शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी कारवाई...! दिल्ली स्फोटानंतर काश्मीरात 500 ठिकानी छापे, 600 जण ताब्यात; 'व्हाईट कॉलर टेरर' मॉड्यूलच्या फास आणखी आवळल्या
2
Exit Poll अंदाजाने सुखावणाऱ्या NDA साठी हा आकडा ठरतोय डोकेदुखी; बिहारच्या निकालात उलटफेर होणार?
3
“अजित पवारांना सत्तेतून बाहेर पडावे लागेल अशी स्थिती निर्माण केली जाणार”: विजय वडेट्टीवार
4
बांगलादेशमध्ये पुन्हा हिंसाचार भडकला, शेख हसीना यांच्यावरील निकाल लवकरच येणार
5
मोठा खुलासा...! 8 दहशतवादी, 4 कार अन् 4 शहरे...! दिल्लीच नव्हे, संपूर्ण देशात दहशत माजवण्याचा होता प्लॅन!
6
"सरकारने पाकिस्तानवर चकार शब्द काढला नाही", दिल्ली बॉम्बस्फोटावरुन काँग्रेसचा केंद्रावर हल्ला
7
59 लाख पेन्शनधारकांना 8व्या वेतन आयोगाचे फायदे मिळणार नाहीत? कर्मचारी संघटनेने केंद्राला पत्र
8
सोन्यानंतर आता चांदीवरही लोन घेता येणार, RBI चा मोठा निर्णय; कसं जाणून घ्या
9
पश्चिम बंगालमध्ये 34 लाख Aadhar धारक ‘मृत’, UIDAI ची निवडणूक आयोगाला माहिती
10
'आमच्याकडे असे काही होत नाही', दहशतवादी कारवायांना पाठिंबा दिल्याच्या आरोपांना तुर्कीने दिले उत्तर
11
'आयुष्मान कार्ड' आणि 'आभा कार्ड'मध्ये तुमचाही होतो गोंधळ? यातील फरक आणि फायदे माहितीये का?
12
हृदयद्रावक! वाढदिवसाला प्रेमाने लेकाला बुलेट दिली, पण नंतर वडिलांवरच खांदा देण्याची वेळ आली
13
“मला काही बोला, पण माझ्या मुलीचा काय दोष?”; ट्रोलिंगमुळे इंदुरीकर महाराज आता कीर्तन सोडणार?
14
IND vs SA: मोहम्मद शमी Team India मध्ये का नाही? कर्णधार गिलने २ जणांची नावं घेत दिलं उत्तर
15
तुम्हीही 'डिजिटल गोल्ड' खरेदी करता का? आता सेबीचा इशारा, गुंतवणूकदारांनी काय करावं?
16
IND vs SA: " ईडन गार्डन्स माझ्यासाठी दुसरे घर!" कोलकाता कसोटीपूर्वी शुभमन गिल झाला भावूक!
17
बिल्डिंग नंबर १७, खोली क्रमांक १३; अल फलाह विद्यापीठाच्या हॉस्टेलमध्येच बनवला 'टेरर अड्डा'
18
"दिग्गज अभिनेत्याचा तमाशा बनवला आहे...", करण जोहर भडकला; म्हणाला, 'हा अपमान...'
19
Video: कपलच्या रोमॅन्टिक फोटोशूटमध्ये 2 सेकंदासाठी आला 'तो' व्यक्ती; व्हिडिओ प्रचंड व्हायरल...
20
i20, इकोस्पोर्ट्स आणि आता Brezza कार सापडली: दिल्ली हादरवण्याचं संपूर्ण प्लॅनिंग आखलं होतं

वृक्षसंवर्धनासाठी घोषणा नको, प्रत्यक्ष कृती हवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2018 22:07 IST

