँक आॅफ इंडिया गोंदिया,काही एटीएममध्ये केवळ दोन हजाराची नोटशहरातील काही बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध आहे. मात्र या एटीएममध्ये केवळ दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध आहे.त्यामुळे दोनशे, पाचशे रुपये काढण्यासाठी जाणाºया ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. तर ज्या ग्राहकांच्या खात्यात केवळ हजार रुपये शिल्लक आहे त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटमुळे दोनशे तिनशे रुपये काढण्यास अडचण जात आहे.

टॅग्स :atmएटीएम