शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

न.प.चे ४७ रोजंदारी कर्मचारी झाले स्थायी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2018 01:02 IST

येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे.

ठळक मुद्देगोपालदास अग्रवाल यांचा पाठपुरावा : अनेक वर्षांनंतर मिळाला न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : येथील नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शासनाने शुक्रवारी (दि.१६) घेतला आहे. त्यामुळे १९९३ पूर्वी नगर परिषदेत रोजंदारी तत्वावर कार्यरत सर्व कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून आ.गोपालदास अग्रवाल यांच्या पाठपुराव्याला यश आले आहे.राज्य सरकारने नागपूर, गडचिरोली, वर्धा, चंद्रपूर व गोंदिया जिल्ह्यातील नगर परिषदेत कार्यरत रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय शुक्रवारी घेतला. यामुळे गोंदिया नगर परिषदेतील वर्ग ३ चे २४ आणि वर्ग ४ चे २३ कर्मचाऱ्यांना स्थायी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नगर परिषदेत १९९३ पूर्वी कार्यरत असलेल्या १७१ रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्यात यावे.यासाठी आ. अग्रवाल यांचा शासनाकडे पाठपुरावा केला. त्याचीच दखल घेत शासनाने फेब्रुवारी २०१८ मध्ये २३ रोजंदारी कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय घेतला होता.या निर्णयाचा लाभ गोंदियासह तिरोडा, तुमसर,भंडारा,पवनी नगर परिषदेच्या कर्मचाºयांना सुध्दा लाभ झाला होता. त्यानंतर आता ४७ कर्मचाऱ्यांना स्थायी करण्याचा निर्णय घेण्यात आला. नगर परिषद रोजंदारी कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी जहीरभाई अहमद व सुरेंद्र बन्सोड यांनी आ.अग्रवाल यांच्याच पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना न्याय मिळाला असून याबद्दल अग्रवाल यांचे आभार व्यक्त केले.विशेष म्हणजे यापूर्वी नगर परिषदेच्या रोजंदारी कर्मचाऱ्यांना केवळ प्रती दिवस ६० ते ७० रुपये मजूरी मिळत होती. मात्र आ.अग्रवाल यांच्या पाठपुराव्यामुळे रोजंदारी कर्मचाऱ्यांना प्रती दिवस ४५० मजुरी दिली जात आहे.याबद्दल दिलीप चाचेरे, नियाज भाई, किशोर उके, राजू भेलावे, किशोर वर्मा, उदय यादव, सुनील जोशी, राजेश शर्मा, योगेश वर्मा यांनी अग्रवाल यांचे आभार मानले.

टॅग्स :Gopaldas Agarwalगोपालदास अग्रवाल