वृक्ष कटाईमुळे जंगले विरळ होत चालली आहेत. जंगलातील औषधीयुक्त वृक्षही नष्ट झाली आहेत. जो तो झाडे लावा झाडे जगवा, हाच नारा देत आहे. पण प्रत्यक्ष कृती कोण करतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निघणाऱ्या प्रभात फेरीदरम्यान ऐकायला मिळतो. तरी झाडे कापली जातात, मात्र त्या जागेवर झाडे लावणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देपर्यावरण धोक्यात : झाडे लावा-झाडे जगवा

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वृक्ष कटाईमुळे जंगले विरळ होत चालली आहेत. जंगलातील औषधीयुक्त वृक्षही नष्ट झाली आहेत. जो तो झाडे लावा झाडे जगवा, हाच नारा देत आहे. पण प्रत्यक्ष कृती कोण करतो, याकडे दुर्लक्ष केले जाते. ‘झाडे लावा-झाडे जगवा’चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निघणाऱ्या प्रभात फेरीदरम्यान ऐकायला मिळतो. तरी झाडे कापली जातात, मात्र त्या जागेवर झाडे लावणार कोण? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जमिनीची धूप रोखण्यासाठी वृक्ष लागवड करण्याचा संदेश दिला जातो. एवढेच नाही तर यासाठी अभियानही राबविले जाते. एकीकडे शासन झाडे लावण्यासाठी धडपडत असताना इमारत उभारण्याच्या नावाखाली होणारी झाडांची कत्तल दुर्लक्षित आहे. ले-आऊट पाडून वसाहती उभारताना क्षेत्रफळाच्या १० टक्के झाडे लावणे आवश्यक आहे. मात्र या नियमांचे पालन न होताच उभारल्या जाणाºया वसाहती पर्यावरण धोक्यात आणण्यास कारणीभूत ठरत आहेत.‘झाडे लावा, झाडे जगवा’ चा नारा जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने निघणाºया प्रभात फेरीदरम्यान ऐकायला येतो. नंतर हा विषय कुणाच्याही डोक्यात राहत नाही. दिवसेंदिवस वाढत जाणाºया लोकसंख्येच्या पार्श्वभूमीवर घरांची संख्यांही वाढत आहे. शेतजमीन ज्या कृषी उत्पादनासाठी उपयोगी आणल्या जात होत्या, त्या आज अकृषक करुन ले-आऊट पाडले जात आहेत. येथे मोठमोठ्या वसाहती उभ्या होत आहेत. गोंदिया शहर चारही बाजूंनी आज वाढले आहे. कुठे पाण्याचे स्त्रोत असलेल्या तलावाचे सपाटीकरण करुन तर कुठे शेतजमीन अकृषक करुन पाडलेल्या लेआऊटमध्ये वसाहती उभारल्या गेल्या आहेत.यासाठी त्या ठिकाणच्या झाडांची कत्तलही केली गेली. झाडे कापतानाच ती लावली जावी, अशी माफक अपेक्षा असते. उपविभागीय अधिकाºयांकडून अशा ले-आऊटला परवानगी घेतानाच एकूण क्षेत्रफळाच्या १० टक्के झाडे लावण्याचे बंधन आहे. हे बंधन पाळण्याचे परवानगी मिळेपर्यंत सांगितले जाते. मात्र आज शहराच्या आजूबाजूला असलेल्या एकाही ले-आऊटमध्ये झाडांची लागवड झालेली नाही. हे विशेष सर्व ले-आऊट मोकळे असल्याने दहा टक्के वृक्ष लागवडीचे बंधन पाळलेच जात नाही. हे स्पष्ट आहे. हा विभागही याबाबत फारसा गंभीर दिसत नाही. आता तर अशा ले-आऊटमधील प्रत्येक घरासमोर एक झाड असावे, असे फर्मान शासनाने काढले.यावर संबंधित विभागाने गांभीर्याने विचार करुन आपल्या कर्तव्याप्रती प्रामाणिक राहण्याची गरज आहे. अन्यथा आज गावात बोटावर मोजण्याइतकी दिसणारी झाडे भविष्यात नाहीशी व्हायला वेळ लागणार नाही.