शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
2
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
3
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
4
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
5
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
6
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...
7
चिंताजनक! लहानपणीच्या 'या' छोट्याशा निष्काळजीपणामुळे ५०% वाढतो हृदयरोगाचा धोका
8
गुंडांना आवरा अन्यथा धडा शिकवू, ज्येष्ठ कार्यकर्त्याशी झालेल्या गैरवर्तनावरून काँग्रेसचा भाजपाला इशारा
9
मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न
10
"फरहानच्या AK47 वर अभिषेक-गिलचं 'ब्रह्मास्त्र' पडलं भारी.."; पाकिस्तानी क्रिकेटरनेच सुनावलं
11
जिच्याशी अफेअर त्या नर्सलाच डॉक्टरने ठार मारले, आधी नशेचं इंजेक्शन दिलं, मग कारखाली चिरडलं  
12
National Film Award: पांढरे केस, गॉगल आणि सूटबूट! राष्ट्रीय पुरस्कारासाठी शाहरुखचा लूक, 'त्या' कृतीने जिंकली मनं
13
वडिलांना आणि भावाला अडकण्यासाठी मुलीने रचला भयानक कट; बॉयफ्रेंडच्या मित्राची हत्या केली अन्...
14
“राज्यातील रस्त्यांच्या देखभाल-दुरुस्तीसाठी १२९६.०५ कोटींचा निधी”: शिवेंद्रसिंहराजे भोसले
15
PAK vs SL : 'डबल पंजा पॅटर्न'मुळे लंकेचा पेपर सोपा! पाकला मात्र नापास होण्याचा धोका!
16
भरधाव ट्रकमागे दुचाकीस्वाराचा थरार, जीवघेणा स्टंट पाहून तुमच्याही अंगावर येईल शहारा! VIDEO व्हायरल
17
शेअर बाजार लाल निशाणीवर बंद; तरीही Axis बँकेसह 'या' स्टॉक्सनी घेतली जोरदार झेप!
18
सूर्य नक्षत्र परिवर्तन २०२५: २७ सप्टेंबरला सूर्य बदलणार नक्षत्र आणि 'या' ७ राशींचे भाग्य; बाकी राशींचे काय?
19
71st National Awards : 'श्यामची आई' ठरला सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, महाराष्ट्राची शान नऊवारी साडीत स्वीकारला पुरस्कार!
20
बायकोने मोबाईल मागितला, नवऱ्याने नाही दिला; संतापलेल्या पत्नीने मग घरातला चाकू घेतला अन्...

एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2018 00:59 IST

मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.

ठळक मुद्देग्राहक अडचणीत: चार दिवसांपासून समस्या कायम

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मागील तीन चार दिवसांपासून शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागातील एटीेएममध्ये कॅश नसल्याने पैसे काढण्यासाठी जाणाऱ्या नागरिकांना रिकाम्या हातानेच परतावे लागत आहे. एक दोन नव्हे तर जवळपास सर्वच बँकाच्या एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक झळकल्याने नोटबंदीनंतर नोट टंचाई तर निर्माण झाली नाही अशी चर्चा आहे.शहर आणि जिल्ह्यात विविध बँकाचे १५० जवळपास एटीएम केंद आहे. बँकांनी सर्वच ग्राहकांना एटीएम वितरीत केले आहे. त्यामुळे ग्राहक देखील स्वत:जवळ रोख न बाळगता एटीएम कार्ड ठेवतात. त्यामुळे बाहेरगावी कॅश घेऊन जाण्याची अडचण आणि जोखीम कमी झाली आहे.शहरासह ग्रामीण भागात देखील एटीएमची सुविधा असल्याने बहुतेक सर्वजण स्वत: जवळ रोख बाळगत नाही. एकंदरीत सर्वांनाच एटीएमची सवय लागली आहे. मात्र मागील तीन चार दिवसांपासून एटीएम केंद्राबाहेर नो कॅशचे फलक लागल्याने ग्राहक चांगलेच अडचणीत आले आहे.ही समस्या केवळ एका एटीएममध्ये असेल म्हणून ग्राहक दोन तीन एटीएम केंद्रात जावून चाचपणी करीत आहेत. मात्र तिथे देखील हीच समस्या असल्याने त्यांना रिकाम्या हाताने परतावे लागत आहे.एटीएममधून पैसे निघत नसल्याने दररोजच्या छोट्या छोटया गरजा भागविण्यासाठी बँकेतून जावून रांगेत लागून पैसे काढण्याची वेळ ग्राहकांवर आली आहे. मात्र सर्वाधिक एटीएमची अडचण प्रवाश्यांना व बाहेरगावावरुन येणाºया ग्राहकांना बसत आहे.दोनशे, पाचशे व शंभर रुपयांच्या नोटांची टंचाईसर्वच बँकाना रिर्झव्ह बॅकेकडून पत पुरवठा केला जातो. मात्र मागील सात ते आठ दिवसांपासून बँकाना रिर्झव्ह बँकेकडून पत पुरवठा झाला नाही. तर दोनशे, पाचशे आणि शंभर रुपयांच्या नोटांचा पुरवठा सध्या बंद झाला असल्याने बँकासमोर देखील अडचण निर्माण झाली आहे. पत पुरवठा होत नसल्याने एटीएममध्ये कॅश टाकणार कशी असे बँकेचे अधिकाºयांचे म्हणने आहे.कॅशलेस व्यवहारासाठी टंचाईकेंद्र सरकारने नोटबंदीनंतर कॅशलेस व्यवहाराला प्राधान्य देण्याचे आवाहन केले होते. यासाठी भीम अ‍ॅप, पेटीएम सारखे प्रयोग राबविले. कॅशलेस व्यवहार भर देण्याचे निर्देश दिले. मात्र त्यानंतरही कॅशलेस व्यवहाराला पाहिजे तेवढा प्रतिसाद मिळत नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे त्यामुळेच पत पुरवठा ठप्प करुन ग्राहकांना कॅशलेस व्यवहार करण्यासाठी बाध्य केले जात आहे. सध्या एटीएम केंद्रामध्ये निर्माण झालेली टंचाई हा त्याचाच एक भाग असल्याचे बँकेच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले.रिझर्व्ह बँकेकडून बँकाना होणार पतपुरवठा मागील चार पाच दिवसांपासून ठप्प झाला आहे.त्यामुळे एटीएममध्ये कॅश टाकण्यासाठी अडचण निर्माण झाली आहे. रिझर्व्ह बँकेकडून कॅश मिळताच सर्व एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध करुन दिली जाईल.- दिलीप सिलारे, मुख्य व्यवस्थापक बँक आॅफ इंडिया गोंदिया,काही एटीएममध्ये केवळ दोन हजाराची नोटशहरातील काही बँकेच्या एटीएम केंद्रामध्ये कॅश उपलब्ध आहे. मात्र या एटीएममध्ये केवळ दोन हजार रुपयांची नोट उपलब्ध आहे.त्यामुळे दोनशे, पाचशे रुपये काढण्यासाठी जाणाºया ग्राहकांची मोठी अडचण होत आहे. तर ज्या ग्राहकांच्या खात्यात केवळ हजार रुपये शिल्लक आहे त्यांना दोन हजार रुपयांच्या नोटमुळे दोनशे तिनशे रुपये काढण्यास अडचण जात आहे.

टॅग्स :atmएटीएम